(मोहंमद ताहेरअंबाजोगाई तालुका प्रतिनिधी)
अंबाजोगाई नगर पालिकेत १६ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ८ महिला सफाई कामगार,ज्यानी अंबाजोगाई नगर पालिकेस तब्बल तीन वेळा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळुन दिला ,कोरोंना सारख्या माहामारित कसल्याही प्रकारचे संरक्षण साहित्य नसतांना देखील शहरातील सर्व शहरवासीयांची आरोग्याची काळजी घेत अंबाजोगाई शहर स्वच्छ ठेवले आज मात्र त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे
*त्यांना गेल्या काही दिवसांपासून कामावर कमी करण्यात आले आहे,त्यांना सामान कामासाठी पुरुषानं प्रमाणे समान वेतन दिले जात नाही,त्याचा थकित पगार सुध्दा अध्याप मिळालेला नाही*अंबाजोगाई नगर परिषदला या महिला सफाई कामगारांची सन २००७ पासुन कसलेही नोंद करण्यात आलेली नसुन*
या आठ महिला स्वता:हाच्या आणि कुटुंबाच्या निर्माण झालेल्या पोटाचा प्रश्न सुटावा म्हणुन मागील चार दिवसापासुन उपोषणास बसले आहेत
त्यांच्यापैकी दोन महिलांची परिस्थिति अतिशय खालावली असुन *अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा मात्र झोपेतच आहेत*,,,
त्यांना समान कामासाठी समान वेतन मिळावे,त्याची नगर पालिकेच्या रजिष्टरला सफाई कामगार म्हणुन नोंद करण्यात यावीत
पुढील करारात त्याचा समावेश करण्यात यावा आणि त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणुन त्यांचे थकित वेतन तात्काळ अदा करण्यात यावे.
अशी मागणी यामहिला सफाई कामगार आपल्या उपोषणाद्वारे नगर पालिका प्रशासनास करीत आहेत