वाशिम प्रतिनिधी:
वाशीम जिल्हा मध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन तूर उडीद मुग या पिकाचे नुकसान झाले आहे उभ्या पिकाला कोंब फुटले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे , परंतु शासनाने आत्ता पर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही शेतकऱ्यांकडे कोणीही बघायलाच तयार नाही त्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी रयत क्रांती संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे शेतकऱ्यांना त्वरित २० हजार रुपये एकरी प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी व संपूर्ण वाशिम जिल्ह्यात सरसगट ओला दुष्काळ त्वरित जाहीर करण्यात यावा अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष व रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र पणे आंदोलन करेल व त्यास जबाबदार शासन असेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी मुख्यमंत्री यांना सडलेले पीक पाठवण्यात आले यावेळी उपस्थित दीपक तिरके ( रासप जिल्हाध्यक्ष ) , अरविंद पाटील अहिरे ( रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष वाशिम ) , योगेश नप्ते पाटील ( रासप जिल्हा संपर्क प्रमुख वाशिम ) , शंकर पातळे ( रासप युवा जिल्हा सचिव वाशिम ) , समाधान शिंदे ( युवा तालुकाध्यक्ष रासप वाशिम ) , राधेश्याम कष्टे ( रासप युवा नेते ) , अनिल वानखेडे ( रयत क्रांती संघटना ) , ओंकार गावंडे ( रयत क्रांती संघटना ) , शंकर काळे , संदीप मापारी आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते