Thursday, October 29, 2020

तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतास चोवीस तास वीज पुरवठा करा: सरपंच संघटनेची मागणी.


शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी: फतेहअली खान पठाण
तालुक्यातील ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात पाणी साठा असताना विजवीतरण कंपनी कडून वीजपुरवठा अवेळी होत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही त्यासाठी सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या स्रोता जवळचा वीजपुरवठा चोवीस तास सुरू ठेवावा अशी मागणी विजवीतरण कडे सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे,
तालुक्यात प्रत्येक गावात सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या योजना कार्यन्वित असून नागरिकांना विजवीतरण च्या अडमुठी पणामुळे पाणी मिळत नाही ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर दिवसभर शेतीच्या कामात व्यस्त असताना वीजपुरवठा सुरू होतो आणि दुसऱ्या आठवढ्यात रात्रीच्या बारा वाजता वीजपुरवठा सुरू होतो ,आशा वेगवेगळ्या अडचणीमुळे जनतेला पाणी मिळत नाही आणि त्यात ग्राम पंचायत चे पाणीपुरवठा सेवक यांना सुद्धा रात्री बेरात्री पाणी पुरवठा चालू करण्यासाठी एक ते दोन की,मी,अंतरा पर्यत जावे लागत आहे तेही जोखिमेचे आहे आणि उन्हाळ्यासारख्या परिस्थितीत पावसाळ्यात ही पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याने विजवीतरण अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष वेधून नागरिकांना पाणी मिळावे हे धोरण अंगीकारुन सार्वजनिक ठिकाणी चे पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोताचे चोवीस तास वीज पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष हमीद पटेल यांनी केले आहे, या सोबत राम नलावडे ,जब्बार पटेल ,बाबूभाई शेख ,भागवत गड्डीमे ,माणिक गायकवाड यांनी सुद्धा विजवीतरण कंपनीला वीजपुरवठा खंडित करू नये अन्यथा आपल्या या अडमुठी धोरना विरोधात रस्त्यावर उतरू असा ही इशारा महावितरण ला यावेळी बोलताना दिला आहे ,