Saturday, October 31, 2020

सातनदुधनी येथे ग्रामपंचायत .जय दुर्गादेवी बहुउद्देशीय समाजसेवी संस्था . कोळी महासंघ. आद्यकवी महर्षि वाल्मिकी जयंती कार्यक्रम साजरा.

अक्कलकोट प्रतिनिधी:-

अक्कलकोट तालुका सातनदुधनी येथे जय दुर्गादेवी बहुउद्देशीय समजसेवी संस्था या संस्थेकडून महर्षी वाल्मिकी प्रतिमा पूजन संस्थेचे अध्यक्ष तथा कोळी महासंघ विद्यार्थी संघटना अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री देवेंद्र कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
सातनदुधनी ग्रामपंचायत येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी प्रतिमा पूजन सरपंच मा श्री. विठ्ठलराव खताळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कोळी महासंघ संघाकडून महर्षी वाल्मिकी प्रतिमापूजन संगप्पा कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी जयंती मध्ये कार्यक्रम करण्यात आले . कोरोना या विषाणू  मुळे महर्षी वाल्मिकी जयंती साधेपणाने साजरा करण्यात आले
यावेळी जय दुर्गादेवी संस्थेचे सचिव शिवचलप्पा कोळी. दुधनी मार्केट कमिटी संचालक श्री भिमराव अरबाळे. श्री अशोक काळे. ग्रामपंचायत सदस्य सौ काशीबाई करजगी. संस्थेचे सदस्य सौ कविता कोळी. कमलाबाई सोलंकर. मलव्वा कोळी. मल्लिकार्जुन कोळी. श्रीशैल कोळी.अप्पाशा करजगी. राज कोळी आदी उपस्थित होते

Friday, October 30, 2020

समाजसेवक सरफराज भाई मणियार व लातूर शहरातल्या पक्षसंघटना मित्र मंडळ यांच्यातर्फे लातूर शहरातील सर्वात मोठी रक्तदान शिबिर


लातूर प्रतिनिधी:अहेमद तांबोळी
ईद-ए-मिलाद उन नबी (स) यानिमित्ताने 30 10 2020 रोजीची नोंद 530  एवढी झाली आहे  आज पर्यंत इतकी मोठी नोंद रक्तदान शिबिराच्या माध्यमातून पहिल्यांदाच झालेली दिसून येत आहे*रोजी ईद मिलाद उन नबी ( स) यानिमित्ताने संपूर्ण लातूर शहरात विविध पक्ष संघटना व मित्र मंडळ तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याच रक्तदान शिबिर ला शंभर टक्के यश मिळाले लातुरातील रक्तदात्यांनी सक्षम होऊन आपला सहभाग नोंदवला व रक्तदान केले लातूरमध्ये पुढील प्रमाणे पक्ष संघटना हो मित्रमंडळातर्फे रक्तदान केलेली यादी अशी आहे की
एम आय एम मन्सूर अली शेख मित्र मंडळ  रक्तदाते 111
मदनी चौक 51. बरकत नगर 75.रजा यंग बॉईज हरंगुळ 60. अफजल कुरेशी मित्रमंडळ 75. सोफिया मस्जिद 77 .रेड प्लस फाउंडेशन 51. मुन्ना पठाण मित्र मंडळ 30. याप्रमाणे रक्तदात्यांनी ईद-ए-मिलाद उन नबी यानिमित्ताने रक्तदान केले

रक्तदात्यांना आवश्यक वस्तू भेट. सातनदुधनीत रक्तदान केलेल्यांना, मोबदल्यात भेट वस्तू देण्यात आले.

प्रतिनिधी अक्कलकोट:- देवेंद्र कोळी

गेल्या ३-४ महिन्याच्या मागे कोरोना च्या काळात कोरोना रूग्णांची संख्या ही महाराष्ट्रात अफाट वेगाने वाढत होती. त्याच वेळी एन वेळेस रूग्णांना रक्ताची उपलब्धता कमी जाणवत होती. त्या अनुषंगाने सातनदुधनी गावातील तरुण नवयुकांनी पुढे त्या काळात रक्तदान केले. जवळपास ४०-४५ जणांनी रक्तदान केले, आणि त्याच रक्तदानाच्या मोबदल्यात त्यांना पोचपावती म्हणून आज रक्तदात्यांना  हेल्मेट, पाण्याचे झार, घड्याळ, अशी वस्तू आदरपूर्वक साकार करण्यात आली.
यावेळी सरपंच विठ्ठलराव खताळ, पोलीस पाटिल महादेराव पाटिल, तंटामुक्त अध्यक्ष कोनाप्पा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रतन राठोड, आणि सर्व रक्त दाते उपस्थित होते.

Thursday, October 29, 2020

शिरूर अनंतपाळ तालुक्यात मुख्य रस्त्याची झाली दैनिय अवस्था , रस्ते झाले खड्डेमय ,अपघाताचे प्रमाण वाढले.


शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी: फतेहअली खान पठाण
तालुक्यात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकाची दैनिय अवस्था होत आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे , निलंगा ,उजेड ,नळेगाव घरणी या मुख्य रस्त्याची उजेड ते आरी मोड पर्यंत अत्यंत दुरावस्था झाली आहे. रोडवर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत असून या खड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने या मुख्य रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांतून केली जात आहे.
    तालुकाच्या ठिकाणी व पुढे नांदेडकडे जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा व जवळचा मार्ग असलेल्या या रोडवर अनेक लहान मोठे खड्डे पडले आहेत.तर त्यात उजेड जवळील कॉर्नर वर नालीचे पाणी रोडवर सोडल्याने रोडवर मोठ मोठे खडे पडले असून या खड्यात पाणी साचत आहे. त्यामुळे खड्याचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून एकास प्राणाला मुकावे लागले,तर अनेक जण जखमी झाले आहेत.
     शिरूर अनंतपाळ तालुक्यात महत्वाचा रस्ता म्हणून ओळखला जात असलेला तुरोरी, कासार शिरसी, निलंगा,निटूर, नळेगाव, घरणी मार्ग नांदेड जाणारा हा रस्ता उजेड जवळून जातो.नऊ नंबर हायवे वरून नांदेड ला जाणारा हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने या रोडवर वाहनांची दिवस रात्र मोठी वर्दळ सूरू असते.तर या परिसरातील गावांना तालुक्याच्या ठिकाणाला जोडणार हाच प्रमुख रस्ता असल्याने दुचाकी प्रवाशी वाहनांची सतत ये जा असते.
     या रस्त्यावर गेल्या काही महिन्यापासून खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता असा प्रकार झाला आहे. त्यात उजेड पाटी जवळच्या कॉर्नरवरील रस्त्यावर वस्ती मधील सांडपाणी व टाकीचे पाणी सरळ मुख्य रस्त्यावर येत आहे. या आलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून या खडयामध्ये पाणी साचत आहे. यामुळे रोड पूर्णतः पाणीमय होवून रस्ता चिखलमय झाला आहे.
    परिणामी या पाणी भरलेल्या खड्यांचा लहान मोठ्या वाहनधारकांना अंदाज येत नसून या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तर दुचाकी वाहनधारक या खड्डेमय पाण्यात घसरून पडत आहेत.हा मुख्य रस्ता खड्डयात आहे की रस्त्यात खड्डे पडले आहेत आजतागायत वाहनधारकाला कळले नाही या तारांकित प्रश्नांची उकल शाखा अभियंत्यांनी करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे , यात आता पर्यंत अनेक दूचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत.
त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी,अशी मागणी प्रवाशी व तालुक्यातील जनतेकडून  केली जात आहे.

लवकरच खड्डे बुजविले जातील.

या रस्त्या दुरुस्तीचे काम प्रक्रियेत आहे. या रोडवर पडलेल्या खड्याच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठाकडे मागणी करण्यात आली असून लवकर या रोडवरील खड्डे बुजविण्यात येतील.

रविंद्र पवार.... शाखा अभियंता.. शिरूर  अनंतपाळ.

तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतास चोवीस तास वीज पुरवठा करा: सरपंच संघटनेची मागणी.


शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी: फतेहअली खान पठाण
तालुक्यातील ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात पाणी साठा असताना विजवीतरण कंपनी कडून वीजपुरवठा अवेळी होत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही त्यासाठी सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या स्रोता जवळचा वीजपुरवठा चोवीस तास सुरू ठेवावा अशी मागणी विजवीतरण कडे सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे,
तालुक्यात प्रत्येक गावात सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या योजना कार्यन्वित असून नागरिकांना विजवीतरण च्या अडमुठी पणामुळे पाणी मिळत नाही ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर दिवसभर शेतीच्या कामात व्यस्त असताना वीजपुरवठा सुरू होतो आणि दुसऱ्या आठवढ्यात रात्रीच्या बारा वाजता वीजपुरवठा सुरू होतो ,आशा वेगवेगळ्या अडचणीमुळे जनतेला पाणी मिळत नाही आणि त्यात ग्राम पंचायत चे पाणीपुरवठा सेवक यांना सुद्धा रात्री बेरात्री पाणी पुरवठा चालू करण्यासाठी एक ते दोन की,मी,अंतरा पर्यत जावे लागत आहे तेही जोखिमेचे आहे आणि उन्हाळ्यासारख्या परिस्थितीत पावसाळ्यात ही पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याने विजवीतरण अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष वेधून नागरिकांना पाणी मिळावे हे धोरण अंगीकारुन सार्वजनिक ठिकाणी चे पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोताचे चोवीस तास वीज पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष हमीद पटेल यांनी केले आहे, या सोबत राम नलावडे ,जब्बार पटेल ,बाबूभाई शेख ,भागवत गड्डीमे ,माणिक गायकवाड यांनी सुद्धा विजवीतरण कंपनीला वीजपुरवठा खंडित करू नये अन्यथा आपल्या या अडमुठी धोरना विरोधात रस्त्यावर उतरू असा ही इशारा महावितरण ला यावेळी बोलताना दिला आहे ,

ई-कॉम एक्सप्रेस होम डिलिवरि नावाने ग्राहकांची लुट

जव्हार प्रतिनिधि:अनिल दिघा

अंतरराष्ट्रीय असलेले होम डिलिवरी करनारी कंपनि शहरापासुन ते ग्रामिणभागा पर्यत येवुन पोचली मुबईपासुन हाकेच्या अतरावर जव्हार तालुक्यात या कंपनिची शाखा आहे फ्लिपकार्ड,अँमझोन,व स्नपडील असा अनेक कंपनीकडुन ई-कॉम एक्सप्रेस होम डिलिवरी देत मात्र एखादे उत्पादन घेतअसतांना त्या उत्पादनावर वस्तुवर जादा पैसे घेतात
पण जव्हारतालुक्यातील या शाखेतील जे कामगार (डिलेवरी बॉय) फोनकरतात आणि  ते ग्राहकांना तालुक्या ठिकानी बोलावुन घेतात आणि ति वस्तु तालुक्याठिकानी देतात ग्राहकांची अशी तक्राद आहे कि होम डिलिवरीच्या नावाने ज्यादा पैसे कसेघेतात आम्हाला मागवलेली वस्तु तुम्ही घरी आणुन देत नाही परत आम्हाला तालुक्याठिकानी ति वस्तु देतात आणि ज्या दिवसी डिलेवरी बॉय फोन करतात त्याच दिवसी ति वस्तु घेतली पाहेजे दुसर्या दिवसी ति वस्तु घेन्यासाठी गेलेतर ते कामगार सांगतात की फोन केला त्याचदिवसी ति वस्तु मिळते आता मिळनार नाही
अशाप्रकारे ई-कॉम एक्सप्रेस हि कंपनी ग्राहकांची मानसिक व आर्थक फसवनु करते
अशा प्रकारची तक्राद ग्राहकानकडुन  केली जाते मात्र प्रसारमाध्यमांसी ग्राहकांने आपली व्याथा माडल्यानंतर तरी ते ग्राहकांची पिळवनुक करन्याचे थांबतील का?असा प्रश्न ग्राहकां समोर उपस्तीत झाला आहे

वाळूच्या टिप्परने रौंग साईट येवुन युवकास उडवले

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-मोहंमद ताहेर

अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोटारसायकल क्रमांक एम.एच.44 P 0717 वरून जाणाऱ्या युवकास वाळूच्या टिप्पर क्रमांक एम.एच.24 J 5448 ने वाहन चालक नामे तिरुपती शेषेराव देवकते वय 31 वर्ष ह्याने चिरडले. .ही घटना आज दिनांक 29/10/2020 रोजी दुपारी तीन च्या सुमारास घडली. इम्रान शेख रहीम (31) वर्ष रा.मंगळवार पेठ  असे जखमी झालेल्या युवकचे नाव आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग
णालय मध्ये प्रथम उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे. यामध्ये सदर युवकाच्या पायाला गंभीर इजा झाला आहे.
अंबाजोगाई शहराला बाह्यवळण रस्ताअसतानासुद्धा राजरोसपणे वाळूची टिप्पर किंवा मोठी वाहन शहरातून जाताना दिसतात. याकडे  पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. इथून पुढे किमान खबरदारी म्हणून अवजड वाहने शहरांमधून प्रवेश देण्यात येऊ नये. याची खबरदारी पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा अपघातांची पुनरावृत्ती होणार नाही.अशी नागरिकांकडुन  मागणी होत आहे

Monday, October 26, 2020

नूतन वरिष्ठ सहाय्यक (लेखा) अनिल बिराजदार यांचे स्वागत व सत्कार संपन्न


अक्कलकोट प्रतिनिधी: देवेंद्र कोळी

अक्कलकोट:-अक्कलकोट तालुका पंचायत समिती अर्थ विभागात आमचे मार्गदर्शक मित्र श्री.अनिल बिराजदार साहेब वरिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदावर रुजू झाले.यावेळी अनिल बिराजदार साहेबांचा सत्कार अ.कोट तालुका प्राथ.समितीच्या वतीने अ.कोट तालुका पंचायत समितीचे मा.गटविकासाधिकारी महादेव कोळी साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी मा.सहाय्यक गटविकासाधिकारी ऐवले साहेब,प्रशासन अधिकारी गुरव साहेब,निकम भाऊसाहेब,अभिमन्यू कांबळे भाऊसाहेब,अर्थ विभागातील काळे मॅडम,नदाफ भाऊसाहेब आणि अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे प्रसिद्धीप्रमुख अमोल बोराळे,दयानंद चव्हाण आदी.उपस्थित होते.

मौजे पेठशिवणी येथे शासकीय जागेवर पालम तालुक्यासाठी आ.रत्नाकर गुट्टे यांनी एमआयडीसी निर्माण करावी-आनीस भाई खुरेशी


पालम/प्रतिनिधी

पालम तालुक्यातील मौजे पेठशिवणी येथे शासनाची मोठ्याप्रमाणावर जमीन असून मौजे पेठशिवणी येथे आ.रत्नाकर गुट्टे यांनी भव्यदिव्य एमआयडीसी निर्माण करावी अशी मागणी पत्रकार अनिस भाई खुरेशी यांनी केली आहे. पालम तालुका हा ऐतिहासिक तालुका असून निजाम काळातही तालुक्याचे मुख्य ठिकाण होते मराठवाडा मुक्तिसंग्राम नंतर राजकीय षड्यंत्र रचून पालम शहरातील तहसील कार्यालय गंगाखेड येथे चोरून गंगाखेडला पालमचा दर्जा दिला.पालमचा तालुक्याचा दर्जा काढून गंगाखेडला दिला गेल्यामुळे पालम शहरातील विविध धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन संघर्ष करून 1992 ला पालम शहराला तालुक्याचा दर्जा मिळविला पालम तालुक्यात झाला पासून आजपर्यंत कोणतेही मोठे उद्योग मोठे प्रकल्प पालम तालुक्यात दिसत नाही हा एक राजकीय षड्यंत्र म्हणावा लागेल.पालम तालुका गेल्या अनेक वर्षापासून अविकसीत तालुका राहिलेला आहे. पालम तालुका चार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागावर आहे. पालम तालुक्यातून चारही जिल्ह्याचे ठिकाण भौगोलिक दृष्ट्या जवळ असून पालम तालुक्यात शासनाने एमायडिसी निर्माण करावी पालम तालुक्यात विकासाची गंगा येण्यास वेळ लागणार नाही यासाठी 97 विधानसभाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पुढाकार घेऊन पालम तालुक्यातील एमआयडीसी मौजे पेठ शिवणी येथे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे खुले आव्हान पुरोगामी पत्रकार संघाचे पालम तालुका कार्याध्यक्ष अनिस भाई खुरेशी यांनी केले आहे.

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनेअंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल व कर्मचाऱ्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लातूर जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली

लातूर प्रतिनिधी: अहेमद तांबोळी

अंबाजोगाई येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे  अधिकारी आशुतोष बारकुल व कर्मचारी मिळून नागरिकांसोबत पैशाची फसवणूक करत आहेत लर्निंग लायसन काढण्यासाठी नियमांचे उल्लंघन करून जास्त पैसे लाच स्वीकारत आहेत लाच दिल्याशिवाय हे अधिकारी कामच करत नाहीत या अधिकारी व कर्मचारी वर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करावा व अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहेत लर्निंग लायसन्स काढण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला बसविण्यात आलेले आहेत लर्निंग लायसन काढण्याकरिता नागरिकांकडून पाचशे रुपये लाच घेत असून त्यांना चुकीच्या पद्धतीने लर्निंग लायसन देण्याचे काम गेल्या दोन-तीन वर्षापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चालू आहे मूळ लायसन्स पोस्टद्वारे न पाठवता पन्नास रुपये पोस्टची पावती घेऊन सदर लायसन ग्राहकांना रुपये घेऊन वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी करत आहेत वारंवार आपल्या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीआपण त्वरित या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने 8.11.2020 रोजी आमरण उपोषण करण्यात येईल अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे मराठवाडा संपर्क प्रमुख पत्रकार.मोहम्मद ताहेर मोहम्मद सत्तार यांनी केली याप्रसंगी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे लातूर शहर कार्याध्यक्ष पत्रकार अहेमद तांबोळी. झुंजार नेता लाइव चैनल चे प्रतिनिधी पत्रकार प्रसेनजित आचार्य उपस्थित होते.

मौजे पेठशिवणी येथे शासकीय जागेवर पालम तालुक्यासाठी आ.रत्नाकर गुट्टे यांनी एमआयडीसी निर्माण करावी-आनीस भाई खुरेशी


पालम/प्रतिनिधी

पालम तालुक्यातील मौजे पेठशिवणी येथे शासनाची मोठ्याप्रमाणावर जमीन असून मौजे पेठशिवणी येथे आ.रत्नाकर गुट्टे यांनी भव्यदिव्य एमआयडीसी निर्माण करावी अशी मागणी पत्रकार अनिस भाई खुरेशी यांनी केली आहे. पालम तालुका हा ऐतिहासिक तालुका असून निजाम काळातही तालुक्याचे मुख्य ठिकाण होते मराठवाडा मुक्तिसंग्राम नंतर राजकीय षड्यंत्र रचून पालम शहरातील तहसील कार्यालय गंगाखेड येथे चोरून गंगाखेडला पालमचा दर्जा दिला.पालमचा तालुक्याचा दर्जा काढून गंगाखेडला दिला गेल्यामुळे पालम शहरातील विविध धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन संघर्ष करून 1992 ला पालम शहराला तालुक्याचा दर्जा मिळविला पालम तालुक्यात झाला पासून आजपर्यंत कोणतेही मोठे उद्योग मोठे प्रकल्प पालम तालुक्यात दिसत नाही हा एक राजकीय षड्यंत्र म्हणावा लागेल.पालम तालुका गेल्या अनेक वर्षापासून अविकसीत तालुका राहिलेला आहे. पालम तालुका चार जिल्ह्याच्या सीमावर्ती भागावर आहे. पालम तालुक्यातून चारही जिल्ह्याचे ठिकाण भौगोलिक दृष्ट्या जवळ असून पालम तालुक्यात शासनाने एमायडिसी निर्माण करावी पालम तालुक्यात विकासाची गंगा येण्यास वेळ लागणार नाही यासाठी 97 विधानसभाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पुढाकार घेऊन पालम तालुक्यातील एमआयडीसी मौजे पेठ शिवणी येथे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे खुले आव्हान पुरोगामी पत्रकार संघाचे पालम तालुका कार्याध्यक्ष अनिस भाई खुरेशी यांनी केले आहे.

Sunday, October 25, 2020

ग्रा.पं. हेळंबच्या वतीने हेळंब नगरीचे सुपुत्र तथा सा. बां. विभाग कार्यकारी अभियंता सत्कारमुर्ती

वलांडी प्रतिनिधी: सगीर मोमीन

ग्रा.पं. हेळंबच्या वतीने हेळंब नगरीचे सुपुत्र तथा सा. बां. विभाग कार्यकारी अभियंता सत्कारमुर्ती श्री.शकंरराव नागोराव सावंत यांचा सेवानिवृत्तीबाबत नगरीचे प्रथम *लोकनियुक्त सरपंच श्री.सावंत गोरख बालाजीराव यांच्या हस्ते महापुरूष स्वामी विवेकानंदाची मुर्ती,शाल हार व फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती गावातील सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष *श्री.कालिदासजी माने*,उपसरपंच श्री.दयानंद लाटे,पोलिस पाटील श्री.माधव कंजे,माजी सरपंच श्री.गुणवंतराव सावंत,महात्मा फुले शेतकरी बचतगटाचे सचिव श्री.शशिकांतजी शिंदे सर,ह.भ.प.रघुविर महाराज,श्री.शञगुण हेरकर,शा.व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.नामदेव सिरसे,श्री कुमार पाटील, श्री प्रदीप कारभारी,श्री.सुरेश शिंदे,श्री व्यकंट दंडवते,श्री सिध्देश्वर लाटे,श्री ईलाही मुल्ला,श्री.लक्ष्मण हेरकर,श्री. कचरू देशमाने,श्री.सुरेश पवार,ग्रा.प.सेवक श्री.रहिम मुल्ला,श्री.राजकुमार गगंथडे,  *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विठलराव महानुरे सर,आभार प्रदर्शन श्री.प्रभाकरजी लाटे सर यांनी मानले*

Friday, October 23, 2020

सातनदुधनी येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची पुर परिस्थितीची पाहणी.


सातनदुधनी प्रतिनिधी: देवेंद्र कोळी

अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन कल्याणशेट्टी  यांनी सातनदुधनीसह बबलाद, तळेवाड येथे पुरग्रस्थ भागाची पाहणी करुन शेतकरी व गावकरी यांचेशी संवाद साधला.

महिला सफाई कामगारांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस महिला नगर अध्यक्षा मात्र झोपीतचं !


(मोहंमद ताहेरअंबाजोगाई तालुका प्रतिनिधी)

अंबाजोगाई नगर पालिकेत १६ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ८ महिला सफाई कामगार,ज्यानी अंबाजोगाई नगर पालिकेस तब्बल तीन वेळा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळुन दिला ,कोरोंना सारख्या माहामारित कसल्याही प्रकारचे संरक्षण साहित्य नसतांना देखील शहरातील सर्व शहरवासीयांची आरोग्याची काळजी घेत अंबाजोगाई शहर स्वच्छ ठेवले आज मात्र त्याच्यावर  उपासमारीची वेळ आली आहे
*त्यांना गेल्या काही दिवसांपासून कामावर कमी करण्यात आले आहे,त्यांना सामान कामासाठी पुरुषानं प्रमाणे समान वेतन दिले जात नाही,त्याचा थकित पगार सुध्दा अध्याप मिळालेला नाही*अंबाजोगाई नगर परिषदला या महिला सफाई कामगारांची सन २००७ पासुन  कसलेही नोंद करण्यात आलेली नसुन*
या आठ महिला स्वता:हाच्या आणि कुटुंबाच्या निर्माण झालेल्या पोटाचा प्रश्न सुटावा म्हणुन मागील चार दिवसापासुन उपोषणास बसले आहेत
त्यांच्यापैकी दोन महिलांची परिस्थिति अतिशय खालावली असुन *अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा मात्र झोपेतच आहेत*,,,

त्यांना समान कामासाठी समान वेतन मिळावे,त्याची नगर पालिकेच्या रजिष्टरला सफाई कामगार म्हणुन नोंद करण्यात यावीत
पुढील करारात त्याचा समावेश करण्यात यावा आणि त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणुन त्यांचे थकित वेतन तात्काळ अदा करण्यात यावे.
अशी मागणी या‌महिला सफाई कामगार  आपल्या उपोषणाद्वारे नगर पालिका प्रशासनास करीत आहेत

Thursday, October 22, 2020

माहीतीचे शुल्क पगारीतून कपात करून निलंबनाची कारवाई करा : निलेश चाळक यांच्या तक्रारीची दखल :उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या अवर सचिवानी काढले कामगार आयुक्तांना पञ


बीड प्रतिनिधी

येथील माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी  दि,06/06/2018 रोजी जनमाहीती अधिकारी,महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळ,मुंबई यांच्या टपालाव्दारे माहीती अधिकार अर्ज देवून माहीती मागितली होती जनमाहीती अधिकारी बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी सरकारी कामगार अधिकारी बीड यांना माहीती अधिकार अर्ज वर्ग केला सरकारी कामगार अधिकारी बीड यांनी 16 महीण्यानतंर माहीती अधिकार अर्जावर मोघम पञव्यवहार केला आहे त्यामुळे सरकारी कामगार अधिकारी बीड संबधित दोषीच्या पगारीतून माहीतीचे शुल्क कपात करून निलबंनाच्या कारवाई ची तक्रार कामगार विभागाकडे आपले सरकार पोर्टलवरून केली होती तक्रारीची दखल कामगार विभागाच्या अवर सचिवानी घेत कामगार आयुक्तांना कारवाई साठी पञ काढले आहे
माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी तक्रारीत म्हटले आहे की  जनमाहीती अधिकारी,महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कामगार मंडळ, मुंबई यांनी माझा अर्ज माहीती अधिकार अधिनयम 2005 कलम 6(3) नुसार पाच दिवसात वर्ग करणे गरजेचे होते पंरतू जनमाहीती महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई,यांनी तब्बल 18 ते 19 दिवसानी अर्ज कलम 6(3) अन्यव्ये अन्यप्रधिकरणाकरणाकडे माझा अर्ज हस्तांतरीत केला आणि महाराष्ट्र ईमारत व बांधकाम कामगार मंडळ मुंबई यांच्याकडून सरकारी कामगार अधिकारी बीड यांनी अर्ज मिळल्यानतंर 30दिवसात अर्जावर कारवाई करून माहीती देणे गरजेचे होते पंरतू जनमाहीती अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी बीड यांनी माझ्या अर्जावर  कोणती ही कारवाई केली नाही आणि माहीती ही दिली नाही त्यामुळे दि,    05/10/2019     रोजी महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याकडे माहीती न सरकारी कामगार अधिकारी बीड यांच्यावर सेवाहमी व दंफ्तर दिंरगाई कायद्यान्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी तक्रार ईमेलव्दारे दाखल केली होती सदर तक्रार दाखल केल्यानतंर तब्बल सोळा महीण्यानतंर 15/11/2019 रोजी जनमाहीती अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी बीड यांनी मला मोघम स्वरूपाच्या पञामध्ये विषयामध्ये नमुद केले होती कि, माहीतीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 6(3) अन्वये अर्ज हस्तंतरणाबाबत असे नमुद केले होते पंरतू अर्ज कोणाकडे हंस्तातरित करण्यात आला आहे याबाबत स्पष्ठ उलेख नव्हता आणि त्याखाली नमुद केले होते कि आपण मागणी केली माहीती अंदाजे  58132 पानाची असून माहीती अवलोकनासाठी आपण कार्यालयीन वेळेत कार्यालयात यावे असे कळविले त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या 1)शासन परिपञक  क्रं ,केमाअ-2008/प्र.क93/08/सहा (मा.अ)समान्य प्रशासन मंञालय मुंबई, दि,06/09/2008 सांकेतिक क्रं :-20080906142736001माहीती अधिकार अधिनियम 2005 अतर्गंत प्राप्त होणार्या अर्जासंदर्भात अकिफायतशिर पञव्यवहार टाळून विहीत मुदतीत अर्ज निकाली काढण्याबाबत
2)शासन परिपञक क्रं. संकिर्ण 2017/प्र.क्र(208/17)सहा मंञालय मुंबई दि,17/11/2017 सांकेतिक क्रं:-201711171132293007 माहीती च्या शुल्काची रक्कम अर्जदारास टपाल खर्चासह कळविणेबाबत आणि माहीती अधिकाराशी संबधित पञव्यवहाराचा अढावा घेवून त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतुद करण्याबाबत
3)शासन परिपञक क्रं : संकिर्ण -2018/ प्र.क्र 81/18(र.व.का ) मंञालय मुंबई दि,30/05/2018 सांकेतिक क्रं :-201805301130518207 पञलेखनाबाबत कार्यालयिन कामकाज नियमपुस्तिकेतील तरतूदीचे पालन करण्याबाबत
4) सामान्य प्रशासन विभाग मंञालय मुंबई शासन परिपञक क्रं :-संकिर्ण 1005/566/प्र.क्र.30/2005/18(र.व.का)दि 16/06/2005
5)सामान्य प्रशासन विभाग,मंञालय,मुंबई शासन,परिपञक,क्रं :-संकिर्ण 2016/प्र.क्र.29/18(र.व.का)दि,10/02/2016 या
शासनपरिपञकाचा व सेवा हमी कायदा दफ्तर दिंरगाई कायदा यांचा भंग जनमाहीती अधिकारी तथा सरकारी,कामगार अधिकारी बीड यांनी व संबधित दोषी अधिकारी यांनी केला आहे त्यामुळे मला 58132 पानाची माहीती विनामुल्य टपालाव्दारे देण्यात यावी व 58132 पानाच्या माहीतीचे शुल्क जनमाहीती अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी बीड यांच्या व संबधित अधिकारी यांच्या पगारातून कपात करावे आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दि04/07/2020 रोजी आपले सरकार पोर्टलवरून कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे केली होती तक्रारीची दखल घेत कामगार विभागाचे अवर सचिव यांनी कामगार आयुक्त यांना पञ काढून कारवाई करण्याबाबत कळविले आहे सदर प्रकरणांत कामगार आयुक्त काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे

Wednesday, October 21, 2020

एकच व्यक्ती दोन नावाने शासनाची करतो लूट आसाराम नावाने नौकरी तर अशोक नावाने राशन दुकान! तीन महिन्याचे जनतेचे राशन विकले काळ्याबाजारात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्रीकडे केली मागणी


लातूर शहर प्रतिनिधी: अहेमद तांबोळी

शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी ता.पाथरी जि. परभणी येथे कार्यरत सेवक अशोक सोपान नखाते यांनी आसाराम सोपान नखाते या खोट्या नावाने टीसी व जन्म प्रमाणपत्र व इतर खोटे कागदपत्रे तयार करून संबंधित शाळेत नौकरी मिळवून लाखो रुपये पगार शासनाची प्राप्त करून शासनाची फसवणूक मोठा भ्रष्टाचार केला आहे तसेच सदर सेवक शाळेत वेळेवर ड्यूटी न करता रेशन दुकानावर व्यापार करतो शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक नातलग असल्याने संगणमत करून हजेरीपटावर खोटी सही करून पगार घेऊन शासनाची फसवणूक व मोठा भ्रष्टाचार केला आहे.
सदर व्यक्तीचा रेशन दुकान असून सन 2018 मध्ये फरवरी, मार्च, एप्रिल महिन्याचे गहु, तांदूळ, साखर शासनाकडून एकूण 523.14 क्विंटल प्राप्त करून हदगाव व जवळा झुट्टा रेशन कार्डधारकांना वाटप न करता काळ्याबाजारात विक्री करून गोरगरीब जनतेची व शासनाची फसवणूक केली आहे व मोठा भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे सदरील व्यक्तीची सीबीआय व सीआयडी मार्फत चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व अशोक सोपान नखाते यांच्या वर FIR नोंद करून व्याजासह रक्कम शासन तिजोरीत जमा करावी अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी मुख्यमंत्री व मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांच्याकडे केली आहे जर या तक्रारी ची दखल न घेतल्यास न्याय मागण्यासाठी सक्षम न्यायलयात जाणार असे तक्रारी निवेदनात नमूद केले आहे.

Monday, October 19, 2020

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तांची कमतरता

अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी : मोहम्मद ताहेर

आपल्या शहरातील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोज हजारो रुग्ण उपचार घेतात, त्यापैकी बरेच रुग्णांना रक्त लावण्याची आवश्यकता भासते, मात्र रुग्णालयाच्या रक्तपेढीत रुग्णाच्या नातेवाईकांनी रक्ताची मागणी केली असता प्रत्येक रुग्णांच्या नातेवाईकांना आधी रक्तदान करा मगच तुमच्या रुग्णाला रक्त मिळेल अथवा नाही,असे सांगण्यात येत. आश्या कितीतरी रुग्णाच्या तक्रारी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती कडे रुग्णाच्या नातेवाईकां कडून करण्यात आल्या. 
      त्यासाठी आम्ही रुग्णालय प्रशासनास स्वतः रक्तदान करून अशी विचारणा करतो कि एवढ्या सेवाभावी संस्थांनी, पक्ष, संघटनांनी शिबिराच्या माध्यमातून दान केलेले रक्त अखेर जाते कुठं ? खाजगी रक्तपेढीतून रक्त आणा असे प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकास का सांगण्यात येते ?  जर एखाद्या रुग्णासोबतचा नातेवाईक वृद्ध, अशक्त असेल तर त्यालाही हीच अट घातल्या जाते ? हे योग्य आहे काय मा. अधिष्ठाता साहेब,,,
आपण सामान्य नागरिकांच्या या तक्रारी कडे लक्ष देणार का,,?

*मोहंमद ताहेर मोहंमद सत्तार*
*मराठवाडा संपर्क प्रमुख*
*अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, महाराष्ट्र राज्य*

मयत दफनविधीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करून देणे अन्यथा मनपा परिसरात दफनविधी करण्यात येईल! सरफराज मनियार मित्र मंडळ यांची निवेदनाद्वारे मागणी


लातूर (अहेमद तांबोळी* ) 
कोरोना बाधित रूगनांच्या मयत करन्या करिता जागा शिल्लक नाही म.न.पा.प्रशासनाने तात्काळ जागा उपलब्ध करून ध्यावी अन्यथा कोरोना रूग्णां चे दफनविधी म.न.पा.परीसरात करन्यात येईल मनपा प्रशासनाने तात्काळ दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी
सरफराज मणियार मित्र मंडळ यांनी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे नीवेदन द्वारे केली. याप्रसंगी सरफराज भाई मणियार.एड.मुहम्मद अली शेख.एड.सरफारज पठान.करीम पठान.मुस्तफा सय्यद.अनवर शेख.सादिक शेख.फेरोज भाई टिल्लू.मुजाहीद खान.इस्माईल फुलारी.ईरफान शेख.आदी उपस्थित होते

ग्रामीण रूग्णालय ते मनूर, मंजरथ रस्त्याची दैना फेडा अन्यथा अंदोलन अ.अ.भ्र.विरोधी समीती.


माजलगाव(प्रतिनिधि )

माजलगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या पुर्वे कडून शासकीय धान्यांच्या गोडाऊन पासुन जाणारा माजलगाव ते मंजरथ हा पक्का रस्ता हा गेल्या तीस,पस्तीस वर्षा पुर्वीचा असुन हाच तालुक्यातील मनुर,मनुरवाडी, डेपेगाव,लुखेगाव, गोविंदपुर, सांडसचिंचोली ,आळसेवाडी, मंजरथ या गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. याच रस्त्याने शासनाकडून तिर्थक्षेत्र म्हणून मनूर येथील रेणूका देवी व मंजरथ येथील प्रसिद्ध दक्षिण काशी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. परंतु जवळपास गेल्या दहावर्षा पासुन या रस्त्यावारती वाळु वाहतुकी मुळे जागो जगी रस्त्यावारती खड्डे पळल्यामुळे  प्रवास करणार्‍या व्यक्तीचे पाटीचे मणके मोकडे होत आहेत  .तसेच  देखरेख झाली नसल्याने अनेक ठिकाणी रस्ता खचून गेला आहे आणि त्यावर के.जी.दालमील च्या जवळ असलेल्या मोठ्या नाल्यावरील पुल खराब व कमी उंचीचा असल्याने चारचाकी वाहनांना त्यावरून येणे जाणे धोकादायक झाले आहे. तसेच त्याच्या नाल्यातील घाण पाणी आजुबाजुला असलेल्या नागरीवस्ती मध्ये घुसत असल्याने त्याभागातील नागरिकांच्या आरोग्यास रोगराई चे निमंत्रण देण्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  अंरुध पुल असल्यामुळे   नालचे पाणी रस्तावरुन वाहत आहे ,    सदरील रस्ता दुरुस्त करून डांबरीकरण करावे तसेच त्या पुलाची उंची वाढवून घाणपाण्याने होणाऱ्या रोगराईला प्रतिबंध करून नागरिकांना उपकृत करावे.तसेच या गांव जान्यस एक हि नाव फलक नाही भावीभक्त ना मंजरत ला ईचार पुस करावी लागते तसेच आता दासर असल्यामुळे भक्ताची वार्दळ असते  ,या पूर्वी माजलगावचे आमदार श्री.प्रकाश दादा सोळंके यांनी बस मध्ये प्रवास करून हा माजलगाव मंजरथ रस्ता दूरूस्त करू असे अश्वासन दिले होते.परंतू अजून या वर काहिच हालचाल दिसून येत नाही.यावर रस्त्यावारती तात्काल कही  उपाय योजना अधोरेखीत प्रशासकीय अधिकार्‍यांनी करावी.  समस्त सात आठ गावे व स्थानिक लोकांची हेळसांड थांबवून जि.प.उपअभियंता यांनी वेळीच दखल घेतली नाहितर स्थानिक नागरिकांना सोबत घेवून तिव्र स्वरूपाचे अंदोलन करू असा प्रसिद्धि पञकाद्वारे  आरेफ खान, मुस्ताक कुरैशी,अशोक ढगे.मोसिन.आलीशेर कुरैशी. बागवान.अजीम कुरैशी,आजम ,नाजेर भाइ,प्रकाश पांढरे,व इतर स्थानिक लोकांनी दिले आहे.

दत्तात्रय परळकर यांची प्रतिवीर पत्रकार कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड*


प्रतिवीर पत्रकार कर्मचारी सहकारी पतसंस्थेची घटस्थापनेच्या मुहूर्तावर स्थापना

सोलापूर (प्रतिनिधी)  : येथील दैनिक प्रतिविर या वृत्तपत्राच्या पत्रकार व कर्मचारी यांच्यासाठी प्रतिवीर पत्रकार व कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली असून या संस्थेच्या अध्यक्षपदी संपादक चंद्रशेखर लालप्पा गायकवाड यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. तसेच सचिव म्हणून मारुती दत्तात्रय गवळी तर ज्येष्ठ संचालक म्हणून प्रदीप देविदासराव कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर विलास चांगदेव मस्के, गजानन संजय जोशी, संदीप विठ्ठल विदुर, अनंत उत्तमराव साखरे, धनंजय देविदास घोगरे, दत्तात्रय गणपतराव परळकर यांची संचालक म्हणून कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे.*

Sunday, October 18, 2020

कुसुमवत्सल्य फौंडेशन प्रस्तुत आणि सहारा प्रोडक्शन हाउस यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच *महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२०* ही व्यक्तिमत्त्व स्पर्धा घेऊन येत आहोत.



एकविसाव्या शतकातील स्त्रीचे सशक्त रूप जगासमोर येण्यासाठी आणि आजच्या युगातील स्त्रीला मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करत आहोत.

या स्पर्धेचे हे पहिले वर्ष असून कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व महिलांना संसार आणि घरकाम यात गेले सहा महिने अडकून रहावे लागले त्यातून त्यांना ऊर्जा प्राप्त होण्यासाठी विरंगुळा म्हणून ही स्पर्धा खास महिलांसाठी आयोजित केली आहे.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन होणार आहे, सर्व स्पर्धकांना व्हिडिओ कॉल द्वारे मेकअप, रॅम्पवॉक, स्वतःची माहिती, इत्यादी साठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या नंतर त्यांची व्हिडिओ द्वारे अंतिम फेरीसाठी निवड होईल.

अंतिम फेरीतील २० स्पर्धकांना महाबळेश्वर येथे ३ दिवस  प्रशिक्षण देण्यात येणार आहे.अंतिम स्पर्धकांसाठी फोटोशूट , रॅम्पवॉक , प्रश्न - उत्तरे , वक्तृत्व, निबंध अशा विविध पातळीवर स्पर्धा होईल. त्यातून अंतिम फेरीसाठी विजेते निवडले जातील.

लवकरच नवरात्र येत आहे...स्त्री सुद्धा देवी प्रमाणेच अष्टभुजा , दशभुजा आहे.घर, नोकरी, व्यवसाय सांभाळत असताना तिला सामाजिक भान देखील असतेच. स्त्री च्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंना या स्पर्धेद्वारे व्यासपीठ मिळवून देण्याचा,तिच्या कलागुणांना वाव मिळावा व तिचा आत्मविश्वास दृढ करण्याचा संकल्प या स्पर्धेद्वारे असल्याचे कुसुमवत्सल्य फौंडेशनच्या अध्यक्ष सौ वैशाली पाटील यांनी सांगितले.

प्राथमिक व अंतिम फेरी तील स्पर्धकांना प्रसिद्ध ग्रूमिंग प्रशिक्षक जुई सुहास प्रशिक्षण देणार आहेत.
अंतिम स्पर्धेसाठी फॅशन, चित्रपट,  सामाजिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर परीक्षक म्हणून लाभले आहेत.
कलानिकेतन एंटरटेनमेंटस् या  इव्हेंट ची व्यवस्था पहात असून
सहारा प्रोडक्शन हाउस, राजेंद्र भवाळकर आणि सुप्रिया ताम्हाणे यांचे ही सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे
महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२० मध्ये भाग घेण्यासाठी 8625919183 जुई अनिकेत सोनटक्के यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पाऊस आला धाऊन वडगावचा पुल गेला वाहुण : सरपंच रमेशराव नेहरकर दर्जेदार पुल करण्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी ग्रामस्थ


बीङ प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक या गावाच्या शेजारील नदीवरील पुलावर पुर आल्याने रस्त्यावरचा मेन पुलच वाहुन गेल्याने ग्रामस्थाना मोठी करसरत लागत आहे तात्काळ नविन दर्जेदार नदीवर पुल करण्यात यावे अशी मागणी सरपंच रमेशराव नेहरकर यानी पञकारांशी बोलताना केली असुन तसे पञ व निवेदन संबंधित विभागाला दिले असुन सुध्दा अध्याप कुठलीच प्रक्रिया झाली नसल्याने गावकरी संताप व्यक्त करत आहेत

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक या गावात रस्ते विज पाणी यासह भरपुर विकास कामे झाले माञ गावात प्रवेश करण्या आगोदर मेनरोडरव असणार्या कच्चा पुल झालेल्या आवकाळी पाऊसामुळे पुर आल्याने पुल वाहुण गेला असुन पुलावर खड्डेच खड्डे पङले असुन या पुलामुळे तासनतास वाहतुकीस आजथळा होत असुन पालकमंञी महोदय मा धनंजयजी मुंढे साहेब, माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब, मा बीङ  जि प अध्यक्ष विजयसिंह पंडीत साहेब याच्या नेञत्वाखाली संबंधित अधिकारी व विभागाला पञ व निवेदन दिले  आहे अशी माहीती सरपंच रमेशराव नेहरकर यानी दिली आहे सरपंच नेहरकर म्हणाले की गावा शेजारी दोन नद्यावर मजबुत नविन पुल करण्यात यावे अशी मागणी सरपंच रमेशराव यानी केली वडगाव ढोकच्या सर्वागिण विकासासाठी आपन नेहमी प्रयत्न शिल आहोत आता पर्यंत विस वर्षात जेवढा विकास झालेला नाही तेवढा माझ्या कार्यकाळात झाला असुन संपुर्ण  गावात  सिमेंट रस्ते मेन रोड व गल्यात प्युर ब्लाॅक आणी नाल्या दुरुस्ती व नविन नाल्या हायमॅक्स लाईट व सौर दिवे ताडे वस्ती वर विविध विकास कामे आंगणवाङी रंगरंगोटी डिजीटल खेळणी गॅस वाटप रमाई घरकुल वाटप व तसेच नविन सिंमेट रस्ते लवकरच होणार असुन बंजारा सार्वजनिक विहीर पांदन रस्ते खड्डीकरण व मुरुम रस्ते करण्यात येणार आहेत स्वच्छालय हगंदारीमुक्तीकङे वाटचाल , कोरोणा मध्ये किराणा किट वाटप केले ऑक्सो मिटर थरमल गण ने घरो घरी जावुन तपासणी केली व जनजागृती नविन पाईपलाईन दुरुस्ती मोटर व फक्त पन्नास रुपये घर पट्टीत दररोज पाणी उपलब्ध ऑरो प्लॅट लवकरच व तसेच नविन पाणी पुरवठा काम करणार येणार आहेत अशी माहीती सरपंच रमेशराव नेहरकर व उपसरपंच बजरंगब बोरडे व सर्व ग्रा प सदस्य यानी दिली आहे यापुढे गावात प्रा आ केद्र व ग्रापंचायत ईमारत वाचनालय क्रिडा मंडळ असे कामे करण्यास आपन प्रयत्न करणार आहोत असे ही सरपंच रमेशराव नेहरकर यानी आवर्जून सांगितले आहे

सावित्रीबाईफुले विद्यालयातील नेहा चवरे यांचा सत्कार

कळंब तालुका प्रतनिधी :- सोहेल शेख

कळंब – तालुक्यातील हासेगांव (केज) येथील कुमारी नेहा सुरेश चवरे हिने वैद्यकीय पूर्व परिक्षा (NEET ) मध्ये ५५६ गुण घेवून यश संपादन केल्याबद्ल शिक्षक ज्ञानेश्वर तोडकर यांनी नेहाच्या घरी जावून दि.१७ ऑक्टोबर रोजी सत्कार केला .नेहा चवरे हिचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्राथमिक शाळा हासेगाव (केज) येथे झाले तर माध्यमिक शिक्षण सावित्रीबाई फुले विदयालय कळंब येथे झाले . सुरेश चवरे यांनी प्रतिकुल परिस्थितीत नेहाचे शिक्षण पूर्ण केले . सुरेश चवरे हे शेतकरी असून शेतीच्या बळावर त्यांनी आपल्या मुलीचे शिक्षण केले आहे. सध्या शेतात शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते तरी या संकटाना न घाबरता त्यांनी आपले ध्येय निश्चित केले.यावेळी सावित्रीबाई फुले विदयालयाचे शिक्षक काकासाहेब मुंढे,ज्ञानेश्वर तोडकर,जिवनसिंह ठाकूर,अशोक शिंपले आदींनी नेहाचा सत्कार केला.
सावित्रीबाई फुले विद्यालयाची नेहा चवरेचा सत्कार

Saturday, October 17, 2020

शासकीय कर्मचाऱ्यांकडून माहिती दडपण्याचा प्रयत्न ; पञकारांना धमकीची भाषा. राज्य-उपाध्यक्ष. प्रा. दशरथ रोडे.



बीड [प्रतिनीधी ] जिल्हातील केज शाखा   पुरोगामी पत्रकार संंघ  शाखाच्यावतीने  दि. 16 अॉक्टोबर  रोजी  शासकीय विश्रामगृह येथे विधी-कायदेशीर-सल्लागारांना  नियुक्तीपञ  या बैठकीत देण्यात आले.संस्थापाक अध्यक्ष मा. विजय सुर्यवंशी यांच्या आदेशावरुन संपुर्ण महाराष्ट्र कायदेशीर सल्ला देण्यासाठी विधीतज्ञ म्हणून एक विभाग तयार करुन पञकारांवर सतत हल्ले होत असल्यामुळे याची अत्यंत गरज आहे.

देशात व महाराष्ट्रात  शासकीय  निमशासकिय,कार्यालयातून वरिष्ट अधिकाऱ्यापासून ते कनिष्ठ व हंगामी नियुक्ती कार्यरत असलेले कर्मचारी  तसेच राजकिय नेत्यांच्या कार्यकर्त्यासह नेहमीच बातमी प्रसारित जर नाही केली. त्याबद्दल धमकीलासामोरे  जावे लागते. यावेळी शहरातील पोलीस-निरिक्षक व पोलीस-उप-निरीक्षक , तसेच पोलीस कर्मचारांकडून पञकाराला गुन्हा नोंद करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

शासकिय कर्मचारांकडून  शासकीय  कोणतेही कामाची चौकशीसाठी पञकार गेले की अयोग्य माहिती मिळते. तसेच पून्हा-पून्हा या कार्यालयातील माहितीसाठी आले तर शासनाच्या  वरिष्ट अधिकान्यांकडून व कर्मचारांकडून  शासकीय कामात अडथळा यांची राजरोषपणे  अन्यथा खंडणीचा गुन्हा  दाखल पञकारांना खोटे गुन्हे केली जातात . शासनाच्या कामाची माहिती यांना विचारणार तरी कोण ? राज्यात बांधकाम विभाग , रोजगार हमी योजना, घरकूल योजना , वेग-वेगळ्या कामाची योग्यरित्या मागणी केली तर  तो कर्मचारांकडून धमकीचे उत्तर मिळत. . पञकार आहोत तर पञकारांसारखे रहा . आम्हीला शासकिय काम केलेली माहिती देता येत नाही. असे त्या शासकिय कर्मचारांकडून नेहमी-नेहमीच अयोग्य  उत्तर मिळाल्यामुळेच पञकारांना  "  त्या  "शासनाकडून गोर-गरिबांना मिळणाऱ्या कामात जर आधिका-यांकडून व कर्मचारांनी कोट्यावधी रुपयांचा राजरोषपणे भ्रष्टाचार करणारे असतील तर त्या  कामाची वरिष्ट आधिका-यांपासून ते कनिष्ठ आधिका-यांपर्यत  सखोल  चौकशी करण्याचा अधिकाऱ्यांना जाब विचारण्याकरिता पञकारांना अधिकार आहे,

यालाच देशाचा व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पञकारांंना ओळखले जाते. आज  देशात लोकशाही, संविधान, सामान्य गोर-गरिब धोक्यात आहे. यांना वाचविण्यासाठी समाजातून सर्व-सामान्यांनी एकञ येवून लोकशाहीला व संविधानाला वाचविले पाहिजे.  देशाची लोकशाही व संविधानिकता मूल्य जोपासण्याकरिता सर्वांचीच लढा दिला पाहिजे.
कोणतेही  पञकार संघटना असो सर्व राग-लोभ , विसरुन तो पञकार संकटात आहे. त्याला सर्वांचीच एकञ येवून सहकार्य करावी हीच एकजूट पञकारांची असते. जेव्हा कोणतीही एकजूट होते.त्यावेळी त्या व्यक्तींना न्याय मिळतो.

आज देशात व राज्यात पञकार संघाने विधीतज्ञ किंवा कायदेशीर सल्लागार-पदी कोणत्याही पञकारा संघा'ने विभाग तयार केलेला नाही .  राज्यात वेळोवेळी पञकारांवर होत असलेले खंडणीचे आरोप, हल्ले, शासकीय  कार्यालयातील वरिष्ट अधिकान्यांकडून कोणत्याही कामाची चौकशी करण्यासाठी गेल्यावर पञकारांना शासकिय कामात अडथळा म्हणून धमकीचे शस्त्र  असे आरोप जाणून-बुजून  नगर-पालिका महानगरपालिका , तहसिल कार्यालय, इतर शासकीय  कार्यालयातून होत असलेले पञकारांना अडथळे हे थांबले पाहिजे. त्यामूळे   एकमेव पुरोगामी पञकार संघा'च्यातंर्गत महाराष्ट्र राज्य-विधी-कायदेशीर-सल्लागार समितीची स्थापना करावी लागली. पञकारांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी तालूका शाखेने सुध्दा दोन " विधीतज्ञ " विधी-कायदेशीर-सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा आधिकार त्या शाखेला देण्यात आला आहे,राज्य  विधीतज्ञ माजी न्यायमुर्ती मा. अॕड .बी. जी. कोळसे-पाटील यांची पुरोगामी पञकार संघा'च्यावतीने नियुक्ती करण्यात आली. तसेच राज्य सल्लागार माजी न्यायमुर्ती अॕड. अनिल वैद्य व अॕड संध्या राजपूत तर राज्यध्यक्ष अॕड योगेश बोबडे यांनी नियुक्ती केले. बीड जिल्हाचे   विधी-कायदेशीर-सल्लागार समिती'चे अध्यक्ष.
अॕड . शेख साजिद अब्दुल वाहेद , केज धारुर परळी गेवराई , बीड, माजलगांव अंबाजोगाई या तालूकामध्ये सुध्दा विधी-कायदेशीर-सल्लागार समिती'ची विधीतज्ञ कार्यरत आहेत . महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालूका विधी-कायदेशीर-सल्लागार-अध्यक्ष ,त्यासोबत कार्याकारणी सुध्दा संघटन  करण्याचे आधिकार दिले आहे .  संघाचे कार्य व पञकारांंना  राज्य-उपाध्यक्ष   प्रा. दशरथ रोडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा-उपाध्यक्ष, सूर्यकांत उदारे तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य-संघटक .भागवत वैद्य, मराठवाडा सचिव म्हणून स.का.पाटेकर तर विशेष उपस्थिती होते.  अॕड .सपाटे व शिवाजी दादा ठोंबरे होते.राज्यात निःपक्षपाती व निर्भीड  या संघाची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.राज्यभरात संघ पदाधिकारी बरोबर इतर क्षेत्रांतील लोकांना संधी देणारा संघ  आहे.  केज शाखाने संघासाठी विधी-कायदेशीर-सल्लागार केज तालूका अध्यक्ष पदी अॕड ए.एन.नागरगोजे तर सचिव अॕड. सी. एस. हंडीबाग यांची  निवड करुन त्यांना नियुक्तीपञ सुध्दा देण्यात आले. संघ वाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे मत राज्य संघटक भागवत वैद्य यांनी मांडले तर पत्रकारांनी निःपक्षपाती पणे  व निर्भीडपणे पत्रकारिता करून सर्व सामान्यांना न्याय मिळावा असे मत त्यांनी मांडले.यावेळीं  केज तालूका अध्यक्ष  राजकुमार धिवार यांनी मत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित घाडगे यांनी तर प्रास्ताविक  डी. एम.मुजमुले यांनी केले तर आभार नवनाथ पौळ यांनी केले.यावेळी अमोल सावंत,विशाल धिरे,अनिल जोगदंड संघाचे  पञकार व वरिष्ट  पदाधिकारी  उपस्थित होते.

ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना विनाअट सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या


आम आदमी पक्षाच्या वतीने सिल्लोडचे तहसीलदार श्री. विक्रम राजपूत यांच्या मार्फत प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी करून त्रीव आंदोलन छेडण्याचा इशारा

सिल्लोड (प्रतिनिधी) :- शेतकऱ्यांनी सालाबाद प्रमाणे शेतीमध्ये पेरणीपूर्व मशागत करून खते बी-बियाणे औषधे आदी सर्व हजारो रुपयांचा खर्च सोसुन पेरणी केली, पिकांची वेळोवेळी कास्तं केली. एवढेच नाही तर शेतातील पिकांना पोटच्या लेकराप्रमाणे जपले. परंतु परतीच्या पावसाने प्रचंड प्रमाणावर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हा हिरावुन जाऊन शेतकऱ्यांचे मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, मका आदी शेती पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. काही हताश शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे देखील उदाहरणे असून त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसानीचा पंचनामा केल्याचा गाजावाजा केला जात आहे, परंतु संबंधित विमा कंपन्या आणि इतर दबावतून संबंधित महसूल अधिकारी व कृषी विभागाचे संबंधित अधिकारी हे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यातच विमा कंपण्यांनी आणेवारी व इतर पळवाटांचा गैरफायदा घेऊन कट करून शेतकर्‍यांची घोर फसवणूक विश्वासघात केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान हे वास्तव असून परतीच्या पावसाने प्रचंड अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांमध्ये विमाधारक व बिगर विमाधारक असा भेदभाव न करता, पंचनामे व अटी शर्ती याचा खेळ न खेळता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. ज्या शेतकऱ्यांची नावे 7/12 उता-यात तांत्रिक कारणाने नाही, त्यांची स्वतंत्र यादी संकलित करून त्यांना देखील सरसकट नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना शेती पिकाचे नुकसानीची भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आम आदमी पक्षाच्या वतीने त्रीवर स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार, सिल्लोड श्री. विक्रम राजपूत यांचेमार्फत प्रशासनाला दिला असून निवेदनावर जिल्हा सहसंयोजक ॲड. शेख उस्मान शेख ताहेर, जिल्हा संघटनमंत्री अजबराव मानकर, सिल्लोड - सोयगांव विधानसभा संयोजक महेशकुमार शंकरपेल्ली, तालुका संयोजक डॉ. दत्तात्रय गोंगे, शहर संयोजक शेख रफीक अब्दुल रहीम, संघटनमंत्री इस्माईल शेख सलीम शेख, तालुका सहसंयोजक नजीर तडवी, आप पालक अघाडीचे असलम खान पठाण, शहर सचिव इम्रान देशमुख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मुस्ताक खा मेवाती, दौड फकीरा शेनफड, सुनील पाटील गुळवे, मुक्तार शहा मुसा शहा आदी पदाधिका-यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

शिरूर अनंतपाळ :महाविकास आघाडी ने लेखी अश्वश्नांतर आमरण उपोषण घेतले माघार ,


शिरूर अनंतपाळ ता,प्रतिनिधी : फतेह अली खान पठाण
नगर पंचायत च्या विविध कामाबाबत भ्रष्टाचार झाले बाबत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिकारी लातूर यांना दि,18 रोजी आमरण उपोषण करण्याचा निवेदन देऊन कळवले होते याची दखल घेत नगरपालिका प्रशासन अधिकारी शिवणे यांनी तहसील कार्यालय शिरूर अनंतपाळ येथे निवेदन कर्ते महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नगरपंचायत शिरूर अनंतपाळ मध्ये विविध कामात झालेल्या भ्रष्टाचाराची त्रिस्थरिय समिती गठीत करून चौकशी अंती जेजे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्यासाठी एक महिन्याचा अवधी घेऊन तसे लेखी पत्र निवेदन कर्त्याना देऊन शिवणे यांनी सांत्वन केले आहे त्या अनुषंगाने तूर्तास दि,18 रोजीचे आमरण उपोषण मागे घेतले आहे ,
शिरूर अनंतपाळ नगरपंचायत हद्दी मध्ये पन्नास फुटाचा रस्ता गटारीसाठी जिल्हा अधिकारी लातूर यांच्या आदेशाने झालेल्या पाणंद रस्ता मोजणीत तहसीलदार शिरूर अनंतपाळ यांच्याकडे झालेल्या सुनावणीत नगरपंचायत मध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न होऊन सुद्धा तालुका व जिल्हा प्रशासनाकडून दोषींवर कार्यवाही होत नसल्याने महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनी युवा नेते अनिल देवग्रे ,यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्याचे निवेदन जिल्हा अधिकारी लातूर याना देऊन कळवले होते ,
त्या अनुषंगाने दि,16 ऑक्टोम्बर 20 रोजी जिल्हा अधिकारी लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासन अधिकारी शिवणे यांनी नगरपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करत मुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ व इतर कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नगरपंचायत प्रशासनावर ताशेरे ओढले आणि झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अंती जेजे दोषी दिसतील त्यांच्या कडून रिकव्हरी करून घेतली जाईल अशी तंबी सुद्धा यावेळी शिवणे यांनी दिली या अगोदर जे झालं ते झालं पण यामध्ये कसलीच गय केली जाणार नाही असेही यावेळी शिवणे म्हणाले ,यापूर्वीही रस्त्याचे प्रकरण तहसीलदार यांच्या समोर सुनावणी साठी दोन वर्षे उलटली तरी संबंधितावर काहीच कार्यवाही झाली नाही आता या प्रकरणात काय निष्पन्न होईल चौकशी नंतर कळून येईल झालेल्या प्रकरणाचा तपास योग्य रित्या होईल की पूर्वी प्रमाणे 'तेरी भी चूप मेरी भी चूप असे होईल का अशी उलट सुलट चर्चा ग्रामस्थांकडून चर्चिली जात आहे ,
या बैठकीस युवा नेते अनिल देवग्रे ,सुधीर लखणगावे ,महेश फुलारी ,हत्तरगे ,ओम जक्तप ,संदीप धुमाळे ,महादेव आवळे ,प्रमोद धुमाळे ,अशोक कोरे ,बबन होनमाणे ,डॉ,अरविंद भातम्बरे ,ऋत्विक सागवे ,मुसा मुजेवार ,वीरभद्र बेंबल्गे ,आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहून लेखी आश्वासनानंतर उपोषण तूर्तास तरी मागे घेतले आहे ,

ग्रा,प,कर्मचाऱ्यांना शंभर टक्के मानधन मिळणार ,ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ ,


ग्रा,प,कर्मचाऱ्यांचा किमान वेतनासह सर्व प्रश्न मार्गी लावणार ,सूरज चव्हाण यांचे प्रतिपादन ,
ग्रा,प,कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी ग्राम विकास मंत्री महोदय व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक लावून प्रश्न निकाली काढणार ,संजय बनसुडे ,

शिरूर अनंतपाळ ता,प्रतिनिधी: फतेहअली खान पठाण
तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रा,प,कर्मचारी युनियन 4511 च्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के मानधन मिळावे ,व वसुलीची   अट रद्द करावी ,असे निवेदन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना देण्यात आले या निवेदनावर ग्रा,प,कर्मचाऱ्यांना नगर परिषद व जी,प,कर्मचाऱ्या प्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करणे ,शासनाने मु,का,अ, जिल्हा परिषद रायगड समिती यांनी दि,6 जून 2018 रोजी शासनास सादर ,यांच्या मार्फत दोन बैठका आयोजित केले आहेत ,त्या नुसार सदर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे ,ग्रा,प,कर्मचाऱ्यांना उपदान लागू करणे ,याबाबत 18 जाणे ,2018 च्या बैठकीस नमूद केले नुसार विभागाने प्रस्ताव सादर केला परंतु निर्णय परलंबीत आहे ,यावर धोरणात्मक निर्णय घ्यावा ,ग्रा,प,कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वसुलीची अट रद्द करून शासनाकडून मानधन देण्यात यावे ,भविष्य निर्वाह निधी उपलब्धता 15 व्या वित्त आयोगातून करावी ,ग्रा,प,कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटूंबियांना सुरक्षा कवच शासनाने द्यावे ,जी,प,व नगर पंचायत ,कर्मचाऱ्या प्रमाणे सवलती द्याव्या आशा मागण्याचे निवेदन ग्रा,प,कर्मचारी युनियन 4511 चे मराठवाडा अध्यक्ष दयानंद एरंडे ,लातूर जिल्हा अध्यक्ष नवनाथ नरवडे ,जिल्हा मार्गदर्शक प्रा,शेख महेताब ,जिल्हा उपाध्यक्ष राचुरे प्रकाश ,शिरूर अनंतपाळ ता,अध्यक्ष ज्ञानोबा कांबळे ,आदींनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व पाणी पुरवठा व स्वछता राज्य मंत्री संजय बनसुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुबंई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राज्याचे ग्राम विकास मंत्री मुश्रीफ साहेब यांच्या सोबत बैठक संपन्न झाली या बैठकीत ग्राम विकास चे उपसचिव बनकर साहेब ,पंचायत विभाग उपसचिव प्रवीण जैन साहेब राज्य मंत्री संजय बनसुडे साहेब व युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण व ग्रा,प,कर्मचारी युनियन चे पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये येत्या 20 ते 22 तारखे पर्यंत बैठक लावून कर्मचाऱ्याचे कांही प्रश्नावर निर्णय घेतला जाईल व किमान वेतनाचा प्रश्न मार्च नंतर विचारत घेऊन निकाली काढले जाईल असे आश्वासन मुबंई येथे दि,13 अक्टोब रोजी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी राज्य मंत्री बनसुडे साहेब व सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत हे आश्वासन दिले त्यामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले प्रश्न निकाली निघतील अशी प्रतिक्रिया ग्रा,प,कर्मचारी युनियन चे जिल्हा मार्गदर्शक शेख महेताब यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे ,
ग्रा,प,कर्मचाऱ्याने कोविड 19 च्या वाढत्या प्रदूर्भावत स्वतःची व कुटूंबाची कसलीच पर्वा न करता गावात कंटेन्मेंट झोन पासून ते दवंडी देऊन कोविड विषयी जनजागृती करणे ,गावातील आरोग्य अबाधीत ठेवण्यासाठी गटारी साफ करणे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पुरवठा करणे असे सर्व ग्राम पातळीवरील जोखमीचे कामे हे सेवक करतो अन पगार मात्र 2500 रु म्हणजे "खोदा पहाड ,अन निकला चुहा ,अशी गत ग्रा,प,कर्मचाऱ्यांची झाली आहे ,लवकरच या कर्मचाऱ्याचा उपव्हास सुटणार की काय अशी आशा बळावली आहे ,
फोटो ओळ ,ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब ,राज्य मंत्री संजय बनसुडे साहेब ,व इतर अधिकारी शेख महेताब ,ज्ञानोबा कांबळे आदी,

नीट परीक्षेत स्वप्नील व्यजनेचे घवघवीत यश मित्र परिवरातून केले सत्कार


शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी: फतेहअली खान पठाण

शहरातील स्वपनिल संजय व्यजने यांनी Neet परीक्षेत 616 गुण घेऊन उत्तीर्ण ग्रामीण भागातील शेतकरी कुटूंबातील या मुलाने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्या बद्दल शिरूर अनंतपाळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते महादेव आवाळे, नामदेव लोखंडे, संजय पांचाळ,प्रमोद धुमाळे, संदिप धुमाळे, अमोल दुरूगकर,असिफ उजेडे, विशाल गिलचे आदि कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

लातूर पोलिस धुमाळ यांची दिलचस्प कामगिरी पुरामध्ये वाहत जाणाऱ्या दोघांचे वाचविले प्राण

लातूर प्रतिनिधी: अहेमद तांबोळी

लातूर  कासार सिरसी ते बसवकल्याण या मार्गावरील पुरात वाहून जाणाऱ्या दोघांचे प्राण वाचविले पोलिस  धुमाळ यांनी बुधवारी दिवसभर चालू असलेल्या पावसात ओढ्यांमध्ये पाणी गच भरून जात होते व रस्ते पूर्णपणे बंद होते  पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे पोलीस बंदोबस्त लावला होता याठिकाणी पोलीस धुमाळ आपले कर्तव्य बजावत होते त्यावेळेस दोघेजण टमटमने प्रवास करत होते टमटम पुढे जात नाही हे लक्षात घेता पाण्यातून पायी प्रवास करताना पाण्यामध्ये उतरले व पुढे चालायला लागले मात्र पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे दोघेही वाहून जाऊ लागले यावेळी पोलीस धुमाळ यांनी कसलाही विचार केला नाही व पाण्यात उडी मारली पंधरा ते वीस फूट वाहत्या पाण्यात जाऊन दोघांनाही धरून पाण्याच्या बाहेर आणले व दोघांचेही प्राण वाचविले कासार शिरशी पोलीस ठाण्यातील पोलिस नाईक पदावर कार्यरत असलेले श्री एम एस धुमाळ यांनी आपला जीव धोक्यात घालून नेलवाड येथे पुरात वाहून जात असलेल्या दोघांचे प्राण वाचविले याबद्दल संपूर्ण गाव त्यांचे कौतुक करत आहे व लातूर_पोलीस दलातील पोलीस नाईक धुमाळ यांनी प्रसंगावधान राखून पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या दोघांचे  प्राण वाचवल्याबद्दल
या कामगिरी बद्दल  पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी अभिनंदन केले.

तलाठी सज्जा वरील तलाठ्यांच्या अनुपस्थिती वसमत राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शाखा वसमत च्या वतीने निवेदन

वसमत: शेख नवीद अहेमद

जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यासाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो परंतु तलाठी हे कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे जनतेकडून तलाठी कार्यालयाशी संबंधित अनेक प्रकारच्या तक्रारी येत आहेत जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यालयांमध्ये तलाठी उपस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे त्यास्तव खालील सूचना चे पालन करण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून सर्व तलाठी यांना देण्यात याव्या ही विनंती 1,संबंधित तलाठी यांनी त्यांचा नियोजित दौरा बैठका याबाबत कार्यालयाच्या आवारात सूचना फलक लावावा,2,संबंधित तलाठी यांनी कार्यालयाच्या आवारात आपला दूरध्वनी भ्रमणध्वनी ठळक दिसेल अशा स्वरूपात कार्यालयाच्या आवारात लावावा तसेच लगतचे संबंधीत मंडळ अधिकारी व नायब तहसिलदार यांचे नाव दुरध्वनी व भ्रमणध्वनी सुद्धा दर्शविण्यात यावे ,3,तलाठी कार्यालयांमध्ये खाजगी व्यक्तींना कार्यालयीन कामकाजात करिता ठेवू नये,4,विविध दाखले देताना शासनाने आकारलेले वाजवी शुल्क या बाबतची दरसुची कार्यालयाच्या आवारात लावावी ,5,संबंधीत तलाठी यांनी शेतजमिनी पिक पाहणी करताना संबंधित शेत जमिनीस भेट बाबतचा तपशील जाहीर करावा,6,सेवाहमी कायद्याअंतर्गत नमूद सेवा विषयक बाबची विविध प्रकारचे उतारे लागणारा कालावधी इ तपशील माहिती कार्यालयाच्या आवारात लावावी,7,संबंधित तलाठी त्यांनी कार्यालयाच्या आवारात तलाठ्याची कतेव्ये जवाबदान्या या बाबत फलक लावावा याकरिता तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी मराठवाडा अध्यक्ष श्री प्रल्हादराव जाधव झरेकर श्री बालाजी दळवी जिल्हा उपाध्यक्ष राजे प्रतिष्ठान व इतर (छाया नागेश चव्हाण वसमत)

Friday, October 16, 2020

अंबाजोगाई येथील ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयत जन्म मृत्यू विभागात कर्मचारी वाढवणे बाबत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समितीच्या वतीने मा.अधिष्ठाता यांना निवेदन!


अंबाजोगाई प्रतिनिधी: मोहम्मद ताहेर

आशिया खंडातील सर्वात मोठा हाॅस्पिटल असलेल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जन्म मृत्यू विभागात कर्मचारी एकचं असल्यामुळे येणाऱ्या रुग्णांना हेळसाड होत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे
त्यामुळे येणाऱ्या रुग्णांना त्रास होणार नाही ह्या उद्देशाने अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र जन एकता संघटनेच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ सुक्रे साहेबांना निवेदन देण्यात आले
*शेख फेरोज शेख करीम*
*अंबाजोगाई तालुका अध्यक्ष*
*शेख फेरोज शेख रहीम*
*अंबाजोगाई तालुका अध्यक्ष*
*हबीब खान नुर खान पठाण*
*तालुका उपाध्यक्ष*
*शेख रशीद शेख कलीम*
*तालुकाध्यक्ष आरोग्य सेल*
*इत्यादी उपस्थित होते*

Thursday, October 15, 2020

आम आदमी पक्षाच्या वतीने सिल्लोडचे नवनियुक्त तहसीलदार श्री. विक्रम राजपूत यांचे स्वागत


सिल्लोड (प्रतिनिधी) :- सिल्लोडचे तहसीलदार म्हणून बिलोली जि. नांदेड येथे अवैध धंद्यांचे कर्दनकाळ ठरलेले दबंग तहसीलदार श्री. विक्रम राजपूत यांची नुकतीच सिल्लोड येथे नियुक्ती करण्यात आली असून आप'च्या वतीने नवनियुक्त तहसीलदार श्री. विक्रम राजपूत यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सत्कार  स्वीकारल्यानंतर तहसीलदार श्री. विक्रम राजपूत यांनी कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य जनता यांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसामान्यांना न्याय देण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगीतले आणि जर कार्यालयात कोणी अडवणूक करीत असेल तर थेट संपर्क करण्याचे आवाहन देखील तालुक्यातील जनतेला केले. तसेच तालुक्यामध्ये शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून महसुली अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जे अभिलेख तांत्रिक लेखन प्रमाणाने दोष आहे, ते प्राधान्याने दुरुस्ती करिता स्वतंत्र कार्यक्रम राबवण्याचे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले. तहसीलदार श्री विक्रम राजपूत यांची एक स्वतंत्र आणि दबंग ओळख असल्याने त्यांचे आप'च्या वतीने स्वागत करण्यात आले असून यावेळी जिल्हा सहसंयोजक ॲड. शेख उस्मान शेख ताहेर, सिल्लोड - सोयगांव विधानसभा संयोजक महेशकुमार शंकरपेल्ली, तालुका संयोजक डॉ. दत्तात्रय गोंगे, शहर संयोजक शेख रफीक अब्दुल रहीम, संघटनमंत्री इस्माईल शेख सलीम शेख, तालुका सहसंयोजक नजीर तडवी, आप पालक अघाडीचे असलम खान पठाण, शहर सचिव इम्रान देशमुख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मुस्ताक खा मेवाती, दौड फकीरा शेनफड, सुनील पाटील गुळवे, मुक्तार शहा मुसा शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान


लातूर प्रतिनिधी: अहेमद तांबोळी

नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूर जिल्ह्यात सरासरीच्या अधिक म्हणजे १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद यावर्षी झाली आहे. जवळपास ८६० मिमी इतका पाऊस जिल्ह्यात झालाय. लातूर जिल्ह्यातील मंगळवारी रात्री पासून बरसत असलेल्या पावसाची अतिवृष्टी म्हणून नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या पावसाची सरासरी ही ६८ मिमी इतकी आहे. तर सर्वाधिक पाऊस हा निलंगा तालुक्यात ११० मिमी इतका झाला आहे. देवणी तालुक्यात ९० मिमी, औसा तालुक्यात ८१ मिमी, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ८० मिमी, चाकूर तालुक्यात ६५ मिमी इतक्या पावसाची अतिवृष्टी म्हणून नोंद झाली आहे. निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथून वाहणाऱ्या तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठी शेतात काढुन ठेवलेली सोयाबीनची बनिम वाहून गेली. याचे चित्रण ग्रामस्थांनी मोबाईल मध्ये चित्रित केलं. बोरसुरी येथील चार तर चांदोरी येथील दोन शेतकऱ्यांच्या सोयाबीन बनिम या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील पाण्याचं तळं पुर्णपणे भरुन तळ्यातील पाणी रस्त्यावरून वाहत होतं. रस्त्यावर पाणी वाहत असल्यामुळे नेलवाड ते कासारशिरसी जाणारा रस्ता  बंद होता. निलंगा तालुक्यातील वाहणाऱ्या मांजरा आणि तेरणा नदी भरभरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाने दिलाय. याशिवाय जिल्ह्यातील इतरही नदी, नाले ओढे भरभरून वाहू लागले आहेत. एकूणच दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात आता अति पावसामुळे ओला दुष्काळ पडल्याचे दिसून येत असून बळीराजाला सरकारने भरीव मदत देण्याची मागणी होऊ लागली आहे.

कोरोनामुक्त होण्यासाठी,सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी हात धुवा - सुशीलकुमार पांचाळ

शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी: फतेहअलीखान पठाण

वाचन प्रेरणा दिनानिमित्त कानेगावच्या कोविड कॅप्टननी घेतला  वाचनाचा सराव
      सध्या कोरोनासारख्या भीषण महामारीतून स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवायचे व आपले आरोग्य चांगले आणि निरोगी जगायचे असेल तर स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याची सुरुवात हातांच्या स्वच्छतेपासून व्हायला हवी कारण बहुतांश वेळा रोगांच्या आजाराचे जंतू हातातूनच पोटात जातात, त्यामुळे रोगजंतू पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर हात स्वच्छ धुण्याची आवश्यकता असल्याचे मत कानेगाव येथील राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक सुशीलकुमार पांचाळ यांनी जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्याकडून हात धुण्याच्या पायऱ्यांचे प्रात्यक्षिक करून घेताना व्यक्त केले.कोरोना परिस्थितीतही त्यांनी आपले सहकारी प्रशांत जाधव यांना सोबत घेऊन घरोघरी जाऊन हात धुण्याचे महत्त्व समजावून सांगितले. हात स्वच्छ धुतल्यामुळे शरीर निरोगी राहते याच प्रेरणेतून जागतिक स्तरावर हात शुद्धीकरणाची मोहीम सुरु झाली .पाणी आणि आहार आपण तोंडाद्वारेच पोटात घेतो ते हात स्वच्छ असणे ही पहिली पायरी मानली जाते.यासाठीच १५ ऑक्‍टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये हाताच्या स्वच्छतेचे बीज रुजवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे ,कारण लहान मुलांमध्ये मुळात स्वच्छतेबाबत जागरूकता नसते. मातीतले खेळ, भटकणे ,अस्वच्छतेची जाण असणे, यामुळे मुलांमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे होणारे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यातूनच बहुतांश शाळकरी मुलांमध्ये हागवण यासारखे पोटाचे विकार अधिक प्रमाणात होताना दिसत आहेत. ते टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना या निमित्ताने प्रेरणा दिली जाते. स्वयंपाकाची तयारी करण्याआधी, जेवायला बसण्यापूर्वी आणि जेवण झाल्यावर ,जेवायला वाढण्यापूर्वी ,शौचालयात जाऊन आल्यावर ,मुलांचे लंगोट व कपडे बदलल्यावर ,कोणत्याही रुग्ण किंवा आजारी व्यक्तीला भेटल्यानंतर, खोकला सर्दी झाल्यावर नाक स्वच्छ केल्यानंतर, प्राण्याला हात लावल्यानंतर ,केरकचरा काढल्यावर, बाहेरून आल्यावर, वाहनातून प्रवास केल्यावर ,पैसे मोजल्यानंतर व केस विचारल्यानंतर आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे.  जाणीवपूर्वक वरील सर्व वेळी आपण हात धुतलेच पाहिजेत व 'थांबा ,आपण आपले हात साबणाने स्वच्छ धुतले का ? असा प्रश्न प्रत्येक वेळी स्वतःला विचारणे गरजेचे आहे कारण 'स्वच्छ हातांमध्ये दम आहे' याचीही सवय लावून घेतली पाहिजे अशी शिकवण पांचाळ व जाधव गुरुजींनी दिली.माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शाळेत प्रतिमेस हार घालून औपचारिक अभिवादन करण्यात आले.नंतर कोविड कॅप्टनच्या अभ्यासवर्गात वाचन प्रेरणा दिनानिमित्त सलग दोन तास वाचनाचा सराव घेण्यात आला व कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून जीवनात वाचनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

कानेगावचा कृष्णा सुरवसे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

शिरूरअनंतपाळ प्रतिनिधी: फतेहअलीखान पठाण

      महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिरुर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आठवीचा विद्यार्थी कृष्णा वसंत सुरवसे हा पात्र झाला आहे.शाळेच्या इतिहासात प्रथमच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत हे यश प्राप्त झाले आहे.शाळेच्या वतीने कृष्णाचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कृष्णाला विनायक सुरवसे व सुशीलकुमार पांचाळ यांनी प्रत्येकी  पाचशे रुपयाचे बक्षीस  दिले.यावेळी प्रशांत जाधव,गोपाळ सोलंकर,वसंत सुरवसे यांची उपस्थिती होती.जिल्ह्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा,तालुक्यातील पहिली शाळाबाह्य विद्यार्थी नसलेली शाळा,राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी शाळा,राज्यस्तरीय नवोपक्रम व कृती संशोधन स्पर्धेत सहभाग घेऊन यश मिळविणारी शाळा तसेच अशा कोरोना परिस्थितीतही ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देणारी शालेय व सहशालेय उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारी शाळा म्हणून कानेगावच्या जिल्हा परिषद शाळेचा नावलौकिक आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशामुळे एक गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून ओळख निर्माण झाली आहे.वर्षभर जादा तासिका घेऊन सराव घेतल्याचे मुख्याध्यापक सुरेश बिरादार यांनी सांगितले.शाळेच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गोविंद चिलकुरे,पंचायत समितीचे सभापती नरेश चलमले, डायटचे प्राचार्य अनिल मुरकुटे,माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली जामदार,गटविकासाधिकारी नंदकुमार शेरखाने, गटशिक्षणाधिकारी अनिल पागे,गटसमन्वयक व केंद्रप्रमुख शिवाजी एरंडे,गटसाधन केंद्राचे विषय साधनव्यक्ती,कानेगाव ग्रामपंचायत कार्यालय,शाळा व्यवस्थापन समिती,पालक व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे  अभिनंदन केले आहे.

Tuesday, October 13, 2020

कब्रस्तानसाठी दिलेल्या जागेत दफनविधी व देखरेख करण्यासाठी कमिटी नियुक्त करावी - पत्रकार शेख अजीम

परळी वैजनाथ. (प्रतिनिधी)

     परळी येथील सव्र्हे नं. 75 मध्ये नगर परिषद परळी वौजनाथ यांनी आरक्षीत जागा मध्ये 1 हेक्टर मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानसाठी बीड जिल्ह्याचे पालक मंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेबांनी दिलेली आहे. त्या जागेमध्ये मुस्लिम समाजाला दफनविधी करण्यासाठी व देखरेख करण्यास एक कमिटी त्याभागातले नागरिकांची नियुक्त करुन जागा साफ-सफाई व स्वच्छ करुन द्यावी अशी मागणी नगर परिषदेकडे करण्यात आली आहे. टी.पी.एस. रोड च्या वरच्या भागातील प्रत्येक गल्लीमधील एका माणसाची नियुक्ती करुन कमिटी तयार केली आहे. त्यांची नावे 1)जाफर खान उस्मान खान, 2) शेख अजीम शेख करीम, 3) अय्युब खॉ मलीक खॉ पठाण, 4) सुलतान सादेक कुरेशी, 5) शेख बद्रोद्दीन शेख बाबुमियाँ, 6) हाफेज रशीद, 7) नसीर मजीद बागवान, 8) शेख अब्दुल शेख हुसेन, 9) अय्युब रज्जाक सर काकर, 10) शेख अनसर शेख नासर, 11) शेख सोहेल शेख इस्माईल, 12) गफफार मगदुम काकर, 13) गुलाब हुसेन पठाण, 14) शेख समी शेख चाँद, 15) शेख सिकंदर शेख इस्माईल ही सर्व भागातील नागरिक आहे असे निवेदन पत्रकार शेख अजीम यांनी नगर परिषदेस दिले आहे.

                           

Saturday, October 10, 2020

उदगीर नगर परिषद येथे जागतिक बेघर दिवस उत्साहात साजरा!


   उदगीर प्रतिनिधी:

           उदगीर नगर परिषद 
केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान  अंतर्गत "आधार"शहरी बेघर निवारा तलवेस, उदगीर येथे कार्यरत आहे. सदर निवारा देखाभाल व व्यवस्थापन यांचे सलात  अल्प.सेवाभावी सामाजिक संस्था(रोटी कपड़ा बैंक) उदगीर यांच्या मार्फत केले जाते. १० ऑक्टोबर  हा सर्व जगात  जागतिक बेघर दिवस म्हणून साजरा केला जातो,
10 ऑक्टोंबर रोजी जागतिक बेघर दिवसानिमित्त डॉ.बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे बार्टी लातूर जिल्ह्याच्या वतीने उदगीर येथे भेट देऊन बेघर दिवस साजरा केला.
या दिनाचे औचित्य साधून बेघर लाभार्थ्यांना पुष्प देवून  त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि बार्टी च्या वतीने महापुरुषांच्या विचारांच्या  पुस्तकांचा संच निवारा केंद्रास भेट देण्यात आली.
बार्टी समतादूत यांच्या कडून वेळोवेळी हवी ती मदत केली जाईल अशी माहिती ही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
बेघर निवारा केंद्राचे संचालक गौस शेख यांनी जागतिक निवारा दिन निमित्त दिनांक 1 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर या दरम्यान घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
1.जागतिक ज्येष्ट नागरिक दिवसानिमित ज्येष्ट  बेघर सत्कार करण्यात आले व मिठाई वाटप करनयात आले.
2.ज्या बेघर साथ्यांचे ओळख पञ तयार केले ते वाटप करण्यात आले
3.राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांना जयंती निमित्याने आपल्या शहरी बेगर निवाऱ्यात  अभिवादन केले.
4.ज्या बेघर साथ्यांचे ओळख पञ तयार केले ते वाटप करण्यात आले
5.शहरात विविध ठिकाणी फिरून नवीन बेघर लोकांचा शोध घेऊन त्यांना निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.
6.सार्वजनीक ठिकाणी(बस स्टॅन्ड,रेल्वे स्टेशन,सामान्य रूग्नालय,अडत बाजार)निवारा व बेघर दिवसाचे पॅम्पलेट लावण्यात आले.
7.बेघर साथ्यां मध्ये कोरोना बद्दल जनजार्गूती कार्यकर्म घेण्यात आले
8.सार्वजनीक ठिकाणी(बस स्टॅन्ड,रेल्वे स्टेशन,सामान्य रूग्नालय,अडत बाजार)निवारा व बेघर दिवसाचे पॅम्पलेट लावण्यात आले.
9.संपूर्ण निवारा केंद्राची स्वच्छता करून निवारा केंद्रात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. 
10.बेघर बांधवांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले.11.सर्व  बांधवाना मास्क व सेनिटायझर देण्यात आले.
12.बेघर बांधवाना हॅप्पी लाइफ बद्दल विविध कथा सांगण्यात आले .
13.बेघर बांधवाना accupresure camp घेण्यात आले.14.गित गायन कार्यक्रम.  15.बेघर बांधवाना कपडे वाटप करण्यात आले.16. बेघर बांधवासाठी गित गायनाचे कार्यक्रम
17.बेघर बांधवांची आरोग्य तपासनी केली गेली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शहर अभियान व्यवस्थापक  श्री.लक्ष्मन जाधव संस्थेचे.असद जमाल ,शेख जमिल, समीर ,शेख अब्दुल रहीम, अमजद मानियर्,शेख जावेद सर्व सहयोगीनी यांनी  परिश्रम घेतले कार्याक्रमाचे सुत्रसंचालन  गौस शेख तर आभार प्रदर्शन समीर शेख यांनी केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष शहर अभियान व्यवस्थापक  श्री.लक्ष्मन जाधव
असद  जमाल ,शेख जमिल, समीर ,शेख अब्दुल रहीम, अमजद मानियर्,शेख जावेद सर्व  .

शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान! मेघाच्या गडगडा सही अवकाळी पावसाने झोडपले!


हिमायतनगर प्रतिनिधी: विनोद चंदनवार

हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान अवेळी पावसामुळे काल अचानक तीन वाजेच्या सुमारे भयानक मेघाच्या गडगडा सही अवकाळी पावसाने झोडपले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसून आले

Thursday, October 8, 2020

रमजान मंजूर पटेल मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे सुनावणीला

परंडा प्रतिनिधी: एकबाल शेख

दिनांक ७ /०७/२०२० रोजी रमजान मंजूर पटेल राहणार आसू तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद यांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग कोर्ट मुंबई येथे  ऑनलाइन याचिका दाखल केली होती या प्रकरणाची राज्य मानवी हक्क आयोग कोर्ट मुंबई यांनी दखल घेतली आहे दिनांक 14/10/2020 रोजी सकाळी अकरा वाजता सुनावणीला सुरुवात होईल ( याचिकाकर्ते मानवी हक्क सामाजिक कार्यकर्ता इकबाल शेख )

Tuesday, October 6, 2020

पहिल्यांदाच भूमिपुत्राला जिल्ह्यात मिळाली संधी, दिनेश गिते नवे उपजिल्हाधिकारी

बुलढाणा प्रतिनिधी:

बुलडाणा: महसूल विभागातील अभ्यासू, परिश्रमी अधिकारी म्हणून ओळख असलेले व  समृद्धी महामार्गाच्या प्राथमिक टप्प्यातील कामामुळे राज्यात लौकिक मिळवणारे  प्रशासक दिनेश गीते यांनी आज, 6 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उप जिल्हाधिकारी (आरडीसी) पदाची सूत्रे स्वीकारली.
त्यांच्या रूपाने जिल्ह्याला दीर्घकाळानंतर  जिल्हावासीच अर्थात भूमिपूत्र असलेला अधिकारी मिळाला आहे. यापूर्वी आरडीसी रामेश्‍वर पुरी यांची बाळापूर (जिल्हा अकोला) उप विभागीय अधिकारी म्हणून बदली झाली. त्यांच्या रिक्त जागी कोणाची नियुक्ती होते याकडे प्रसाशकीय वर्तुळाचे लक्ष वेधले होते. अखेर या जागी उप जिल्हाधिकारी दिनेश गीते यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी (दि. 5) रात्री येथे प्राप्त झाले. दरम्यान गीते यांनी आज 6 ऑक्टोबर रोजी दुपारी मावळते आरडीसी डॉ. पुरी यांच्याकडून पदाची औपचारिक सूत्रे स्वीकारली, आपण लोकाभिमुख व पारदर्शक प्रसाशनाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात विविध विकास कामे मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या प्रार्श्‍वभूमीवर त्यांनी अत्यंत साधेपणाने पदाची सूत्रे स्वीकारली. कोणाकडूनही पुष्पगुच्छ वगैरे न स्वीकारता त्यांनी केवळ शुभेच्छाच स्वीकारल्या,  पदभार स्वीकारल्यावर त्यांना विविध अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाजबद्धल शुभेच्छा दिल्या. महसूल कर्मचारी संघटनेतर्फे त्यांचे स्वागत आले.

कु.मंगलताई गुराळे यांचे साकोळ येथे सामाजीक कार्यकर्ते रिजवान बागवान यांच्या तर्फे सत्कार

साकोळ प्रतिनिधी:

राणी अंकुलगा येथील समाज सेवेची आवड असणाऱ्या कु.मंगलताई गुराळे यांची साप्ताहिक 'लातुर रत्न 'च्या उपसंपादक पदी निवड झाल्याबद्दल साकोळ येथे सामाजीक कार्यकर्ते रिजवान बागवान यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी गैस मुल्ला, धनराज बिरगे, शंकर हिंगमीरे, असलम धोबी, सतीश आवाळे, गावकरी उपस्थीत होते

वसमत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट द्वारे निवेदन

वसमत:ता.प्र.शेख नवीद अहेमद
      
वसमत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रीती जयस्वाल सदस्य महाराष्ट्र प्रदेश कमिटी तथा राष्ट्रीय महिला काँग्रेस वसमत यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश यांना पोस्ट करून निवेदन पाठविले .      मोदीजी आपण ज्या देशाचे पंतप्रधान आहे त्या देशातील उत्तर प्रदेशातील एका मुलीवर सामूहिक बलात्कार होते आणि त्याची निर्घुण हत्या करण्यात येते हे कृत्‍य नक्कीच संतापजनक आहे. आपण ज्या प्रमाणे जाहिरातबाजी करतात त्यापेक्षा सध्याचे देशातील कायदा सुव्यवस्था वेगळी आहे. मुली महिला सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाहीत तुम्ही देशाला राम राज्य स्वप्न दाखवतात आहात पण आपल्या राम नगरीत अशा पद्धतीने आपल्या आशीर्वादाने गुंडाराज सुरू आहे का असा प्रश्न एक महिला म्हणून मला पडतो आपल्या राज्यात भारतात सर्वात मोठी फिल्म सिटी उभी करणार आहात असे याबाबत मी खेदाने म्हणले फिल्म सिटी उभी करण्यापेक्षा कायदा सुव्यवस्था शिक्षण या गोष्टीसाठी सक्षम पोलीस यंत्रणा उत्तम प्रकारचे शैक्षणिक सं कले उभी करा जेणेकरून पुढील काळात कोणत्याही मुलीवर अत्याचार होणार नाहीत. आपण अतीम शहाजी स्मुर्ती इराणी यांच्यासह तुम्हीसुद्धा बोलणार नाहीत कारण तुम्हाला कंगनाला न्याय द्यायचा आहे गोरगरीब दिन दलितांना नाही. पीडित मुलीच्या मृत्यू देह कुटुंबाचं ताब्यात न देता परस्पर जाळला जातो हे भयावह आहे. असे आदेश पोलिसांना कोणी दिले याची चौकशी झाली पाहिजे त्या हत्याकांड मध्ये सहभागी यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रीय प्रदेश महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला शहराध्यक्ष प्रीती जयस्वाल सौ कुसुम पडोळे आशा गायकवाड कविता कीर्तन शांताबाई जोंधळे सुरेश कीर्तने क्रांतिवीर कीर्तने अनुप पांचाळ अभिषेक केला वार वसमत शहराध्यक्ष आज घर पटेल यांनी पोस्ट करून निवेदन पाठविले.( छाया: नागेश चव्हाण)

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने "बेगम हजरत महल शिष्यवृत्तीचा" लाभ घ्यावा= याहीया खान


गेवराई . प्रतिनिधी

केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय मान्यताप्राप्त मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन द्वारे अल्पसंख्यांक  समाजातील मुलींना "बेगम हजरत महल शिष्यवृत्ती" साठी आॅनलाईन अर्ज मागवणे सुरु आहे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींने या शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा असा अाहवान याहीया खान यांनी केले आहे.
  मुस्लिम,बौद्ध,शीख,पारशी,जैन व इसाई या अल्पसंख्यांक समाजातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून  बेगम हजरत महल शिष्यवृत्ती दिली जाते. इ. ९ वी ते १२ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतगर्त ९ वी व १० वी  वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना वार्षिक ५००० रुपये तसेच इ. ११ वी  व  १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ६०००  रुपये ची आर्थिक मदत दिली जाते.  शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे सुरु आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख "३१ ऑक्टोबर २०२०" आहे. अर्ज दाखल करण्यासाठी  http://bhmnsmaef.org/maefwebsite/ या संकेतस्थळावर भेट द्या किंवा आपल्या शाळेच्या मुख्याधिपकांशी संपर्क साधा.  अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आहवान याहीया खान यांनी केली आहे

Monday, October 5, 2020

सापडलेला मोबाईल देण्यासाठी पालमच्या तरुणाने जळकोट गाठले! पोलीस निरिक्षक सोंडारे यांनी केला रईस खुरेशी यांचा सत्कार

जळकोट तालूका प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळात पालम येथील रईस खुरेशी यांच्या भाऊ जळकोट शहरात आपल्या नातेवाईकांकडे राहत होता. मध्यंतरी, आपल्या मुळ गावी पालमकडे जात असताना जळकोट शहरात रस्त्यावर त्याला विवो कंपणीचा सुमारे २६ हजार रुपयाचा मोबाईल सापडला होता. कोरोना कालावधीत प्रवास बंद असल्याने व अधिकचे पर्याय समोर उपलब्ध नसल्याने संबंधित तरुणाला जळकोट कडे प्रवास करता आला नव्हता. परंतू, प्रवासाची शिथिलता मिळाल्यानंतर त्याने पून्हा एकदा जळकोट गाठले असून संबंधित मोबाईल मधील क्रमांकाला संपर्क साधत, मुळ मोबाईल मालकाचा पत्ता शोधून मोबाईल त्यांच्या सुपूर्द केला आहे. रईस खुरेशी च्या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतूक होत असून जळकोट पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक गणेश सोंडारे यांनी त्याचा पुष्पहार घालून सत्कार केला आहे.

अधिक माहिती अशी कि, जळकोट येथील पत्रकार संगम डोंगरे यांचा विवो कंपनीचा मोबाईल तीन महिन्यापूर्वी रस्त्यावर हरवला होता. त्यानंतर त्यांनी त्याची लेखी तक्रार पोलिसात दिलेली होती. परंतु, अद्याप तपास लागला नव्हता. मात्र, सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संगम डोंगरे यांना एका अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला व आपला हरवलेला मोबाईल माझ्याकडे आहे आणि तो देण्यासाठी मी पालम वरुन जळकोटला आलो आहे असा आवाज आला. त्यानंतर पत्रकार डोंगरे यांनी सदरिल तरुणास घरी बोलावून त्याची भेट घेतली व मोबाईल सहीसलामत आणून दिल्याबद्दल त्याचे आभार मानले. त्याच, दरम्यान त्यांनी पोलिसात मोबाईल सापडला असल्याचेही कळविले. आणि रईस खूरेशी च्या प्रामाणिकतेचे कौतूक पोलिसांनाही वाटले व त्यांनी संबंधित तरुणाला व पत्रकार डोंगरे यांना पोलिस स्टेशनला बोलावून सत्कार केला आहे.

यावेळी, पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्यासह पत्रकार संगम डोंगरे, एमआयएमचे शहराध्यक्ष मुस्तफा बागवान, अहमद लाटवाले, नौशीद खॉ पठान, अजिम बागवान, पो.कॉ. गणेश माळवदे, नरेश उस्तुरर्गे, राहूल वडारे, रामदास राठोड, गायकवाड आदी उपस्थित होते. सदरील सत्कारानंतर प्रामाणिक तरुण, तसेच सलमान खान मित्रमंडळा चे पालम शहराध्यक्ष पदावर  असलेले  रईस खुरेशी वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.....

Sunday, October 4, 2020

कोलकत्ता नाईट रायडर्स ग्रुप साकोळ तर्फे पो.काॅ. सौदागर यांचा वाढदिवस साजरा

साकोळ (वार्ताहर) 
तालुक्यातील शिरूर अंनतपाळ पोलिस स्टेशन चे पोलिस हेड काॅनिस्टेबल लतीफ सौदागर यांचा वाढदिवस साकोळ येथे आज येथील कोलकत्ता नाईट रायडर्स ग्रुप साकोळ तर्फे साजरा करण्यात आला.
           सविस्तर वृत्त असे की, शिरूर अंनतपाळ पोलिस स्टेशन चे पोलिस हेड कानिस्टेबल हे तालुक्यात प्रसिद्ध व लोकप्रिय तसेच मनमिळाऊ असल्यामुळे तालुक्यातील बरेच लोक त्यांना नावानिशी चांगल्या प्रकारे ओळखतात त्यांचेे साकोवाशियांसोबत चांगल्या प्रकारे संबंध आहेत. त्याच प्रेमापोटी येथील कोलकत्ता नाईट रायडर्स ग्रुप साकोळ तर्फे मोठ्या थाटा माटात त्यांना फेटा बांधून शाल श्रीफळ देउन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
       यावेळी कोलकत्ता नाईट रायडर्स ग्रुप साकोळ चे मजहर मुल्ला, आकाश कवठाळे, बाबू बागवान, अमीर पठाण, नबी शेख, अब्बास शेख, सरफराज तांबोळी, बबलू गिरणीवाले, इटकर सर, शिवाजी भुरे, पत्रकार सतिश मल्लाडे, अजिम मुल्ला, यांची उपस्थित होती.

वलांडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा 63वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा


वलांडी प्रतिनिधी: सगीर मोमीन

आज दिनांक 03 ऑक्टोबर 2020 रोजी वलांडी ता.देवणी जि.लातूर येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खुल्या पत्रावर निर्माण केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा 63वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले,या प्रसंगी तालुका अध्यक्ष मा.विलासजी वाघमारे तालुका युवा अध्यक्ष मा.गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर,तालुका सचिव मा.गोविंद हणमंते,तालुका उपाध्यक्ष धनराज गायकवाड,रुषी वाघमारे, लक्षमण वाघमारे,रोहित डोंगरे,राम जिरे,राहुल श्रीवास्तव,पप्पू बनसोडे, नजीर बौडीवाले, चाँदपाशा बौडीवाले, संभाजी कांबळे,सचीन सुर्यवंशी, अक्षय कांबळे, राजकुमार कांबळे,राजकुमार गायकवाड,कन्नाडे आप्पा,प्रतिक सुर्यवंशी,भरत कांबळे व ईतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, October 3, 2020

ऊस्मानाबाद जनता सहकारी बँकेला पुन्हा एकदा जबरदस्त हाबडा ! दुसऱ्यांदा बोलावलेली ही सर्वसाधारण सभा रद्द करण्याची संचालक मंडळावर आली नामुष्की.

लातुर : दि. ४ - उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला बेकायदेशीरपणे दुसऱ्यांदा बोलावलेली ही सर्वसाधारण सभा बँकेचे सभासद व सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा सर्वसाधारण सभा रद्द करण्याची नामुष्की आली. मराठवाड्यातील नामांकित उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला दुसऱ्यांदा जबरदस्त हाबडा बसला आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या बेकायदेशीर नियमबाह्य कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी रिझर्व बँकेकडे केली होती. त्याची गंभीर दखल रिझर्व बँकेने घेतली आहे.
उस्मानाबाद जनता सहकारी बँक ही मराठवाड्यामधील मोठी बँक आसुन या बँकेत सर्वसामान्य जनतेच्या भरपूर ठेवी आहेत. बँकेचे कांही विद्यमान संचालक मागील अनेक वर्षांपासून अत्यंत बेजबाबदारपणे व आरबीआयचे मापदंड पालन न करता केवळ स्वतःच्या स्वार्थाकरिता नियमबाह्य कामे करीत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते आणि बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी जनरल मॅनेजर रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडे केली होती. संचालक मंडळाची मुदत संपण्याचा कालावधी जवळ आल्यानंतर मागील वर्षभरात स्वतःच्या फायद्याकरिता कर्जदाराची उत्पन्न क्षमता न पाहता लक्षावधी रुपयांचे कर्ज वाटप केले असल्याचे बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी निवेदनाद्वारे रिझर्व बँकेला कळवले होते.
तसेच बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल २४ सप्टेंबर २०२० रोजी संपलेला असताना तात्काळ बँकेच्या नवीन संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता व सदरील संचालक मंडळास केंद्रीय निबंधक सहकारी संस्था दिल्ली यांनी मुदतवाढ दिलेली नसताना सुद्धा कार्यकाळ संपलेल्या संचालक मंडळाने यापूर्वी बोलावलेली सर्वसाधारण सभा माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद श्री कौस्तुभ दिवेगावकर यांनी रद्द केलेली असताना पुन्हा दुसऱ्यांदा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १८ ऑक्टोंबर २०२० रोजी बोलावली होती.
केंद्रीय निबंधक सहकारी संस्था दिल्ली यांचे नियम धाब्यावर बसवून नियमांचे पालन न करता ही सर्वसाधारण सभा घाईगर्दीत घेऊन मागच्या आर्थिक वर्षातील नियमबाह्य झालेल्या कामकाजास तसेच आर्थिक व्यवहारास मान्यता घेण्याचा कुटीलडाव संचालक मंडळाने आखला होता. मात्र बँकेचे जागरुक सभासद तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांच्या प्रयत्नामुळे तो कुटीलडाव जो की बँकेच्या हिताच्या दृष्टीने व ठेविदारांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकले असते तो डाव हाणून पाडला गेला आहे. बँकेच्या संचालक मंडळास दुसऱ्यांदा बेकायदेशीर बोलावलेली सर्वसाधारण सभा रद्द केल्याची जाहीर सुचना व प्रगटन प्रसिद्ध करण्याची नामुष्की बँकेच्या कार्यकारी संचालकांना घ्यावी लागली आहे.
बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी घेतली आसुन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कारभाराची सखोल चौकशी करण्याबाबतीत सामाजिक कार्यकर्ते तथा बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे  हे जनरल मॅनेजर रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई व जनरल मॅनेजर रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्बन बँक विभाग नागपूर यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत.

वाशिम तालुक्यात जनावरांवर लम्पी लसीकरण करण्यात आले.

प्रतिनिधी / योगेश नप्ते

वाशिम - तालुक्यातील वारला जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत जयपूर पंचायत समिती गणातील सोनगव्हाण येथे ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता पासून जनावरांवर लम्पी लसीकरण करण्यात आले.

    यावेळी जयपूर पंचायत समिती चे सदस्य बळीराम माहोरे , वारला पंचायत समिती चे सदस्य विजयराव नप्ते , वाई ग्रा.पं. माजी सरपंच गजानन जाधव व उत्तमराव नप्ते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत.

डॉ.बोरकर व डॉ.घोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांवर लम्पी चे लसीकरण करण्यात आले . यावेळी सोनगव्हाण येथील गाय , म्हैस , बैल यांना व तसेच कुत्रे यांना लस देण्यात आली. उपस्थित संतोष खंदारे , माधवराव होडगिर , उद्धवराव ढेकळे , बंडू माहोरे , गजानन हनवते आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

शेख शकील आरोग्य विभागात भरती


गेवराई प्रतिनिधी- शेख जुनेद,

गेवराई तालुक्यातील नंदपूर गावातील शेख शकील हे आरोग्य विभागातील आरोग्य सेवक या पदात भरती झाले. शेख शकील यांचे आरोग्य सेवक पदास भरती झाल्यास त्यांच्या परिवारातील लोकांना आनंद मावेनासा आसा झाला.शकील च्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्यांचे आई वडील मोलमजुरी करतात. त्याचे वडील कारखान्याला सुद्धा जातात.घरची परिस्थिती पाहून शेख शकील लहानपणापासूनच नोकरीसाठी धडपडत होता. लहानपणापासूनच मला काही ना काही बनायचेच अस शकील च धैय्य होत. आणि ते धैय्य आज पूर्ण झाल. शकील ला नोकरी लागल्यामुळे गावात रॅली काढून शकील चा सत्कार करण्यात आला. आणि गावातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन सुद्धा केले. शेख मोहम्मद भाई यांनी शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमचं ध्येय ठेवा आणि ते ध्येय मी मिळवणारच अशी तुमची आपेशा ठेवा . धेय्याच्या मागे  लागत रहा.तुम्हाला सुद्धा तुमचं धेय्य मिळुण जाईल असे त्यांनी यावेळी सांगीतले.