
ग्रा,प,कर्मचाऱ्यांचा किमान वेतनासह सर्व प्रश्न मार्गी लावणार ,सूरज चव्हाण यांचे प्रतिपादन ,
ग्रा,प,कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी ग्राम विकास मंत्री महोदय व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक लावून प्रश्न निकाली काढणार ,संजय बनसुडे ,
शिरूर अनंतपाळ ता,प्रतिनिधी: फतेहअली खान पठाण
तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रा,प,कर्मचारी युनियन 4511 च्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के मानधन मिळावे ,व वसुलीची अट रद्द करावी ,असे निवेदन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना देण्यात आले या निवेदनावर ग्रा,प,कर्मचाऱ्यांना नगर परिषद व जी,प,कर्मचाऱ्या प्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करणे ,शासनाने मु,का,अ, जिल्हा परिषद रायगड समिती यांनी दि,6 जून 2018 रोजी शासनास सादर ,यांच्या मार्फत दोन बैठका आयोजित केले आहेत ,त्या नुसार सदर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे ,ग्रा,प,कर्मचाऱ्यांना उपदान लागू करणे ,याबाबत 18 जाणे ,2018 च्या बैठकीस नमूद केले नुसार विभागाने प्रस्ताव सादर केला परंतु निर्णय परलंबीत आहे ,यावर धोरणात्मक निर्णय घ्यावा ,ग्रा,प,कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वसुलीची अट रद्द करून शासनाकडून मानधन देण्यात यावे ,भविष्य निर्वाह निधी उपलब्धता 15 व्या वित्त आयोगातून करावी ,ग्रा,प,कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटूंबियांना सुरक्षा कवच शासनाने द्यावे ,जी,प,व नगर पंचायत ,कर्मचाऱ्या प्रमाणे सवलती द्याव्या आशा मागण्याचे निवेदन ग्रा,प,कर्मचारी युनियन 4511 चे मराठवाडा अध्यक्ष दयानंद एरंडे ,लातूर जिल्हा अध्यक्ष नवनाथ नरवडे ,जिल्हा मार्गदर्शक प्रा,शेख महेताब ,जिल्हा उपाध्यक्ष राचुरे प्रकाश ,शिरूर अनंतपाळ ता,अध्यक्ष ज्ञानोबा कांबळे ,आदींनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व पाणी पुरवठा व स्वछता राज्य मंत्री संजय बनसुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुबंई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राज्याचे ग्राम विकास मंत्री मुश्रीफ साहेब यांच्या सोबत बैठक संपन्न झाली या बैठकीत ग्राम विकास चे उपसचिव बनकर साहेब ,पंचायत विभाग उपसचिव प्रवीण जैन साहेब राज्य मंत्री संजय बनसुडे साहेब व युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण व ग्रा,प,कर्मचारी युनियन चे पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये येत्या 20 ते 22 तारखे पर्यंत बैठक लावून कर्मचाऱ्याचे कांही प्रश्नावर निर्णय घेतला जाईल व किमान वेतनाचा प्रश्न मार्च नंतर विचारत घेऊन निकाली काढले जाईल असे आश्वासन मुबंई येथे दि,13 अक्टोब रोजी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी राज्य मंत्री बनसुडे साहेब व सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत हे आश्वासन दिले त्यामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेले प्रश्न निकाली निघतील अशी प्रतिक्रिया ग्रा,प,कर्मचारी युनियन चे जिल्हा मार्गदर्शक शेख महेताब यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे ,
ग्रा,प,कर्मचाऱ्याने कोविड 19 च्या वाढत्या प्रदूर्भावत स्वतःची व कुटूंबाची कसलीच पर्वा न करता गावात कंटेन्मेंट झोन पासून ते दवंडी देऊन कोविड विषयी जनजागृती करणे ,गावातील आरोग्य अबाधीत ठेवण्यासाठी गटारी साफ करणे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पुरवठा करणे असे सर्व ग्राम पातळीवरील जोखमीचे कामे हे सेवक करतो अन पगार मात्र 2500 रु म्हणजे "खोदा पहाड ,अन निकला चुहा ,अशी गत ग्रा,प,कर्मचाऱ्यांची झाली आहे ,लवकरच या कर्मचाऱ्याचा उपव्हास सुटणार की काय अशी आशा बळावली आहे ,
फोटो ओळ ,ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब ,राज्य मंत्री संजय बनसुडे साहेब ,व इतर अधिकारी शेख महेताब ,ज्ञानोबा कांबळे आदी,