उदगीर प्रतिनिधी:
आधार शहरी बेघर निवारा उदगीर मनिषा व्यंकट जाधव नावाची 25 वर्षीय महीला रा.बिदर हे सासर लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले. सुरूवातीला काही वर्षे संसाराचा गाडा खुप सुखी समाधानाने व आनंदाने सुरू होता पण मध्येच पतीच्या डोक्यामध्ये संशयाचं व अपेक्षाचे वादळ निर्माण होऊन पती पत्नीमध्ये सतत भांडणं होऊ लागले आणि याचा परिणाम पत्नी दोन महिन्यांची गर्भवती असतानाच पतीने तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. सदर महीलेचे माहेर हे निलंगा तालुका जि.लातूर येथील असून जन्मदातेच हयात नसल्याने भावानी घरी न येण्यास सक्त ताकीद दिल्याने तिचे सर्व छत्र हरवले गेल्याचं अतोनात दुःख असूनही ती तिच्या चेह-यावर कधीच दाखवली नाही आणि स्वतःचा जीव व गर्भामध्ये असणा-या जीवासाठी ती भटकंती सुरू केली आणि गेली चार महिन्यांपासून उदगीर शहरामध्ये राहण्यासाठी आली. ती अशा ठिकाणी राहू लागली की कल्पना सुद्धा करवत नाही ते म्हणजे एक भिक मागणा-या वृद्ध महीलेसोबत झोपडीमध्ये पण दोन जीवाची माता जगण्यासाठी धडपड करीत करीत एका हॉटेल मध्ये स्वयंपाक करण्याची नोकरी धरली आणि आपलं जगणं सोपस्कर केलं,सकाळी जाणे आणि रात्री उशिरा झोपडीमध्ये आश्रयासाठी जाणे ही पायपीट सुरू झाली, गर्भातल्या बाळाची वाढ होत असतानाच महिलेच्या मनात भिती वाढू लागली माझं ठिक आहे पण बाळाचं काय अजून जगही पाहीलं नाही काय करावं आणि काय नाही या द्विधा अवस्थेत जगू लागली पण त्या झोपडीत ती पक्कं व सुरक्षिततेचे स्वप्न पाहत होती पण असह्य व बेसहारा असल्याचे पाहून काही टवाळखोर युवकांची नजर त्या महीलेवर रोखू लागली अशातच ती खुप भयभीत होऊन भटकत असताना शहरातील एका गृहस्थाने त्यांना नगर परिषदेच्या बेघर निवारा केंद्राचा पत्ता दिला त्या गृहस्थाने निवा-याबाबत असणारी सुविधा व माणूसकीचे शाब्दिक दर्शन व विश्वास दिल्याने ती महीला निवा-यावर आली तेव्हा ती खुप भेदरलेल्या अवस्थेत होती, सहा महीन्याची गर्भवती अवस्थेतील महीला निवा-यामध्ये आश्रयास आली आणि तिच्या आयुष्यात घडलेली सर्व वास्तव घटना सांगत होती आणि माझ्या निवा-यात असणा-या सर्वांच्या डोळ्यांतील अश्रूला वाट मिळाली सर्वांनी बेघर बांधवांनी तिला मुलगी व बहिण म्हणून स्विकारले आणि देखभाल व व्यवस्थापन करणा-या गौस शेख यांच्या संस्थेने मुलगी म्हणून स्विकारताच त्या भगीनीला अश्रू अनावर झाले.
निवा-यावर येण्याच्या पूर्वी त्या महिलेस वाटत होते की महिलेच्या आयुष्यातील पहीला सर्वोच्च आनंदाचा व सुखाचा क्षण असतो तो अनुभवता येणारच नाही, पण जेव्हा ती आपल्या निवा-यामध्ये आली आणि काल तिला तो सर्वोच्च आनंदाचा क्षण अनुभवास आला तेंव्हा ती खुप खुप आनंदी झाली आणि महिलांच्या गळ्याला लागून आपले आनंदाश्रुला वाट मोकळी करून दिले.काल आधार शहरी बेघर निवारा म्हणजे मुलींसाठी जणू माहेरवासच अनुभवला आहे. मनिषाला सातवा महीना लागल्याने लातूर जिल्ह्याच्या परंपरेनुसार तिची ओठी भरण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आणि हा प्रसंग खुप आनंदी व आल्हाददायक अनुभवायला मिळाला.यासाठी अथक परिश्रम खुर्शिद शेख,गौस शेख,समीर शेख व सर्व संस्थेचे कर्मचारी बेघर बांधव व मार्गदर्शन लक्ष्मण जाधव DAY-NULM
बेघर निवारा हाच बहुतेकासाठी आधारवड व माहेर आहे.