लातूर प्रतिनिधी: अहेमद तांबोळी
बाभळगाव येथे राष्ट्रीय महामार्ग ते वैशाली नगर हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आला असून त्या कामाचे भूमिपूजन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कामाचा दर्जा उत्तम राखून ते वेळेत पूर्ण करावे असे निर्देश याप्रसंगी दिले आहेत.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत नॅशनल हायवे ते वैशालीनगर रस्त्याच्या कामास नुकतीच मंजुरी मिळाली असून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवार दि.१८ जून रोजी पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले. या रस्त्याची रुंदी १५.५ तर १ किमी लांबी, ४ नळकांडी पूल असणार आहेत. या रस्त्यामुळे वैशालीनगरसह परिसरातील नागरीकांची गैरसोय दूर होणार आहे. या रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला जावा आणि रस्त्याचे काम वेळेत पूर्ण केले जावे अशा सूचना ना. अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित कंत्राटदार व महाराष्ट्र् रस्ते विकास मुख्यमंत्री महाराष्ट्र ग्रामीण सडक योजना संबंधित अधिकाऱयांना दिल्या आहेत.