Tuesday, September 24, 2024

नागरी सुविधा पुरविण्यास असमर्थ असलेल्या वलांडी ग्रा.पं.विरोधात गावकरीच्या वतीने उपोषणाचा इशारा!

वलांडी प्रतिनिधी: वलांडी गावातील नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक असलेल्या भौतिक सुविधा पुरविण्या पासून वंचित असल्याने ग्रामपंचायत कार्यालयाला तोंडी व लेखी अनेक वेळा तक्रारी देऊनही नागरिकांच्या भौतिक सुविधेकडे दुर्लक्ष करून वलांडीकरांना आवश्यक असलेली वीज, पाणी, गटारी, रस्ते यापासून दूर ठेवून वलांडी ग्रामपंचायत नागरिकांना सुविधा पुरविण्यास असमर्थ असल्याने वलांडी गावातील समस्त नागरिकांच्या वतीने देवणी तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती देवणी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनातील ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा 1 ऑक्टोबर 2024 पासून वलांडी ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे सदर निवेदनावर 65 समस्त गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत उपोषणातील खालील प्रमाणे मागण्या घेऊन बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात येत आहे.
उपोषणकर्त्यांचे खालील प्रमाणे मागण्या..
1) आठ कोटी मंजूर निधी पाणीपुरवठ्याचे काम दर्जेदार व जलद गतीने करून दिरंगाई करणाऱ्या गुत्तेदारावर कारवाईची मागणी. 
2) गावातील सर्व जातीतील गरजूं लोकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा.
3) गावा अंतर्गत रस्त्याचे व गटारीचे कामे करून जनतेची गैरसोय दूर करावी
4) ग्रा.पं.हद्दीत असलेल्या जमिनीची गावठाण हद्दवाढ करून वाढीव कुटुंबाचे पुनर्वसन करणे.
5) माधव सगर या ग्रामसेवकाची हकालपट्टी करून मुख्यालयी व कायमस्वरूपी राहणाऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती करून बायोमॅट्रिक मशीन बसवण्यात यावी.
6) लिंगायत व जंगममाला समाजाच्या स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून द्यावी
7) बौद्ध समाजाच्या जुन्या स्मशानभूमी जागेची नमुना नंबर 8 अ ला नोंद करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करणे.
8) मातंग समाजाच्या स्मशानभूमीत दहन शेड तयार करून द्यावे
9) मुस्लिम स्मशानभूमीच्या जागेचा ताबा देऊन त्यास संरक्षण भिंत द्यावी.
10) मराठा, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षणाचा ठराव देऊन शासनाला पाठवावे.
11) वाढीव स्वस्त धान्य दुकानाचा ठराव घेऊन शासनाला पाठवावे.
12) वलांडी बाजारपेठेत सार्वजनिक मुतारी व स्वच्छालय बांधण्यात यावे. अशा मागण्याचे निवेदन दि.24 सप्टेंबर रोजी देण्यात आले आहे. उपोषण कर्ते अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोध समितीचे मराठवाडा अध्यक्ष शेख अजीम व महिला प्रदेश सचिव आसिया रिजवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सदर निवेदन देताना सौदागर महमदरफी संस्थापक अध्यक्ष अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समिती, दत्ता डुब्बे तालुकाध्यक्ष किसान सेल काँग्रेस पार्टी, धनराज बिरादार माजी तंटामुक्ती अध्यक्ष, अजिज सौदागर ज्येष्ठ पत्रकार यांनी निवेदन दिले.

Sunday, September 8, 2024

कायद्याचा ज्ञान नसलेला अनाडी अभियंता शिरीष राघूला प्रशिक्षणाची गरज RTI.

उदगीर प्रतिनिधी: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग उदगीर या कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी शिरीष राघू हे माहितीचा अधिकार अधिनियम-2005 या कायद्याच्या ज्ञानापासून अनभिज्ञ असल्याचे माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरामधील पत्रावरून स्पष्ट होते. सविस्तर असे की अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग उदगीर अंतर्गत मौजे वलांडी येथे जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम सुरू करण्यात आले होते काम थोडे करून जास्तीचे बिल उचलण्यात आल्याने माहिती अधिकारात मौजे वलांडी पाणीपुरवठा या योजनेचे झालेले काम 44.81% टक्के झालेल्या कामांचे नावे, कोठून कोठेपर्यंत काम करण्यात आले त्या गावाचे नाव ठिकाणासह या सर्व कामाची माहितीची यादी सत्यप्रत करून द्यावे अशी माहिती मागितली असता जन माहिती अधिकारी तथा उपविभागीय अभियंता शिरीष राघू यांनी जल जीवन पाणीपुरवठा योजनेत केलेला भ्रष्टाचार उघड होतो या भीतीपोटी माहिती न देण्याच्या उद्देशाने असे उत्तर दिले की आपण केलेला अर्ज लेटर पॅड वर टंकलिखित केलेला आहे असे म्हणून अद्याप माहिती दिली नाही.
त्यामुळे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय लातूर येथे प्रथम अपील दाखल करून अशी मागणी करण्यात आली की, माहिती अधिकार अधिनियमाच्या तरतुदीचा अभ्यास व ज्ञान जन माहिती अधिकारी उपविभागीय अभियंता शिरीष राघू यांना नाही त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाची तजवीज करावी व प्रथम अपील आदेश मध्ये दोषी जन माहिती अधिकारी व चुकीच्या पद्धतीने हाताळणारे बेजबाबदार कृतीचे वर्तन करून या अधिनियमा प्रती अनआस्था दर्शकन माहिती अधिकार या अधिनियमाचे कलम 7(1) चा भंग केला आहे यामुळे त्यांच्याविरुद्ध सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 31 मार्च 2008 च्या परिपत्रकानुसार कठोर शिस्तभंगाची कार्यवाही करावी. व जन माहिती अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून प्रथम अपील आदेश त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही शिफारस लेख स्वरूपात नमूद करावी. त्यामुळे यांना सदर कायदयाचे ज्ञान नाही. किंवा प्रशिक्षण घेतलेले नाही हे स्पष्ट  होते. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा कायदा निर्गमित होऊन 18 ते 19  वर्ष झाले एवढा प्रंचड व प्रदिर्घ  कालावधी उलटुन देखील जनमाहिती अधिकारी तथा उपविभागीय अभियंता शिरीष राघू यांना लोकभिमुख कायद्याविषयी ज्ञान असु नये ही खुप मोठी शोकांतिका आहे.

Friday, August 30, 2024

कार्यवाहीचा बडगा दाखविल्याने डाक सेवक पदाचा राजीनामा दिला मात्र सदर काळात डीएड केलेले वैद्य की अवैद्य? एक व्यक्ती दोन ठिकाणी नोकरी व शिक्षण करतोच कसा? अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समितीच्या तक्रारीची दखल!

उदगीर प्रतिनिधी: उदगीर येथील सय्यद एहतेशाम सय्यद खलील यांनी जमहुर अध्यापक विद्यालय उदगीर येथे हजर राहून डीएड शिकत असताना विद्यार्थी हजेरी पटावर स्वाक्षरी करून शैक्षणिक वेळ सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत उपस्थिती दाखवली आहे डीएड मध्ये शिकत असताना त्याच शैक्षणिक वेळेत म्हणजेच 10 ते 1:30 वाजेपर्यंत उदगीर व देवणी पोस्ट ऑफिस मध्ये हजर नसताना खोटी स्वाक्षरी दाखवून पगार घेऊन उदगीर डाक निरिक्षक व डाक अधीक्षक विभाग लातूर यांच्याशी आपसात संगणमत करून पगार ची वाटाघाटी करून शासनाची फसवणूक केल्याने सदरचे प्रकरण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी अनेक वेळा वरिष्ठांशी तक्रारी अर्ज करून संबंधित प्रकरणाची अनेक वेळा बातमी प्रकाशित केल्याने डाक संचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी त्याची दखल घेऊन संबंधितास कारवाईचा बडगा दाखविल्याने तो सय्यद एहतेशाम यांनी डाक सेवक पदाचा राजीनामा देऊन डाक कार्यालयातुन सेवा मुक्त झाला खरा पण सदरच्या काळात डीएड शिक्षण घेतल्याने सदर शिक्षण विभागाची चौकशी मात्र गुलदस्त्यातच असल्याने डीएड शिक्षण बोगस की डाक कार्यालयाची नोकरी बोगस याची सखोल चौकशी करावी म्हणून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने शिक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात व डाक विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात दोन्ही ठिकाणी तक्रार दिली आहे दोन्हीही विभागात सदर प्रकरणाची चौकशी चालू आहे चौकशी पूर्ण झाल्यावरच कळेल की डाक विभागाची नोकरी व डीएड शिक्षण घेत असलेली डिग्री कोणती वैद्य व कोणती अवैद्य आहे हे चौकशी झाल्यानंतरच कळेल. परंतु सदर प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती लढा देत राहणार. 
डाक निरीक्षक उदगीर बुरखे बालाजी यांनी दिलेल्या माहिती वरून दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सदर डाक सेवक सय्यद एहतेशाम सय्यद खलील यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्याचे सांगितले.

Wednesday, August 21, 2024

परळी न.प.समोर ऊपोषणाचा तीसरा दिवस! मात्र प्रशासन झोपेतच, उपोषणकर्त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष,

परळी वै. दि.20 अगस्ट पासुन सरदार नगर, रेणुका नगर, बश्वेस्वर नगर व सनिया नगर या भागात मुलभूत सुविधा पुर्विण्या साठी अन्यान्य अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीचे अल्पसंख्याक मराठवाड़ा अध्यक्ष शेख अजीम उपोषणाला बसलेले आहेत आज उपोषणाचे तिसरे दिवस आहे पण नगर परिषद प्रशासन झोपेतच आहे, ऊपोषण करते शेख अजिम यांची प्रकृती खालावल्याने सदर भागातील नागरिक खवळल्याने प्रसतीथी चिघडण्याचे दिसत आहे. सदर भागात कसल्याही प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध नाहीत पिण्याचे पाणी, रोड़, सांड पाणीसाठी नाल्या नाही व पददिवे नाही अशा विविध मागण्या घेऊन अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे या उपोषणाला पाठिंबा देणारे फरकूद अली, रसुल खान, महिलांचे कामे करनारे मॅडम सुनिता नरंगलकर, खय्युम खान, शिंदे सर, तहसिन सर, शेख खुद्दुस, हुजूर खान, नासेर अन्सारी, मानवाधिकारचे जमील अध्यक्ष, शेख बद्रोद्दीन बाबुमिया, मुसब्दिन, एम आय एम चे मुस्तफा मैनोद्दिन शेख, शेख सोहेल, यासिन अजिम शेख,  हुजेफा रहिम शेख, यांनी उपोषणा स्थळी भेटदेऊन पाठींबा दिला .

Tuesday, August 20, 2024

देवणीत मुस्लिम समाजाच्या वतीने गिरी महाराजांच्या विरोधात निषेध व मूक मोर्चा! मुस्लिम धर्मीय विरोधात जाणून बुजून धार्मिक भावना दुखावून जातीय दंगल घडवणाऱ्या रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करा

देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन: दोन धर्मीयांमध्ये जाणून बुजून जाती तेढ निर्माण करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावे यासाठी देवणी शहरात मंगळवारी सकाळी ठीक अकरा वाजता समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने जामा मस्जिद येथून मूक मोर्चास सुरुवात करण्यात आली, हा मोर्चा गांधी चौक मार्गे बोरोळ चौकात येऊन धडकला यावेळी अनेक मुस्लिम समाजातील मौलाना चे भाषणे झाले यावेळी मौलाना हाफीज आलामखान  बोलताना सांगितले की आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगिरी महाराजाकडून मुस्लिम धर्मीय विरोधात जाणून बुजून धार्मिक भावना दुखावून जातीय दंगल घडवण्याच्या इराद्यात वक्तव्य करून घेण्यात येत असल्याचे बोलले ,तसेच नितेश राणे हा सुद्धा दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभावा म्हणून जाणून-बुजून चिथावणी खोर भाषणे करीत आहे, मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इस्तेमा होतात त्यामध्ये फक्त मुस्लिम विषयी प्रवचन देऊन माणसाने समाजात माणूस म्हणून कसे जगावे याबाबत शिकवन दिली जाते ,पण कोणत्याही धर्म जाती विरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले जात नाही, तरी दोन धर्मीयांमध्ये जाणून-बुजून तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावे अशा मागण्याचे निवेदन देवणी तहसीलदार यांना देण्यात आले आहे, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे देवणी तालुका अध्यक्ष अयुब कुरेशी, मौलाना हीफजूर रहमान, मौलाना हाफीजं आलम  खान, मौलाना हाफीज युनूस, मौलाना हाफिज नईम, मौलाना हाफिज इब्राहिम तांबोळी, मौलाना सैफ जमीनदार, मौलाना हाफीज आजिम, मौलाना हाफिज मैनोदिन, मौलाना फैयाज शेख, फैयाज शेख, सईद खान, अल्ताफ शेख, सादक कुरेशी, अहमद सय्यद, माजीद तांबोळी, सुलतान मल्लेवाले, जुहेब उंटवाले, सगीर मोमीन,अक्रम शेख, शकील तांबोळी, बाबूलाल पठाण, ताज मुंजेवार, यासीन मुर्शिद यांच्यासह देवणी तालुक्यातील असंख्य मुस्लिम बांधव या निषेध व मूक मोर्चात सहभागी होते,हा मोर्चा शांतेत पार पडला,यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्यासह चोख बंदोबस्त ठेवला होता

Monday, August 19, 2024

वलांडी येथे मूसळधार पावसाचे पाणी दुकानात शिरले..

वलांडी प्रतिनिधी: तालुक्यातील वलांडी येथे ४ वाजता मूसळधार पावसास सूरूवात झाली व पाऊसाने किमानं एक ते दिड तास झोडपल्याने वलांडी येथील मूख्य बाजार पेठेत जागी जागी पाणी साचले व पाणी जाण्यासाठी पर्याय मार्ग नसल्याने पावसाचे पाणी येथील व्यापाऱ्यांच्या दूकानात शिरले.
१०१७ व २०१८ या कालावधीत रस्ते बनले आहेत.या रस्त्याच्या दूतर्फा नाल्याचे काम होणे आवश्यक होते.परंतू असे न करता वलांडी येथील मूख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले मात्र त्यांच्या बाजूच्या नाल्याचे काम न झाल्यामुळे व रस्त्यांची उंची वाढवल्यामूळे दोन दिवसांपासून पडत असलेल्या मूसळधार पावसामुळे बाजार पेठेत पाणी साचुन दूकानात पाणी शिरले व्यापाऱ्यांनी शिरलेले पाणी बकेटच्या साह्याने बाहेर काढुन टाकले.मूख्य बाजार पेठेत व्यापाऱ्यांनी जागो जागी  अतिक्रमण केल्याने हा प्रकार घडला अतिक्रमणामूळे नाल्याचे काम झाले नाही व रोडचे काम झाल्याने रोडची उंची वाढल्याने हा प्रकार घडला.यामूळे जो तो ग्रामपंचायती कडे तक्रारीचा पाढा वाचत आहे मात्र अद्याप तरी ग्राम पंचायत प्रशासनाने यावर कोणती उपाययोजना करतील.आता ग्रामपंचायत कोणती उपाययोजना योजना करणार हे महत्वाचे ठरणार.

Wednesday, July 31, 2024

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील फ्रुट मार्केट व्यापाऱ्यांशी साधला सुसंवाद

लातूर प्रतिनिधी : सगीर मोमीन ३१ जुलै २०२४ लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौका नजीकच्या फ्रुट मार्केट परीसरात जाऊन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री वलातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी तेथील व्यवस्थांची पाहणी केली. त्याठिकाणी व्यापारी, फळ विक्रेते, वाहनधारक आणि नागरीक यांच्याशी सुसंवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी फ्रुट मार्केट परीसरात जाऊन तेथील व्यवस्थांची पाहणी केली. त्याठिकाणी व्यापारी, फळ विक्रेते, वाहनधारक आणि नागरिक यांच्याशी चर्चा केली. फ्रुट मार्केटमध्ये दररोज नियमितपणे स्वच्छता करावी, या ठिकाणच्या कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा लावावी, व्यापारी,फळविक्रेते, तसेच नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी पार्किंग व्यवस्थेवर लक्ष द्यावे, या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारावी, फ्रुट मार्केट मध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी करून त्याची नियमित स्वच्छता होईल हे पाहावे आदी सूचना महानगरपालिका प्रशासनाला करून, आगामी काळात फळ विक्रीसाठी येणारे शेतकरी त्याचबरोबर
व्यापारी यांच्याशी नवीन अद्यावत फ्रुट मार्केट उभारणी करावी असेही यावेळी सांगितले यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, लातूर फ्रुट मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष हाजी शबीर, रहेमानसाब बागवान, शब्बीर हाजी, मेहतासाब बागवान, बरकत हाजी, रहेमानसाब बागवान, विजयकुमार साबदे, इमरान सय्यद, आसिफ बागवान, सचिन बंडापले, अब्दुल्ला शेख, सुलतान शेख, मजीद हाजी, कासीमसाब बागवान, तबरेज तांबोळी, गिरीश ब्याळे, असंघटित कामगार काँग्रेसचे लातूर शहराध्यक्ष तथा महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य गौस गोलंदाज, लातूर हातगाडा असोसिएशन सचिव मजीद बागवान, हमीद चाकूरकर, सुलतान शेख, मजीद हाजी, कासिमसाब बागवान, बरकत बागवान, जाकिर बागवान, बडेसाहब शेख, अनवर बागवान, रफिक बागवान, रईस बागवान, आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी फ्रुट व्यापारी आडते हमाल मापाडी उपस्थित होते.

कापड्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला, 1 लाख 28 हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

लातूर प्रतिनिधी: सगीर मोमीन लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलीस ठाणे हद्दी मध्ये रात्रीच्यावेळी एका कपड्याच्या दुकानाचा पत्रा काढून साड्या व कपडे चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
              पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. 
             सदर पथकाकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी गुप्त बातमीदाराकडून नमूद गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली.
                   सदर पथकाने नमूद गुन्ह्यातील आरोपीला दिनांक 30/07/2024 रोजी कळंब तालुक्यातील पाथर्डी येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 1) दादा बब्रुवान पवार, वय 45 वर्ष राहणार पाथर्डी तालुका कळंब जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) असे असल्याचे सांगितले.
त्याच्या घराची झडती घेतली असता घरा मध्ये नवीन साड्या व कपडे मिळून  आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या पत्नीसह लातूर जिल्ह्यातील रेनापुर येथील  एका कपड्याच्या दुकानात चोरी केल्याचे व त्यामध्ये चोरलेले साड्या व कपड्याचा मुद्देमाल असल्याचे कबूल केले.
                त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलसह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे रेणापूर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. असून त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उप-निरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार रामहरी भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, प्रकाश भोसले, सुरेश कलमे, प्रदीप चोपणे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पुणेकर, पोलीस अमलदार गोरोबा इंगोले, अंकुश बिराजदार यांनी केली आहे.

सीमावर्ती भागात सूर्यवंशी यांच्यातर्फे पत्रकारांचा सत्कार

वलांडी प्रतिनिधी: सगीर मोमीन भालकी तालुक्यातील आळवाई येथे कर्नाटक हुलसुर तालुका पत्रकार संघ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांचा व महाराष्ट्रातील काही पत्रकारांचा आळवाई येथे दि.30.जुलै रोजी युवा नेते कर्नाटक रोहिदास संघटना अध्यक्ष गोपाळ बाबुराव सुर्यवंशी यांच्या तर्फे पत्रकाराने केलेल्या कामाचे कौतुक करून सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम हे पत्रकार बांधव करत असतात त्या अनुषंगाने सत्कार समारंभ करण्यात आले रोहीदास संघटने तर्फे अशे अनेक गरजू लोकांना साहित्याचे वाटप व सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबविले जातात यावेळी जेष्ठ पत्रकार संपादक तेरणातीरचे पी आर पाटील,विद्यासागर पाटील, दत्तात्रेय साबणे,शीवकुमार खपले, गुरूप्रसाद मेंठे,वीरशेठी करकले,आकरम शेख,राजु कीसे,डी एम स्वामी,सगीर मोमीन सोसायटी अध्यक्ष जनार्दन बीरादार,ग्रामपंचायत माजी अध्यक्ष गुणवंतअप्पा गंदगे,माजी सभापती अकबर पटेल, गुंडअप्पा गंदगे,दत्ता पाटील, जनार्दन जयदेव, राजकुमार गंदगे,खंडु मोरे    व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

वलांडीत जलजीवन योजनेचे पाणीकाही येईना रस्ते खंदल्यामुळे नागरिकांना घरापर्यंत जाता येईना

वलांडी प्रतिनिधी: सगीर मोमीन देवणी तालुक्यातील वलांडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या खड्यांत पाणी साचत असल्याने संतप्त नागरीकांनी वलांडी येथील ग्राम पंचायत कार्यालयात निवेदन देण्यात आले.वलांडी येथील वार्ड क्रमांक १ मधील शासकीय अरोग्य केंद्र शेजारील वसतीत जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या खड्यात पाणी साचल्याने तेथील नागरीक वृध्द महीला व शाळकरी मूलांना साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत आहे.
पडलेल्या पावसाला जाण्यास पर्यायी मार्ग नसल्याने पाणी साचत आहे.
पुर्वे कडील बाजूला शासकीय आरोग्य केंद्र आहे व पलीकडे मूस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थान मस्जिद आहे.तरी मस्जिद जाण्यासाठी मुस्लिम बांधवांना याच साचलेल्या पाण्यातून वाट‌ काढावी लागत आहे.
जलजिवन मिशनचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे . केंद्र सरकारचे धोरण होते की हर घर नल हर घर जल या मिशन अंतर्गत कामास जोमात सुरुवात झाली होती.जलजिवनचे काम वेळेवर न झाल्याने गावात नळांसाठी  खोदलेल्या खड्यात पाणी साचुन जागो जागी डबक्यामूळे नागरीकांच्या आरोग्यास धोका  निर्माण होत आहे.
ग्राम पंचायत मात्र झोपेचे सोंग घेत आहे.तरी वेळोवेळी ग्राम पंचायतला तोंडी सांगूनही काम होत नसल्याने संतप्त नागरीकांनी ग्रामविकास अधिकारी माधव सगर यांना ३ ते ४ दिवसांत साचलेल्या पाण्याचे योग्य ते  नियोजन लावावे व जर या साचलेल्या पाण्यामुळे नागरीकांना डेंग्यू मलेरीया सारखे आजार जडले तर ग्राम पंचायतीला ग्राह्य धरण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माने गोपाळ, त्रिनेत्र सूर्यवंशी, सिध्देश्वर खवंदे,अमोल कांबळे,समाधान श्रंगारे,योगेश थोरात,उमाकांत कांबळे,आदी उपस्थित होते.

Friday, July 26, 2024

भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा उदगीर येथील कार्यक्रम लांबणीवर लातूर, दि. २६ : भारताच्या माननीय राष्ट्रपती

श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवार, ३० जुलै, २०२४ रोजी उदगीर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार होते.  मात्र, माननीय राष्ट्रपती महोदया यांचा पूर्वनियोजित महाराष्ट्र दौरा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचे राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून कळविण्यात आले आहे. परिणामी उदगीर येथील बुद्ध विहार उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Tuesday, July 5, 2022

अंबाजोगाई आरटीओच्या अनागोंदी कारभारा विरुद्ध अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे बेमुदत आमरण उपोषण! उपोषणाचे दुसरे दिवस! मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष

अंबाजोगाई प्रतिनिधी रशीद शेख:
अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी , उपप्रादेशिक परिहवन कार्यालयातील लर्निग लायसन्स व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे मराठवाडा संपर्क प्रमुख मोहमद ताहेर  हे दिनांक 5 जुलै पासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने लर्निग लायसन्स संदर्भातील परिक्षार्थी ऑनलाईन पध्दतीने C.C.T.V. कॅमेरेसमोरील फुटेजच्या हार्ड व सॉफ्ट कॉपीची प्रत पुरविण्यात यावी तसेच सदर परिक्षा पास झालेल्या परिक्षार्थ्याची यादी व सदर परिक्षा अनुउत्तीर्ण झालेल्या परिक्षार्थ्याची यादी देण्यात यावी अशी मागणी वेळोवेळी निवेदन व माहिती अधिकार अंतर्गत मागण्यात आली होती. परंतु 1 सप्टेंबर 2019 पासून ते आज दिनांकापर्यंत न दिल्याने व वरील मागण्यावर कसलीही कार्यवाही न केल्याने 01 जुलै 2022 पासून आमरण उपोषणास बसणार होते परंतु काही अडचणीमुळे सदर रोजीचे उपोषण स्थगित झाल्यामुळे ते दि .04 जुलै पासून दुपारी 1.00 वाजल्यापासून उपप्रादेशिक परिहवन कार्यालया समोर आमरण उपोषणास बसत आहे. अशा आशयाचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनातून म्हंटले आहे. दिं.4 जुलै रोजीचे उपोषण काही कारणांवये दिं.5 जुलै रोजी सुरू झाले आहे असे सांगण्यात आले आहे. व आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे परंतु या उपोषणाकडे प्रशासनाच्या मागण्यावर अद्याप दुर्लक्ष करण्यात येत आहे या उपोषणाची जर तात्काळ दखल न घेतल्यास पूर्ण महाराष्ट्रात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे पदाधिकारी रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करावे लागेल.

Saturday, May 14, 2022

निलंगाचे तहसीलदार जाधव वाळू माफियांना देतात अभय! 70 हजार दंडाची रक्कम तात्काळ वसूल करण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीची मागणी.

निलंगा प्रतिनिधी: निलंगा तालुक्यात अवैधरित्या वाळू उत्खनाबाबत अनेक गैरकारभार आहेत पदाचा दुरुपयोग करून अवैध वाळू माफियाला पाठीशी घालणाऱ्या तहसीलदार गणेश जाधव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
निलंगा येथील इनाम जमीन सर्वे नंबर 291 स्टार फंक्शन हाॅल मध्ये अवैध वाळू साठा जप्त करून लिलाव दिनांक 24/0 6/2021 रोजी कागदोपत्री करण्यात आले लिलाव रक्कम 70470 रुपये आज पर्यंत रियाज महेमुद खान यांच्याकडून लिलाव रक्कम वसूल न करता त्या वाळू माफिया कडून आर्थिक देवाण-घेवाण करून व संगणमत करून तहसीलदार जाधव अवैध वाळू माफिया सोबत हात मिळवणी केलेली आहे.
दिलेल्या तक्रारीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांना जातीने लक्ष घालून दोषी निलंगा तहसीलदार गणेश जाधव व वसुली विभाग कारकून पाटणकर यांची चौकशी करून संदर्भीय पत्रा प्रमाणे त्या रकमेची वसुली करून बेजबाबदार  तहसीलदार गणेश जाधव व संबंधित कर्मचारी जे की अवैध माफियांना पाठीशी घालत अल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा वीलाजास्तव अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल.
*70 हजार दंडाची रक्कम तात्काळ वसूल करण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीची मागणी.*
निलंगा प्रतिनिधी: निलंगा तालुक्यात अवैधरित्या वाळू उत्खनाबाबत अनेक गैरकारभार आहेत पदाचा दुरुपयोग करून अवैध वाळू माफियाला पाठीशी घालणाऱ्या तहसीलदार गणेश जाधव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
निलंगा येथील इनाम जमीन सर्वे नंबर 291 स्टार फंक्शन हाॅल मध्ये अवैध वाळू साठा जप्त करून लिलाव दिनांक 24/0 6/2021 रोजी कागदोपत्री करण्यात आले लिलाव रक्कम 70470 रुपये आज पर्यंत रियाज महेमुद खान यांच्याकडून लिलाव रक्कम वसूल न करता त्या वाळू माफिया कडून आर्थिक देवाण-घेवाण करून व संगणमत करून तहसीलदार जाधव अवैध वाळू माफिया सोबत हात मिळवणी केलेली आहे.
दिलेल्या तक्रारीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांना जातीने लक्ष घालून दोषी निलंगा तहसीलदार गणेश जाधव व वसुली विभाग कारकून पाटणकर यांची चौकशी करून संदर्भीय पत्रा प्रमाणे त्या रकमेची वसुली करून बेजबाबदार  तहसीलदार गणेश जाधव व संबंधित कर्मचारी जे की अवैध माफियांना पाठीशी घालत अल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा वीलाजास्तव अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल.
निलंगा प्रतिनिधी: निलंगा तालुक्यात अवैधरित्या वाळू उत्खनाबाबत अनेक गैरकारभार आहेत पदाचा दुरुपयोग करून अवैध वाळू माफियाला पाठीशी घालणाऱ्या तहसीलदार गणेश जाधव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
निलंगा येथील इनाम जमीन सर्वे नंबर 291 स्टार फंक्शन हाॅल मध्ये अवैध वाळू साठा जप्त करून लिलाव दिनांक 24/0 6/2021 रोजी कागदोपत्री करण्यात आले लिलाव रक्कम 70470 रुपये आज पर्यंत रियाज महेमुद खान यांच्याकडून लिलाव रक्कम वसूल न करता त्या वाळू माफिया कडून आर्थिक देवाण-घेवाण करून व संगणमत करून तहसीलदार जाधव अवैध वाळू माफिया सोबत हात मिळवणी केलेली आहे.
दिलेल्या तक्रारीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांना जातीने लक्ष घालून दोषी निलंगा तहसीलदार गणेश जाधव व वसुली विभाग कारकून पाटणकर यांची चौकशी करून संदर्भीय पत्रा प्रमाणे त्या रकमेची वसुली करून बेजबाबदार  तहसीलदार गणेश जाधव व संबंधित कर्मचारी जे की अवैध माफियांना पाठीशी घालत अल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा वीलाजास्तव अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय लातूर समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल.

Tuesday, October 19, 2021

शिरूर ताजबंद येथे ईद मिलाद-उन-नबी जुलुस साजरा


शिरूर ताजबंद प्रतिनिधि: शादुल शेख
शिरूर ताजबंद ता.अहमदपुर येथे मंगलवारी दिनांक 19 जुलुस काढून ईद मिलाद-उन-नबी सन साजरा करण्यात आला या वेळी ईद मिलाद-उन-नबी कमेटी अध्यक्ष सादिक पाशा शेख व सुन्नी यूथ फोर्स चे आसिफ भाई किनीवाले यांनी सणा बद्दल माहिती सांगितले.
या वेळी जि. प गट नेते मंचकराव पाटिल ,चंद्रशेखर पाटिल, शिवानंद भोसले,महेश बिलापट्टे  शेख रहिम् उर्फ् (शेखुभाई) मुस्तफा सौदागर,मेहबूब सय्यद,मुन्ना शेख,महेताब सर, बादल शेख, अमीर सौदागर, अलाउद्दीन किनीवाले,गुलाब पठान,आदि उपस्थित होते या रैली चे आयोजक हुसेन किनीवाले, एमडी इरफ़ान शेख, एजाज मुंजेवार,अलीम शेख,मणियार शादुल,शेख सद्दाम, शेख इब्राहिम, आदि यांनी परिश्रम घेतले व आभार शादुल्ला शेख यांनी मानले.

मुक्रमाबाद येथील मोढा रोड व पोलीस स्टेशन रोड लवकर करा: अन्यथा आंदोलन करु

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती ची मागणी
मुक्रमाबाद प्रतिनिधी: शेख सैलानी
 मुक्रमाबाद येथील मोढा रोड व पोलीस स्टेशन रोड अपघाताचा सापळा बनले असुन. या दोन्ही रोडवर नालीचे पाणी साचलेले असते यामुळे नेहमी वाहने घसरून पडत असतात .मोढा रोड वरून तर माणसांना चालणे सुद्धा अवघड झाले आहे. याच रोड वरून शाळा, कॉलेज, मोढा, तलाठी कार्यालय, व पोलीस स्टेशन साठी नागरिकांचा नेहमी येणे जाणे करावे लागते.
 हा रस्ता अतिशय जिक्रीचा झाला असुन विद्यार्थ्यांना देखील चिकलातुनच आपली शाळा गाठवावी लागत आहे. तात्काळ दुरुस्त करावे. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषणास बसण्याचा  इशारा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समितीच्या वतिने निवेदनाद्वारे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांना देण्यात देण्यात आले. यावेळी अन्याय अत्याचार समितीचे मुक्रमाबाद शहरअध्यक्ष शेख सैलानी, शोहेब पठाण, खलील पटेल, शेख खालेद, मनान पटेल,शेख अनम,रियाज हिंगजीरे, कृष्णा पाटील बनवरे, अब्दुल हिंगजीरे, अविनाश पाटील, सदानंद घा व इतर नागरीक उपस्थित होते

Saturday, September 18, 2021

मा.ना.राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सरफराज भाई मनियार यांना शिवरत्न पुरस्कार

लातूर प्रतिनिधी: लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त सरफराज भाई मनियार यांना
 शिवरत्न  पुरस्कार.देण्यात आले
 - लातूर मिशन वृतपत्र ०८ व्या वर्धीपन दिनाच्या निमित्ताने व शिवदर्शन फाऊंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवरत्न पुरस्कार २०२१ सामाजिक उपक्रम कोवीड १९ संकटकाळात केलेले कार्य याची दखल घेऊन  मा.ना.राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पुरस्कार  देण्यात आला यावेळी पुरस्कार स्विकारतांना श्री.सरफराज मणीयार व इतर मान्यवर उपस्थित होते पुढील सरफराज भाई मणियार यांना पुरस्कार देण्यात आला व पुढील वाटचालीस  वतीने  शुभेच्छा देण्यात आले

Sunday, September 12, 2021

श्री.गणेश मंडळ बोळेगाव तर्फे खुर्ची रेस स्पर्धा.

शासनाच्या नियमाप्रमाणे एक गाव एक गणपतीची स्थापना देवणी तालुक्यातील बोळेगाव येथे श्री गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. श्री. गणेश मंडळातर्फे म्युझिक खुर्ची रेस स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम क्रमांक- सूर्यकांत कृष्णाजी चौधरी, द्वितीय क्रमांक - सुमित ओमप्रकाश आंबेवाले व तृतीय क्रमांक सौरभ रवींद्र गायकवाड याने पटकावला आहे. या विजेत्यांना शालेय साहित्य देऊन गणेश मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. गणेश मंडळाचे पदाधिकारी- नवनाथ नागनाथ स्वामी,अविनाश राजशेखर झेरीकुंटे,शिवलिंग वीरभद्रआप्पा हिंडे, वैजनाथ राचया छोटीमट,बालाजी त्र्यंबक मुस्तापुरे, रामेश्वर गुरुनाथ मुस्तापुरे, संगमेश्वर ईश्वर मुस्तापुरे , महादेव पंढरीनाथ जडगे, जयप्रकाश तानाजी आंबेवाले, सतीश विशंभर जाधव, राजीव काशिनाथ चांडेश्वर,  हे उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने  स्पर्धक व गावातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश मंडळाकडून हनुमान मंदिर परिसराची स्वच्छता

देवणी तालुक्यातील बोळेगाव येथील श्री गणेश मंडळाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत 
 या मंडळाच्या वतीने आज रविवारी हनुमान मंदिरा भोवतील परिसर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येऊन संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली . यावेळी नवनाथ स्वामी,अविनाश झेरीकुंठे,वैजनाथ स्वामी,शिवलिंग हिंडे,संगेश्वर मुस्तापुरे,विजयकुमार भंडे,रामेश्वर मुस्तापुरे,माधव जडगे,मनोज बिरादार,बालाजी मुस्तापुरे,सोमनाथ स्वामी,महेश झेरीकुंठे,कृष्णाजी चौधरी,अमित झेरिकुंठे,ओम झेरीकुंठे,अनिल तांबवाड,काशिनाथ गोटे उपस्थित होते.

Monday, August 9, 2021

कोतवालांच्या मागण्या करिता संघटनेचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्री, महसूल मंत्री यांना निवेदन.

देवणी प्रतिनिधी: राज्यस्तरीय आंदोलनचा एक भाग म्हणून आज क्रांती दिनी राज्यातील सर्व तालुक्यातून कोतवाल संवर्गाच्या मागण्या करिता मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात येत आहे. 
देवणी तालुका कोतवाल संघटनेतर्फे  देखील हे निवेदन तहसीलदार देवणी  यांना देण्यात आले. 
   तालुका अध्यक्ष गणेश इदलकंठे,  सचिव बिजापूरे व्यंकटरमण यलप्पा यांच्या  स्वाक्षरी ने हे निवेदन  देण्यात आले.

Tuesday, August 3, 2021

स्वातंत्र्य सैनिकाचे खोटे नामनिर्देशन प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्णीयची मागणी सय्यद इद्रीस अहमद यांनी केली

प्रतिनिधी/ खतीब अब्दुल सोहेल 
स्वातंत्र्य सैनिकाचे बनावट नामनिर्देशनपत्राच्या आधारे शासनाची फसवणुक करणाऱ्या शाखा अभियंता एस एम देशमुख  यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी माहीती अधिकारी कारेकर्ता व अत्याचार निर्मूलन अभियान महाराष्ट्र मराठवाडा प्रमुख सय्यद इद्रीस अहमद यांनी केली.  सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एस एम देशमुख यांनी नौकरी मिळविण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी श्री पंथरीनाथ अंबाजी मालुसरे रा, घोणसी ता,उदगीर यांच्याशी संगनमत करून सख्या बहिणीचा मुलगा/बाचा असे रक्ताचे नातेवाईक असल्याचे दाखवून शासनाची फसवणुक केली असल्याची तक्रार करत शाखा अभियंता एस एम देशमुख  यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी इतवारा पोलीस ठाण्यात केली आहे

Monday, August 2, 2021

शिरूर अनंतपाळ येथे ओबीसी मेळाव्याच्या कार्यशाळेची आढावा बैठक संपन्न ,

शिरूर अनंतपाळ दि,2 (पठाण फथेअलीखान )येथे गांधी चौक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस च्याओबीसी मेळाव्याच्या कार्यशाळे ची आढावा बैठक ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण बतले शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे ,या आढावा बैठकीची सुरुवात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली ,
संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी वर जे अन्याय होत आहे आधी दिले पुन्हा काडून घेतले या केंद्राच्या जुलमी निर्णया विरुद्ध जनजागृती होणे गरजेचे आहे या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा,मा,ना,शरदचंद्र पवार ,राज्याचे उपमुख्यमंत्री मा,ना, अजित दादा पवार ,ओबीसी नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री मा,ना,जयंतराव पाटील ,राज्यमंत्री संजय बनसुडे ,युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज दादा चव्हाण , ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईशवर बाळबुद्धे ,जिल्हा अध्यक्ष आ, बाबासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल लक्ष्मण बतले यांनी शिरूर अनंतपाळ येथे संपूर्ण जिल्ह्यातील ओबीसी सेलची कार्यशाळा घेण्यासाठी प्रत्येक तालुक्याचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष ,कार्याध्यक्ष यांची आढावा बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला संबोधित करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य प्रा,मोहनराव भोसले यांनी मार्गदर्शन केले ,ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष ज्ञानोबा मोगले यांनी बोलताना व्यक्त केले की शिरूर अनंतपाळ येथे राष्ट्रवादीचे प्रवक्ते याच तालुक्याचे भूमिपुत्र सूरज चव्हाण याच्या आदेशाने शिरूर अनंतपाळ येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे प्रत्येक तालुक्यातून ओबीसी चे किमान 30 सैनिक तयार करून प्रत्येक तालुक्यात गावागावातून पवार साहेब आणि त्यांनी ओबीसी समाजासाठी केलेले कार्य तळागाळातील जनते पर्यंत पोहचवण्याचे काम हे सैनिक करतील अशी अपेक्षा मोगले यांनी व्यक्त केली ,अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शेख महेताब ,जिल्हा उपाध्यक्ष बबन होनमाणे ,तालुका अध्यक्ष विठलंराव पाटील ,युवक ता,अध्यक्ष राज बर्गे ,महिला ता,अध्यक्ष सरोजा गायकवाड ,आदींची प्रमुख उपस्थिती होती ,
यावेळी उदगीर तालुका अध्यक्ष ओबीसी सेल जितेंद्र आडे ,शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष ज्ञानोबा मोगले ,कार्याध्यक्ष गोविंद  शेळगे ,चाकूर ता,अध्यक्ष किसन पाटील ,जळकोट ता,अध्यक्ष भिकाजी राठोड ,लातूर ता,अध्यक्ष अमोल पांचाळ ,निलंगा ता,अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे ,राहुल बोयने ,सावता माळी ,उद्धव मेकले ,नर्शीग विभूते ,सय्यद शब्बीर ,राजकुमार केंचे ,अविनाश चव्हाण ,ता,कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला ,जाहिर शेख ,तानाजी महाराज ,अनिल देवगरे ,शहर कार्याध्यक्ष संदीप धुमाळ ,नामदेव लोखंडे ,केदार लोंढे ,मेडिया ता ,अध्यक्ष शुभम ऎतंन बोने ,उस्मान मुल्ला ,आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा शहराध्यक्ष नंदू तांबोलकर यांनी केले तर अध्यक्षीय समारोप विठलं पाटील यांनी केले ,

जि.प.प्रशाळेत अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.

शिरुर अनंतपाळ दि,2 (पठाण फथेअलीखान )येथील  कुमारस्वामीनगर  जि.प.प्रशाला भोजराजनगर, शिरुर अनंतपाळ व जि.प.शाळा, सुमठाणा येथे युवा नेते सुधीर लखनगावे यांनी शाळेत मा.अशोकभैय्या शिवाजीराव पाटील निलंगेकर  ( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस पार्टी  यांच्या वाढदिवसा निमित्त जि.प. शाळेच्या प्रांगनात सप्तपर्णी वड, बेल, आवळा, करंजी, जांभ, सिसम, पिंपळ, सागवान, आंबा, बदाम ई. 56व्या वाढदिवसानिमीत्त 56 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच खाण्यासाठी फळे, खेळण्यासाठी सावली व अँक्सीजन मिळावा या हेतुनी वाढदिवसानिमित्त युवा नेते सुधीर लखनगावे यांच्या पुढाकारातुन वृक्षारोपण केले असे पोलिस निरीक्षक कदम परमेश्वर यांनी बोलताना म्हणाले.
यावेळी  जि.प.शाळेच्या प्रांगणात अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसादिनी लावलेल्या आंबा झाडाचा तिसरा वाढदिवस महाविकास आघाडीच्या पदाधिकारीसह वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक कदम परमेश्वर, तालुका कृषी अधिकारी नाब्दे संजय, लक्ष्मणराव बोधले, सुधीर लखनगावे मेडिया सेल काॅंग्रेसचे तालुकाअध्यक्ष, आबासाहेब पाटील ऊजेडकर, राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे तालुकाअध्यक्ष विठ्ठलराव पाटील, शिवसेनेचे तालुकाअध्यक्ष भागवतराव वंगे, काॅंग्रेसचे शहराअध्यक्ष.अशोक कोरे, राष्ट्रवादीचे शहराअध्यक्ष. नंदकुमार तांबोळकर, शिवसेनेचे सतिश शिवणे, मुख्याध्यापक विजयकुमार संभाळे, मुख्याध्यापक पाडोळे तुकाराम, युवा नेते अनिल देवंगरे, काॅंग्रेसचे पदाधिकारी अमर आवाळे,महेश फुलारी, विठ्ठल चाळकीकर, बाबुराव तोरणे, दुरुगकर यश, संजय बिराजदार, डाॅं.बंडले संजय, अँड.माने सुतेज, बंडगर दत्ता, जागले वैशंपायन, अँड.पाटील महिपाल कारेवाडीकर, शंकर वाघमारे, पंडित लवटे, जगदिश सुर्यवंशी, अँड.लव्हांडे अनंत, जर्नाधन पाटील सुमठाणकर, ऊमाकांत शिंदे, मनोहर काळे, बानाटे शिवाजीराव, महेश तिवारी, तांबोळकर बस्वराज, अनंत शिंदे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी शेळगे गोविंद, लोंढे केदार, शिवसेनेचे व्यंकटराव ढोपरे, शिवसंतोष देशमुख ई.काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील पदाधिकारी, सवणे बालाजी व शाळेतील शिक्षक देविदास सांगवे, महादेव सुर्यवंशी, काशिनाथ ऊंबरगे, रोहिदास नाब्दे, मिनाताई भुरे,  देवशटवार आश्विनी, सुर्यवंशी छायाताई ई. शाळेतील शिक्षक, पालक, नागरिक ऊपस्थीत होते..

आसिफ पटवेकर यांचा खर्च वैद्यकीय मंत्री यांनी वैद्यकीय कोठ्यातून उचलावा अल्पसंख्यांक समाजाची भूमिका.

लातूर अहेमद तांबोळी लातूर येथे असणारे रहिवासी 
आसिफ पटवेकर वय 14 वर्ष राहणार लातूर.
कित्येक दिवस झाले मदतीची पोस्ट व्हायरल होत आहे.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री,आणि वैद्यकीय मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लक्ष घालून.स्वतःच्या कोठ्यातून किंवा वैद्यकीय कोठ्यातून या मुलाचा खर्च उचलावा  अशी विनंती वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे 
 आसिफ पटवेकर यांची तब्येत खुप क्रिटीकल आहे लातूरातील स्पर्श  हॉस्पिटल येथे एड्मिट होता पण सुधारना होत नसून सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटल येथे शिफ्ट करण्यात आला आहे.
यांना  मदतीची खुप आवश्यकता आहे, दवाखान्याचे खर्च करण्यासाठी कुटुंबाची परिस्थिती नाही, तरी लातूरकरांनी जे काही आपल्याने होईल तितके मदत करा व सामाजिक सहाय्य म्हणुन कुटुंबाला मदत करा अशी पोस्ट व्हायरल होत आहे मात्र अजून सुद्धा काही मोठ्या प्रकारची मदत आलेली नाही पालकमंत्री यांनी वैद्यकीय कोट्यातून मदत करावी अशी भूमिका अल्पसंख्याक समाजाकडून होत आहे
रुग्णाचे नाव: आसिफ पटवेकर
 वय: 14
 वडिलांचे नाव: अतीक पटवेकर
 पत्ता: मदनी मस्जिद, जवळ लातूर.
गुगल पे नं :- अजहर पटवेकर 9146317679
 रोगाचे नाव: DKA diabetic ketoacidosis होईल तेवढी लातूरकरांनी मदत करावी ही नम्र विनंती *लातूर अहेमद तांबोळी*

Saturday, July 31, 2021

वलांड़ी येथे साहित्य रत्नं लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी.

वलांडी प्रतिनिधी सगीर मोमीन: वलांड़ी येथील संभाजी नगर येथे जगत विख्यात साहित्य रत्नं लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांची 101वी जयंती गावकरी यांच्या वतीने साजरी करण्यात आली. साहित्य रत्न लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतमी चे पूजन वलांड़ी नगरीचे माजी सरपंच असदुल्लाखा पठाण यांच्या हस्ते करून अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी पंचयात समितीचे माजी सभापति तुकाराम पाटिल, दत्ता डुब्बे, रिपाई चे विलास वाघमारे, लहू रामराव सुर्यवंशी, माजी उपसरपंच दिनेश पाटिल, शफिक सौदागर, महेश महाजन, माजी ग्रा.प.सदस्य धनराज बनसोडे, ज्ञानोबा गायकवाड, राम वाघमारे, श्री राम भंडारे, इमाम बौडी वाले, बशिर अम्बुलगे, पप्पु बनसोडे, लारब शेख, तानाजी सुर्यवंशी, तानाजी कांबळे, वैजनाथ मुंजाळ, कुणाल मुंजाळ, गोविंद कार्ले व इतर गावकरी यांच्या उपस्तितीत अतिश बाजी करुन साजरी करण्यांत आली....

Friday, July 23, 2021

सिनेअभिनेते श्री मंकरद दादा अनासपुरे यांच्या वाढदिवसानिमीत्त लागवड केलेल्या वृक्षाचा वाढदिवस साजरा करत समाजापुढे "झाडे लावा,झाडे जगवा" चा संदेश

वलांडी प्रतिनिधी: मौजे धनेगांव ता देवणी येथे  जैष्ठ सिनेअभिनेते श्री मंकरद दादा अनासपुरे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने गतपाच वर्षापुर्वी काही वृक्ष लागवड केली होती,व आज  श्री मंकरद अनासपुरे यांचा वाढदिवसानिमीत्ताने त्या वृक्षाचाही केक कापुन व वृक्षलागवड करुन  वाढदिवस साजरा करण्यात आला.
व झाडे लावा ,झाडे जगवा चा संदेश 
आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या  वाढदिवसानिमीत्त  लावलेले एखादे झाड  तेही स्वत: जोपासलेले. व  अशा झाडाचा वाढदिवस साजरा करून  झाडे लावा झाडे जगवा हा अनोखा संदेश  सामाजिक कार्येकर्ते भाजयुमो अध्यक्ष श्री रामलिंग शेरे यांनी दिला आहे   आज वाढदिनानीम्मीत्ताने.
  साजरा झालेल्या  वृक्षांमध्ये  कडुनिंब  , कडुलिंब , सप्तपर्णी , सोनचाफा , ,बहावा,मधुमालती, चिंच, आवळा, वड, पिंपळ,    इत्यादी  झाडांचा अंतर्भाव आहे.......
 यावेळी  श्री रामलिंग शेरे, श्री बाळासाहेब बिरादार,श्री दिपक पवार, श्री लक्ष्मण पवार , श्री लक्ष्मण पवार,
श्री शंकर आपटे,श्री बालाजी आपटे, यलाप्पा आपटे आदिसह अनेकांची उपस्थिती होती

गंगाखेड़ मध्ये प्रवाशांचे बेहाल

गंगाखेड़ तालुका प्रतिनिधि शफ़ीक़ तंबोली: गंगाखेड़ येथील बस स्थानकात जान्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे प्रवाशांना बस स्थानकात जान्यासाठी कसरत करावी लागत आहे रस्त्याची दुरुस्ती कधी होणार याची नागरिक प्रतीक्षा करत आहेत.

Thursday, July 22, 2021

ऑटोरिक्षावर झाड कोसळून ऑटोचालकांचा दुर्दैवी मृत्यू

लातूर अहेमद तांबोळी: लातूर मध्ये दयानंद गेट परिसरातील श्री मारुती काळे यांचा ऑटो रिक्षा वर झाड कोसळून अपघातात झाला व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला लातूर शहर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीम, व लातूर शहर एमआयडीसी पोलीस ठाणे येथील टीम च्या मदतीने सदर व्यक्तीचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी झाडाला कापून तुकडे पाडण्यात आले त्यानंतर झाडाला बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले यावेळी लातूर शहर महानगरपालिका चे उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांनी वेळोवेळी सूचना दिल्या व काळे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.. असे आश्वासन दिले व
या दुर्दैवी घटनेमुळे सर्व नागरिकांना विनंती केले की पावसाळा सुरू असल्यामुळे कृपया कोणीही झाडाजवळ किंवा पडक्या घराजवळ थांबू नका.. असे आश्वासन उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिले

महागिरी येथील शहजाद अपार्टमेंट या अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला

ठाणे शहर प्रतिनिधी लुबना मेमन:
प्रभाग क्र. 22 मधील महागिरी येथील शहजाद अपार्टमेंट या अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला असून सुदैवाने जिवितहानी झाली नाही. परंतु इमारतीमधील सोळा कुटूंबांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले सदर घटना घडताच उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे व नम्रता कोळी तसेच महापालिका उपआयुक्त अशोक बुरपल्ले, ज्ञानेश्वर ढेरे, सहायक आयुक्त शंकर पाटोळे व इतर अधिकारी-कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीमधील सोळा कुटूंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले असून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी उपमहापौर पल्लवी पवन कदम यांनी प्रशासनाला केल्या आहे.

Tuesday, July 20, 2021

देगलूर- उदगीर- रेनापूर राज्य महामार्ग १६८ मधील मारजवाडी ते रावी रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे; अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती ची मागणी.

मुक्रामाबाद प्र.शेख सैलानी: देगलूर- उदगीर- रेनापूर राज्य महामार्ग १६८ मधील मारजवाडी ते रावी हा रस्ता अत्यंत निकॄष्ट दर्जाचा झाला होता सद्या या रस्त्यावरून वहतुक करणे म्हणजे जिव हातात  घेऊन चलने अशी रस्त्याचि अवस्था झालेली आहे हा रस्ता दुरुस्तीसाठी एक पदरी मंजूर झालेला आहे तरी पण अद्यापपर्यंत त्याचे कसल्याच प्रकारचे काम सुरू झालेले नाही या रस्त्यावरून वहतुक करताना वहानधारकांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे अपद्याताचे प्रकार सुध्दा वाडत आहे या साठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने.मा अभियंता साहेब सा.बा.वि.देगलुर,व सा.बा.वि. नांदेड यांना निवेदन देण्यात आले त्या वेळी उपस्थित  मु. श. अध्यक्ष.शेख सैलानी .मु.श. उपाध्यक्ष शोहेब पठाण म.जि.उपाध्यक्ष सविता चप्पलवार. नागेश दादा ई चि उपस्थिती होती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद जमीर भाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय येथे आरो पाणी फिल्टर लोकार्पणसोहळा संप्पन

गंगाखेड तालुका प्रतिनिधि शफ़ीक़ तंबोली:  जमीर भैय्या मित्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात वाटर फिल्टर बसविण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची खुप अडचण निर्माण झाली होती, पाण्यासाठी येथील येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे सय्यद जमीर भाई यांच्या लक्षात आले व त्यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने करून ज्या उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न निर्माण झाला होता तो त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात वाटर फिल्टर बसून आपला वाढदिवस साजरा केला....
या वाटर फिल्टरचे उदघाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक डॉ.हेमंत मुंढे,डॉ. उमाकांत बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमीर भय्या मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील रुग्णाला फळे पण वाटप केली.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हेमंत मुढे, डॉ.बिराजदार,प्रणीत खज्जे, सय्यद अल्ताफ भाई ,इंतेसार सिद्दीकी , वसीम हाशमी, समि सय्यद,अविनाश बर्वे,विशाल दादेवाड,कुलदीप जाधव, गणेश निरास, माधव भोसले,तबरेज आलम. इकबाल चाउस,बाबा खान, सैफ चाउस,
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सैफ चाऊस,बाबा खान,सचिन खंदारे,सलमान खान ,विजय साळवे, सय्यद इरफान,व्यंकटेश भेंडेकर,सय्यद समीर, शेख समी,सय्यद आवेस, सय्यद सोहेल, सय्यद आयाज, सय्यद शोयेब  आदींनी परिश्रम घेतले,

Monday, July 19, 2021

आदिवासी विकास विभागातर्फे किटवाटप


कन्नड:कन्नड तालुक्यातील सावरगाव येथे आदिवासी विकास विभागातर्फे पात्र आदिवासी कुटुंब यांना खावटी अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. डीबीटी च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दोन हजार रुपये व अन्नधान्य वाटप करण्यात आले.  श्रीमती देवकन्या बोकडे प्रकल्प अधिकारी औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रमशाळा नागद चे मुख्याध्यापक श्री.एस.बी.भिसे,श्री.आर.बी.गिते     सर,श्री.एस.एन.मुळे सर, श्री.पी.आर.धोंडकर सर, श्री.शिंदे सर,श्री.डी. डी. परदेशी सर.श्री.खलापुरे सर,श्रीमती बागुल मॅडम या सर्व कर्मचारी यांनी गावोगावी जाउन आदिवासी  बांधव यांना खावटी अन्नधान्य किट चे वाटप केले.यावेळी सावरगांव ग्रामपंचायत चे सरपंच विकास निकम उपसरपंच मुस्तकिम शेख ग्रामपंचायत सदस्य शिवा नाईक . रमेश माळी . पांडुरंग निकम माजी सरपंच सिध्दू शेख ग्रामपंचायत कर्मचारी ईरशाद शेख़ सुदाम निकम आप्पासाहैब गायकवाड़ आदि गावकरी सह उपस्थित होते.

सुर्डी नजिक मध्ये नऊ वर्षा च्या बालीकेवर लैगिंक अत्याचार

माजलगांव प्रतिनिधि: नाजेर कुरैशी  
ग्रामीण पोलिस स्टेशन माजलगांव येथे दि. 13/07/ 2021 रोजी FIR क्रमांक 0176/2021 मध्ये आरोपी पुरुषोत्तम श्रीराम घाटुळ रा. सुरडी नजीक ता. माजलगांव जि. बीड च्या विरोधात भादवी कलम 376 (M) व बालकाचे लैंगीक अपराधापासुन स्वरक्षन अधिनीयम 2012 चे कलम 4,5 (M), 6, 10, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे की पीडीत अल्पवयीन मुलगी ही वय 9 वर्षाची असुन, नराधम आरोपीच्या अत्याचारामुळे गंभीर दुखापत झाली व अती रक्त स्त्रावामुळे शासकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आली होती तीच परिस्थीती गंभीर आहे. तरी सुध्दा सदरहु गुन्ह्यातील आरोपीला मा. न्यायालया समक्ष हजर करून पी.सी. आर. मागुन सखोल चौकशी करण्याची गरज असतांना तपास अधिकारी यांनी पी. सी. आर.ची मागणीच केली नाही व सरळ सरळ आरोपीला जामीनासाठी मोकळा रस्ता करुन दिला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनची भुमीका संषयास्पद असल्याचे दिसुन येते. म्हणुन माजलगांव दि,18/07/2021 करीता आम्ही खालील सह्याकरणारे या निवेदणाद्वारे अशी मागणी करत आहोत की, 1) सदरहु प्रकरणातील तपास अधिकारी याची सखोल चौकशी करुन योग्यती कार्यवाही करुन दंडीत व निलंबीत करण्यात यावे. 2) आरोपीस कायम निकाल लागेपर्यंत मा. न्यायालयाच्या कोठडीत ठेवून जलद गती कोर्टात प्रकरण चलवण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती कारवाई करावी. 3) सदर प्रकरणाचा तपास इतर योग्य त्या सक्षम अधिकान्याला देवून प्रकरणात विष्पक्ष तपास करावा.
आरोपी हा पीडीताच्या विरुध जातीचा असल्यामुळे व पीडीता ही अल्पसंख्याक समाजातुन असल्यामुळे आरोपी जर जामीनावर सुटुन आल्यास तपास कामात अडथडा निर्माण करु शकतो व गावात व परीसरात जातीय तेड निर्माण होण्याची शक्यता आहे करीता मा. साहेबांना विनंती आहे की, त्यांनी सदर प्रकरणात तात्काळ दखल घेवुन पीडीतास न्याय द्यावा

Sunday, July 18, 2021

अनशरा हाशमीचे दहावी घवघवीत यश

उदगीर प्रतिनीधी: उदगीर येथील अलामीन ऊर्दू माध्यमिक विद्यालयातील अनशरा हाशमी हीने शंभर टक्के मार्क घेवुन घवघवीत यश संपादन केले आहे. प्रथमिक पासुन शाळेत प्रथम असलेल्या अनशराला तीच्या सर्व शैक्षणिक शिक्षणाचे मुल्यमापन केल्यानंतर हे यश मिळाले आहे.
जागतिक महामारी मुळे शैक्षणीक गुंणवतेवर परिणाम होत असुन यंदाची शालांत परिक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन करुन गुण देण्याचे ठरवले. त्यामुळे शाळेत कायम अव्वल असलेल्या अनशरा हाशमी हीला ९९. ८० टक्के गुण मिळाले आहेत. तीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.