वलांडी प्रतिनिधी: तालुक्यातील वलांडी येथे ४ वाजता मूसळधार पावसास सूरूवात झाली व पाऊसाने किमानं एक ते दिड तास झोडपल्याने वलांडी येथील मूख्य बाजार पेठेत जागी जागी पाणी साचले व पाणी जाण्यासाठी पर्याय मार्ग नसल्याने पावसाचे पाणी येथील व्यापाऱ्यांच्या दूकानात शिरले.
१०१७ व २०१८ या कालावधीत रस्ते बनले आहेत.या रस्त्याच्या दूतर्फा नाल्याचे काम होणे आवश्यक होते.परंतू असे न करता वलांडी येथील मूख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले मात्र त्यांच्या बाजूच्या नाल्याचे काम न झाल्यामुळे व रस्त्यांची उंची वाढवल्यामूळे दोन दिवसांपासून पडत असलेल्या मूसळधार पावसामुळे बाजार पेठेत पाणी साचुन दूकानात पाणी शिरले व्यापाऱ्यांनी शिरलेले पाणी बकेटच्या साह्याने बाहेर काढुन टाकले.मूख्य बाजार पेठेत व्यापाऱ्यांनी जागो जागी अतिक्रमण केल्याने हा प्रकार घडला अतिक्रमणामूळे नाल्याचे काम झाले नाही व रोडचे काम झाल्याने रोडची उंची वाढल्याने हा प्रकार घडला.यामूळे जो तो ग्रामपंचायती कडे तक्रारीचा पाढा वाचत आहे मात्र अद्याप तरी ग्राम पंचायत प्रशासनाने यावर कोणती उपाययोजना करतील.आता ग्रामपंचायत कोणती उपाययोजना योजना करणार हे महत्वाचे ठरणार.