Sunday, September 8, 2024

कायद्याचा ज्ञान नसलेला अनाडी अभियंता शिरीष राघूला प्रशिक्षणाची गरज RTI.

उदगीर प्रतिनिधी: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग उदगीर या कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी शिरीष राघू हे माहितीचा अधिकार अधिनियम-2005 या कायद्याच्या ज्ञानापासून अनभिज्ञ असल्याचे माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरामधील पत्रावरून स्पष्ट होते. सविस्तर असे की अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग उदगीर अंतर्गत मौजे वलांडी येथे जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम सुरू करण्यात आले होते काम थोडे करून जास्तीचे बिल उचलण्यात आल्याने माहिती अधिकारात मौजे वलांडी पाणीपुरवठा या योजनेचे झालेले काम 44.81% टक्के झालेल्या कामांचे नावे, कोठून कोठेपर्यंत काम करण्यात आले त्या गावाचे नाव ठिकाणासह या सर्व कामाची माहितीची यादी सत्यप्रत करून द्यावे अशी माहिती मागितली असता जन माहिती अधिकारी तथा उपविभागीय अभियंता शिरीष राघू यांनी जल जीवन पाणीपुरवठा योजनेत केलेला भ्रष्टाचार उघड होतो या भीतीपोटी माहिती न देण्याच्या उद्देशाने असे उत्तर दिले की आपण केलेला अर्ज लेटर पॅड वर टंकलिखित केलेला आहे असे म्हणून अद्याप माहिती दिली नाही.
त्यामुळे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय लातूर येथे प्रथम अपील दाखल करून अशी मागणी करण्यात आली की, माहिती अधिकार अधिनियमाच्या तरतुदीचा अभ्यास व ज्ञान जन माहिती अधिकारी उपविभागीय अभियंता शिरीष राघू यांना नाही त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाची तजवीज करावी व प्रथम अपील आदेश मध्ये दोषी जन माहिती अधिकारी व चुकीच्या पद्धतीने हाताळणारे बेजबाबदार कृतीचे वर्तन करून या अधिनियमा प्रती अनआस्था दर्शकन माहिती अधिकार या अधिनियमाचे कलम 7(1) चा भंग केला आहे यामुळे त्यांच्याविरुद्ध सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 31 मार्च 2008 च्या परिपत्रकानुसार कठोर शिस्तभंगाची कार्यवाही करावी. व जन माहिती अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून प्रथम अपील आदेश त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही शिफारस लेख स्वरूपात नमूद करावी. त्यामुळे यांना सदर कायदयाचे ज्ञान नाही. किंवा प्रशिक्षण घेतलेले नाही हे स्पष्ट  होते. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा कायदा निर्गमित होऊन 18 ते 19  वर्ष झाले एवढा प्रंचड व प्रदिर्घ  कालावधी उलटुन देखील जनमाहिती अधिकारी तथा उपविभागीय अभियंता शिरीष राघू यांना लोकभिमुख कायद्याविषयी ज्ञान असु नये ही खुप मोठी शोकांतिका आहे.