वलांडी प्रतिनिधी: सगीर मोमीन देवणी तालुक्यातील वलांडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या खड्यांत पाणी साचत असल्याने संतप्त नागरीकांनी वलांडी येथील ग्राम पंचायत कार्यालयात निवेदन देण्यात आले.वलांडी येथील वार्ड क्रमांक १ मधील शासकीय अरोग्य केंद्र शेजारील वसतीत जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या खड्यात पाणी साचल्याने तेथील नागरीक वृध्द महीला व शाळकरी मूलांना साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत आहे.
पडलेल्या पावसाला जाण्यास पर्यायी मार्ग नसल्याने पाणी साचत आहे.
पुर्वे कडील बाजूला शासकीय आरोग्य केंद्र आहे व पलीकडे मूस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थान मस्जिद आहे.तरी मस्जिद जाण्यासाठी मुस्लिम बांधवांना याच साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
जलजिवन मिशनचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे . केंद्र सरकारचे धोरण होते की हर घर नल हर घर जल या मिशन अंतर्गत कामास जोमात सुरुवात झाली होती.जलजिवनचे काम वेळेवर न झाल्याने गावात नळांसाठी खोदलेल्या खड्यात पाणी साचुन जागो जागी डबक्यामूळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
ग्राम पंचायत मात्र झोपेचे सोंग घेत आहे.तरी वेळोवेळी ग्राम पंचायतला तोंडी सांगूनही काम होत नसल्याने संतप्त नागरीकांनी ग्रामविकास अधिकारी माधव सगर यांना ३ ते ४ दिवसांत साचलेल्या पाण्याचे योग्य ते नियोजन लावावे व जर या साचलेल्या पाण्यामुळे नागरीकांना डेंग्यू मलेरीया सारखे आजार जडले तर ग्राम पंचायतीला ग्राह्य धरण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माने गोपाळ, त्रिनेत्र सूर्यवंशी, सिध्देश्वर खवंदे,अमोल कांबळे,समाधान श्रंगारे,योगेश थोरात,उमाकांत कांबळे,आदी उपस्थित होते.