वलांडी प्रतिनिधी सगीर मोमीन: वलांड़ी येथील संभाजी नगर येथे जगत विख्यात साहित्य रत्नं लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांची 101वी जयंती गावकरी यांच्या वतीने साजरी करण्यात आली. साहित्य रत्न लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतमी चे पूजन वलांड़ी नगरीचे माजी सरपंच असदुल्लाखा पठाण यांच्या हस्ते करून अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी पंचयात समितीचे माजी सभापति तुकाराम पाटिल, दत्ता डुब्बे, रिपाई चे विलास वाघमारे, लहू रामराव सुर्यवंशी, माजी उपसरपंच दिनेश पाटिल, शफिक सौदागर, महेश महाजन, माजी ग्रा.प.सदस्य धनराज बनसोडे, ज्ञानोबा गायकवाड, राम वाघमारे, श्री राम भंडारे, इमाम बौडी वाले, बशिर अम्बुलगे, पप्पु बनसोडे, लारब शेख, तानाजी सुर्यवंशी, तानाजी कांबळे, वैजनाथ मुंजाळ, कुणाल मुंजाळ, गोविंद कार्ले व इतर गावकरी यांच्या उपस्तितीत अतिश बाजी करुन साजरी करण्यांत आली....
Saturday, July 31, 2021
Friday, July 23, 2021
सिनेअभिनेते श्री मंकरद दादा अनासपुरे यांच्या वाढदिवसानिमीत्त लागवड केलेल्या वृक्षाचा वाढदिवस साजरा करत समाजापुढे "झाडे लावा,झाडे जगवा" चा संदेश
वलांडी प्रतिनिधी: मौजे धनेगांव ता देवणी येथे जैष्ठ सिनेअभिनेते श्री मंकरद दादा अनासपुरे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने गतपाच वर्षापुर्वी काही वृक्ष लागवड केली होती,व आज श्री मंकरद अनासपुरे यांचा वाढदिवसानिमीत्ताने त्या वृक्षाचाही केक कापुन व वृक्षलागवड करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
व झाडे लावा ,झाडे जगवा चा संदेश
आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमीत्त लावलेले एखादे झाड तेही स्वत: जोपासलेले. व अशा झाडाचा वाढदिवस साजरा करून झाडे लावा झाडे जगवा हा अनोखा संदेश सामाजिक कार्येकर्ते भाजयुमो अध्यक्ष श्री रामलिंग शेरे यांनी दिला आहे आज वाढदिनानीम्मीत्ताने.
साजरा झालेल्या वृक्षांमध्ये कडुनिंब , कडुलिंब , सप्तपर्णी , सोनचाफा , ,बहावा,मधुमालती, चिंच, आवळा, वड, पिंपळ, इत्यादी झाडांचा अंतर्भाव आहे.......
यावेळी श्री रामलिंग शेरे, श्री बाळासाहेब बिरादार,श्री दिपक पवार, श्री लक्ष्मण पवार , श्री लक्ष्मण पवार,
श्री शंकर आपटे,श्री बालाजी आपटे, यलाप्पा आपटे आदिसह अनेकांची उपस्थिती होती
गंगाखेड़ मध्ये प्रवाशांचे बेहाल
गंगाखेड़ तालुका प्रतिनिधि शफ़ीक़ तंबोली: गंगाखेड़ येथील बस स्थानकात जान्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे प्रवाशांना बस स्थानकात जान्यासाठी कसरत करावी लागत आहे रस्त्याची दुरुस्ती कधी होणार याची नागरिक प्रतीक्षा करत आहेत.
Thursday, July 22, 2021
ऑटोरिक्षावर झाड कोसळून ऑटोचालकांचा दुर्दैवी मृत्यू
लातूर अहेमद तांबोळी: लातूर मध्ये दयानंद गेट परिसरातील श्री मारुती काळे यांचा ऑटो रिक्षा वर झाड कोसळून अपघातात झाला व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला लातूर शहर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीम, व लातूर शहर एमआयडीसी पोलीस ठाणे येथील टीम च्या मदतीने सदर व्यक्तीचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी झाडाला कापून तुकडे पाडण्यात आले त्यानंतर झाडाला बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले यावेळी लातूर शहर महानगरपालिका चे उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांनी वेळोवेळी सूचना दिल्या व काळे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.. असे आश्वासन दिले व
या दुर्दैवी घटनेमुळे सर्व नागरिकांना विनंती केले की पावसाळा सुरू असल्यामुळे कृपया कोणीही झाडाजवळ किंवा पडक्या घराजवळ थांबू नका.. असे आश्वासन उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांनी दिले
महागिरी येथील शहजाद अपार्टमेंट या अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला
ठाणे शहर प्रतिनिधी लुबना मेमन:
प्रभाग क्र. 22 मधील महागिरी येथील शहजाद अपार्टमेंट या अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला असून सुदैवाने जिवितहानी झाली नाही. परंतु इमारतीमधील सोळा कुटूंबांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले सदर घटना घडताच उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे व नम्रता कोळी तसेच महापालिका उपआयुक्त अशोक बुरपल्ले, ज्ञानेश्वर ढेरे, सहायक आयुक्त शंकर पाटोळे व इतर अधिकारी-कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारतीमधील सोळा कुटूंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले असून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी उपमहापौर पल्लवी पवन कदम यांनी प्रशासनाला केल्या आहे.
Tuesday, July 20, 2021
देगलूर- उदगीर- रेनापूर राज्य महामार्ग १६८ मधील मारजवाडी ते रावी रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे; अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती ची मागणी.
मुक्रामाबाद प्र.शेख सैलानी: देगलूर- उदगीर- रेनापूर राज्य महामार्ग १६८ मधील मारजवाडी ते रावी हा रस्ता अत्यंत निकॄष्ट दर्जाचा झाला होता सद्या या रस्त्यावरून वहतुक करणे म्हणजे जिव हातात घेऊन चलने अशी रस्त्याचि अवस्था झालेली आहे हा रस्ता दुरुस्तीसाठी एक पदरी मंजूर झालेला आहे तरी पण अद्यापपर्यंत त्याचे कसल्याच प्रकारचे काम सुरू झालेले नाही या रस्त्यावरून वहतुक करताना वहानधारकांना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे त्यामुळे अपद्याताचे प्रकार सुध्दा वाडत आहे या साठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने.मा अभियंता साहेब सा.बा.वि.देगलुर,व सा.बा.वि. नांदेड यांना निवेदन देण्यात आले त्या वेळी उपस्थित मु. श. अध्यक्ष.शेख सैलानी .मु.श. उपाध्यक्ष शोहेब पठाण म.जि.उपाध्यक्ष सविता चप्पलवार. नागेश दादा ई चि उपस्थिती होती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद जमीर भाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय येथे आरो पाणी फिल्टर लोकार्पणसोहळा संप्पन
गंगाखेड तालुका प्रतिनिधि शफ़ीक़ तंबोली: जमीर भैय्या मित्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात वाटर फिल्टर बसविण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची खुप अडचण निर्माण झाली होती, पाण्यासाठी येथील येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे सय्यद जमीर भाई यांच्या लक्षात आले व त्यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने करून ज्या उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न निर्माण झाला होता तो त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात वाटर फिल्टर बसून आपला वाढदिवस साजरा केला....
या वाटर फिल्टरचे उदघाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक डॉ.हेमंत मुंढे,डॉ. उमाकांत बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमीर भय्या मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील रुग्णाला फळे पण वाटप केली.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हेमंत मुढे, डॉ.बिराजदार,प्रणीत खज्जे, सय्यद अल्ताफ भाई ,इंतेसार सिद्दीकी , वसीम हाशमी, समि सय्यद,अविनाश बर्वे,विशाल दादेवाड,कुलदीप जाधव, गणेश निरास, माधव भोसले,तबरेज आलम. इकबाल चाउस,बाबा खान, सैफ चाउस,
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सैफ चाऊस,बाबा खान,सचिन खंदारे,सलमान खान ,विजय साळवे, सय्यद इरफान,व्यंकटेश भेंडेकर,सय्यद समीर, शेख समी,सय्यद आवेस, सय्यद सोहेल, सय्यद आयाज, सय्यद शोयेब आदींनी परिश्रम घेतले,
Monday, July 19, 2021
आदिवासी विकास विभागातर्फे किटवाटप
कन्नड:कन्नड तालुक्यातील सावरगाव येथे आदिवासी विकास विभागातर्फे पात्र आदिवासी कुटुंब यांना खावटी अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. डीबीटी च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दोन हजार रुपये व अन्नधान्य वाटप करण्यात आले. श्रीमती देवकन्या बोकडे प्रकल्प अधिकारी औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रमशाळा नागद चे मुख्याध्यापक श्री.एस.बी.भिसे,श्री.आर.बी.गिते सर,श्री.एस.एन.मुळे सर, श्री.पी.आर.धोंडकर सर, श्री.शिंदे सर,श्री.डी. डी. परदेशी सर.श्री.खलापुरे सर,श्रीमती बागुल मॅडम या सर्व कर्मचारी यांनी गावोगावी जाउन आदिवासी बांधव यांना खावटी अन्नधान्य किट चे वाटप केले.यावेळी सावरगांव ग्रामपंचायत चे सरपंच विकास निकम उपसरपंच मुस्तकिम शेख ग्रामपंचायत सदस्य शिवा नाईक . रमेश माळी . पांडुरंग निकम माजी सरपंच सिध्दू शेख ग्रामपंचायत कर्मचारी ईरशाद शेख़ सुदाम निकम आप्पासाहैब गायकवाड़ आदि गावकरी सह उपस्थित होते.
सुर्डी नजिक मध्ये नऊ वर्षा च्या बालीकेवर लैगिंक अत्याचार
माजलगांव प्रतिनिधि: नाजेर कुरैशी
ग्रामीण पोलिस स्टेशन माजलगांव येथे दि. 13/07/ 2021 रोजी FIR क्रमांक 0176/2021 मध्ये आरोपी पुरुषोत्तम श्रीराम घाटुळ रा. सुरडी नजीक ता. माजलगांव जि. बीड च्या विरोधात भादवी कलम 376 (M) व बालकाचे लैंगीक अपराधापासुन स्वरक्षन अधिनीयम 2012 चे कलम 4,5 (M), 6, 10, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे की पीडीत अल्पवयीन मुलगी ही वय 9 वर्षाची असुन, नराधम आरोपीच्या अत्याचारामुळे गंभीर दुखापत झाली व अती रक्त स्त्रावामुळे शासकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आली होती तीच परिस्थीती गंभीर आहे. तरी सुध्दा सदरहु गुन्ह्यातील आरोपीला मा. न्यायालया समक्ष हजर करून पी.सी. आर. मागुन सखोल चौकशी करण्याची गरज असतांना तपास अधिकारी यांनी पी. सी. आर.ची मागणीच केली नाही व सरळ सरळ आरोपीला जामीनासाठी मोकळा रस्ता करुन दिला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनची भुमीका संषयास्पद असल्याचे दिसुन येते. म्हणुन माजलगांव दि,18/07/2021 करीता आम्ही खालील सह्याकरणारे या निवेदणाद्वारे अशी मागणी करत आहोत की, 1) सदरहु प्रकरणातील तपास अधिकारी याची सखोल चौकशी करुन योग्यती कार्यवाही करुन दंडीत व निलंबीत करण्यात यावे. 2) आरोपीस कायम निकाल लागेपर्यंत मा. न्यायालयाच्या कोठडीत ठेवून जलद गती कोर्टात प्रकरण चलवण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती कारवाई करावी. 3) सदर प्रकरणाचा तपास इतर योग्य त्या सक्षम अधिकान्याला देवून प्रकरणात विष्पक्ष तपास करावा.
आरोपी हा पीडीताच्या विरुध जातीचा असल्यामुळे व पीडीता ही अल्पसंख्याक समाजातुन असल्यामुळे आरोपी जर जामीनावर सुटुन आल्यास तपास कामात अडथडा निर्माण करु शकतो व गावात व परीसरात जातीय तेड निर्माण होण्याची शक्यता आहे करीता मा. साहेबांना विनंती आहे की, त्यांनी सदर प्रकरणात तात्काळ दखल घेवुन पीडीतास न्याय द्यावा
Sunday, July 18, 2021
अनशरा हाशमीचे दहावी घवघवीत यश
उदगीर प्रतिनीधी: उदगीर येथील अलामीन ऊर्दू माध्यमिक विद्यालयातील अनशरा हाशमी हीने शंभर टक्के मार्क घेवुन घवघवीत यश संपादन केले आहे. प्रथमिक पासुन शाळेत प्रथम असलेल्या अनशराला तीच्या सर्व शैक्षणिक शिक्षणाचे मुल्यमापन केल्यानंतर हे यश मिळाले आहे.
जागतिक महामारी मुळे शैक्षणीक गुंणवतेवर परिणाम होत असुन यंदाची शालांत परिक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन करुन गुण देण्याचे ठरवले. त्यामुळे शाळेत कायम अव्वल असलेल्या अनशरा हाशमी हीला ९९. ८० टक्के गुण मिळाले आहेत. तीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Thursday, July 15, 2021
इनामुल हसन कब्रस्तान सेवा समितीचे महानगर पालिकेला इनामुल हसन कबरीस्तान दुरुस्ती करण्याची मागणी.
लातूर अहेमद तांबोळी: लातूर महापालिकेने नेमलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी इनामुल हसन कब्रस्तान सेवा समितीच्या वतीने महापौर आणि आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले. कब्रस्तान मध्ये अनेक सोयी सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे कबरस्तान साठी जागा अपुरी पडत असल्याने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच कंपाऊंडवाल बांधून द्यावे लाईटीची सुविधा करून द्यावे. अनेक प्रकारच्या सुविधा इनामुल हसन कबरस्तान समितीच्यावतीने करण्यात आले आहेत मुरूम टाकने पाण्याचे बोर पाडणेअसे अनेक प्रकारचे सुविधा समितीच्या वतीने करण्यात आलेले आहेत मात्र आता महापालिकेने काही सुविधा करून द्याव्यात अशी मागणी इनामुल हसन कबरस्तान समितीच्या वतीने करण्यात आली याप्रसंगी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते
Tuesday, July 13, 2021
वलांडी बसस्थानकावर वयोवृद्ध प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविले! टोळीतील ५ महिला चोराविरुद्ध गुन्हा दाखल.
वलांडी प्रतिनिधी मोमीन सगीर: देवणी तालुक्यातील वलांडी बसस्थानकावर उदगीरला जाणाऱ्या बसमध्ये चढतांना वयोवृद्ध प्रवासी महिलेच्या गळ्यातील दिड तोळे सोन्याचे दागिने पळविले. टोळीतील पाच महिला चोरांना वलांडी पोलिसांना काही वेळातच पकडण्यात यश आले. या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात पाच चोरटे महिला विरोधात मंगळवार दि.१३ जुलै रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत देवणी पोलीसांच्या वतीने मिळालेली अधिक माहिती अशी की, लेकीच्या घरी ढवाळ जेवणाचे कार्यक्रम उरकून परत जात असताना वयोवृद्ध महिला दि.१२ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वलांडी बसस्थानकावर उदगीरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना तीच्या गळ्यातील दिड तोळा सोन्याचे पान मन्याची चैन जुनी वापरती कि अंदाजे ४५ हजार रुपयांचे दागिने चोरून लंपास केले. घटनेची माहिती मिळताच वलांडी पोलीस दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे व पोलीस कर्मचारी राजपाल साळुंखे यांनी काही वेळातच वलांडी बसस्थानक परिसरातून टोळीतील पाच चोरटे महिलांच्या मुस्क्या आवळल्या चौकशी केली असता त्यांच्याकडे दागिने मिळून आले नाही. या प्रकरणी सुशीलाबाई माधवराव शिराळे वय ८० वर्षे राहणार शेकापूरवाडी ता.उदगीर यांच्या फिर्यादिवरुन देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २०७/२०२१ कलम ३७९, ३४ भादवी प्रमाणे बबिता सुरेश उपाध्याय राहणार उदगीर, मिराबाइ प्रकाश कांबळे राहणार उदगीर, गोदावरी राजु कांबळे राहणार लाळी, छाया राजेश उपाध्ये राहणार लाळी, पुनम युवराज उपाध्ये राहणार उदगीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण डप्पडवाड हे करीत आहेत.
परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव येथे १५० नागरिकांना दिले लस
प्रतिनिधी नरहरी राठोड: परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव येथे लसीकरण कॅम्प करण्यात आला या वेळी 150 लसीकरण पुरवठा करण्यात आला 150 लाभार्थ्याने लसीकरण करण्यात आले यावेळी डॉ राठोड श्रीमती रामगडे आरोग्य सेविका देशमुख साहेब पुंजरवाड सर डाके सर आरोग्य सेविका रेखा पाठक आणि श्रीमती वंदना ढवळे आशा कार्यकर्त्या व मा पंचायत समिती उपसभापती परदीप आप्पा ढवळे सरपंच सौ स्मिता भरत ढवळे उपसरपंच ज्ञानोबा चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सदर कॅम्प हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकाटे हादगाव येथे आयोजित करण्यात आला होता प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृद्ध यावेळी उपस्थित होते.
Friday, July 9, 2021
लातूर भाजी मार्केट स्थलात्तराच्या मागणी बाबत सर्व घटकांना विश्वासात घेऊन सर्वमान्य तोउगा काढावा पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांचे आदेश.
लातूर अहेमद तांबोळी: लातूर येथील भाजी मार्केट स्थलांतरा बाबत व्यापाऱ्यांची मागणी आणि कृषी उत्पन्न् बाजार समितीची व्यवहार्यता तपासून या संदर्भाने नियुक्त केलेल्या समितीने सर्व घटकांना मान्य होईल असा सर्वमान्य निर्णय घ्यावा, अशी सुचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
लातूर शहरातील भाजी मार्केट बाहयवळण रस्त्यावर स्थलांतरीत करण्या बाबत संबंधित व्यापाऱ्यांनी केलेली मागणी, यामध्ये असलेली मतमत्तातरे त्याच बरोबर बाहयवळण रस्त्यावरील जागेत सध्या सुरू असलेला कडबा आणि जनावरांचा बाजार या संदर्भाने असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची भुमिका, शिवाय हे भाजी मार्केट स्थलातरीत करायचे ठरले तर नवीन ठिकाणी उभाराव्या लागणाऱ्या सुविधा या बाबींचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या सुचनेवरून बाजार समिती संचालक मंडळातील ज्येष्ठ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सदरील समिती सोबत शुक्रवारी पालकमंत्री ना. देशमुख यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे मंत्रालयातुन आढावा बैठक घेतली.
बैठकीच्या प्रारंभी ना. देशमुख यांनी सर्व समिती सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेतले त्यांनतर भाजी मार्केट मधील व्यापारी यांची मागणी, त्यांच्यातील मतमतात्तरे, जुन्या भाजी मार्केट मधील जागा, तेथे विस्तार करण्यासाठी असलेला वाव, नवीन ठिकाणी उभाराव्या लागणाऱ्या सुविधा, त्यासाठी लागणारा वेळ, कडबा व जनावर बाजारासाठी शोधावा लागणारा पर्याय या संदर्भातील बाजार समितीची भुमिका या गोष्टीचा अभ्यास करावा, सर्व घटकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी व सर्वमान्य निर्णय घ्यावा, अशा सुचना पालकमंत्री देशमुख यांनी केल्या आहेत.
या आढावा बैठकीस बाजार समितीचे सभापती ललीत शहा, उपसभापती मनोज पाटील, संचालक सुधिर गोजमगुंडे, विक्रम शिंदे, रावसाहेब पाटील, गोविंद नरहरे, भास्कर शिंदे, श्री बिदादा तसेच संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
-------------
गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य मराठवाडा कार्यकारणी जाहीर.
उदगीर प्रतिनिधी खिज़र मुन्शी: उदगीर तालुका व परिसरातील महसुल विभागात सामान्य जनतेचे जमिनी विषयी प्रश्न सोडविण्यासाठी गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीची कार्यकारिणी जाहीर केलेली आहे.गुंठेवारी संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंदन दादा चव्हाण यांनी जाहीर गुंठेवारी मराठवाडा विभागीय अध्यक्ष म्हणून मा. मोईज भाई शेख, उपाध्यक्ष मा. अखिल खालील शेख , आणि सचिवपदी मा. आकाश रमेश पारके यांची निवड करण्यांत आलेली आहे. या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
माहिती अधिकार कायदा अंमलात येऊन १५ वर्षानंतरही श्रीवर्धन तालुक्यातील गृप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी येथे माहितीचे फलक लावण्यात आलेले नाहीत
सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभाग,परिपत्रक क्र.अहत-१००८/प्र.क्र. १८/०८/११-अ,मंत्रालय,मुंबई-४०००३२,दिनांक:-१५/०५/२००८ अनुसार प्रत्येक शासकिय कार्यालयात माहिती अधिकार अधिनियम,२००५ अन्वये नियुक्त करण्यात आलेल्या माहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी यांच्या नावाचे फलक लावणे बंधनकारक आहे तसेच नियम ४ खालील १७ बाबींवरील अद्ययावत माहिती राज्य शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंमलात येऊन तब्बल १५ वर्षानंतरही श्रीवर्धन तालुक्यातील गृप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी येथे माहितीचे फलक लावण्यात आलेले नाहीत तसेच नियम ४ खालील १७ बाबींवरील अद्ययावत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.याबाबत श्री.परशुराम पायाजी पायकोळी (दिघी) - सदस्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांनी जनहिताच्या दृष्टीने पंचायत समिती श्रीवर्धन यांचे कार्यक्षेत्रामध्ये माहीती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत माननीय,गटविकास अधिकारी,पंचायत समिती श्रीवर्धन यांस दिनांक :- ०१/०२/२०१९ रोजी विनंती अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने दिनांक :- ३०/०३/२०१९ रोजी श्री.मधुकर हरी भालदार,जन माहिती तथा ग्रामविकास अधिकारी,गृप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी यांस मुद्देनिहाय नियोजन करून त्याप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अर्जदारास व या कार्यालयास सादर करावा असे आदेश दिले होते.परंतु त्यांचेकडून सदर आदेशानुसार अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे कार्यवाही करण्यात आलेली नाही.सदर बाबत दिनांक:- १४/०९/२०२० रोजी स्मरणपत्र पाठविण्यात आले होते.सदर स्मरणपत्रासहि संबंधितांकडून केराची टोपली दाखवण्यात आली.आपले वरिष्ठ गटविकास अधिकारी यांचे आदेशास केराची टोपली दाखवण्यात आली तसेच माहिती अधिकार अधिनियम,२००५ आणि संबंधित शासकिय परिपत्रके,सन्माननीय न्यायालयांचे निर्णय यांचे वारंवार उल्लंघन करण्यात आले आहे.त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नागरीकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.तसेच सदर श्री.मधुकर हरी भालदार-जन माहिती अधिकारी,गृप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी हे आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी- पंचायत समिती श्रीवर्धन हे स्वत:ला कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजतात का? अशी चर्चा श्रीवर्धन तालुक्यातील नागरिक करत आहेत.सदर संबंधित दोषींवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार कि नाही? याकडे श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा चालू आहे.
Thursday, July 8, 2021
वृक्षलागवड व संर्वधन ही काळाजी गरज उपजिल्हाधिकारी श्री गणेश महाडिक
धनेगांव - ता देवणी येथे मा.आ.श्री संभाजीराव पाटील निंलगेकर साहेबांच्या वाढदिवसानिमीत्ताने धनेगांव येथे संम्शानभुमी परिसरात वर्गमिञ आॅक्सिजन हब भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री रामलिंग शेरे यांच्या माध्यमातुन वृक्षलागवड सप्ताहाचे आयोजन करुन वृक्ष लागवड करण्यात आलीआहे , या वृक्षलागवडीची पाहणी करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी साहेंबाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हा अधिकारी श्री गणेशजी महाडिक साहेब व मनरेगा, बीडीओ श्री महेंद्र कुलकर्णी यांनी भेट देऊन गावातील महादेव मंदीर परिसरात करण्यात आलेली वृक्ष लागवड. व गांवअर्तगत रस्ताच्या दुर्तफा बाजूला गतवर्षी लागवड करणाण्यात आलेल्या वृक्षाची पाहणी करुन पाहुन धनेगांव ग्रामस्थांनी लोकसहभागातुन ही वृक्ष लागवड करुन त्याचे संर्वधन केल्याबद्ल अभिनंदन केले यावेळी बोलताना श्री महाडिक साहेब म्हणाले की
आज जर आपण
एकूण सारासार विचार केला तर पृथ्वीचे आरोग्य राखणे म्हणजे आपले आरोग्य राखण्यासारखेच आहे. पृथ्वीचे आरोग्य राखण्यामध्ये वने झाडे ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एक मोठे झाड छोटय़ा-छोटय़ा वनस्पती, कीटक, प्राणी-पक्षी यांना आसरा देते. विषारी कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन जागतिक तापमानवाढ कमी करते आणि प्राणवायू असलेल्या ऑक्सिजनचे उर्त्सजन करते. वनांमुळे जमिनीची धूप रोखली जाते. जमिनीत पाणी मुरते व पूर-दुष्काळ यांसारख्या आपत्ती रोखण्यास मदत होते. तसेच वनांपासून फळे-फुले, औषधे, मसाले, रंग, जनावरांसाठी चारा, जळणासाठी, निरनिराळ्या वस्तू बनविण्यासाठी आणि घरबांधणीसाठी लाकूड मिळते. लातुर येथील शेतकर्यानी व्यवसाईक शेतीकडे वळावे, यामध्ये बाबु लागवड ,व फळलागवड ,याकडे प्रामुख्खाने लक्ष द्यावे यामुळे वृक्षलागवड ही होईल व शेतकर्यानां यामाध्यमातुन रोजगार ही उपलब्ध होईल व . पृथ्वीविषयी कृतज्ञतेची भावना बाळगणे, आपली पृथ्वी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. म्हणूनच वनक्षेत्र व वृक्षलागवड वाढण्यासाठी सर्वानी जास्तीत जास्त प्रयत्न करुन वृक्षाचे संर्वधन करण्याची गरज आहे असे मत उपजिल्हाधिकारी श्री गणेशजी महाडीक म्हणाले,
*चौकट*
मा.श्री संभाजीराव पाटील निंलगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने वृक्षसप्ताहाचे आयोजन करुन 1400 देशी वृक्षाची लागवड केल्याबद्ल श्री रामलिंग शेरे व वर्गमिञ आॅक्सीजन हब टीमचे कार्य कौतुकास्पद आहे याच्या कार्याचा आर्दश इतरांनी घेवुन असे वृक्षलागवड सप्ताहाचे आयोजन करुन वृक्षलागवड करुन संर्वधन करावे असे गौरउदगार
उपजिल्हाधिकारी श्री गणेश महाडिक यांनी केले
यावेळी देवणीची तहसिलदार श्री सुरेशजी घोळवे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अच्युत पाटील, संरपंच पती श्री हरिभाऊ परीट ,उपसंरपंच श्री रविद्रकुमार पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री रामलिंग शेरे, ग्रामसेवक श्रींकात पताळे , श्री बाळासाहेब बिरादार, श्री दिपक पवार, श्री लक्ष्मण पवार, श्री सखाराम चव्हाण , श्री अनिल राठोड ,श्री अमित बिरादार,श्री बालाजी बिरादार, श्री शंकर आपटे, श्री ज्ञानेश्वर बिरादार , आदिसह ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते
Tuesday, July 6, 2021
जिथं समस्या गंभीर तिथं AK खंबीर
औसा: प्रभाग क्र 10 येथील अजीम प्राथमिक शाळेपासुन ते फैसल कादरी याच्या घरापर्यंत रोड व नाली चे काम सुरू आहे खंदक मस्जिद च्या बाजूस काही स्थानिक नागरिकचा बांधकाम मटेरियल पडल्यामुळे संबंधित गुत्तेदार तो भाग सोडून काम सुरू केला होता तर इथल्या नागरिकांनी मला प्रत्यक्ष भेटून या समस्या बाबत सागितल्या वर मी तात्काळ फोन द्वारे लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांना मी वरील विषया संदर्भात सुचना केली असता तर त्यांनी लगेच सबंधित गुत्तेदार ला निर्देश देऊन काम करून घेण्यासाठी निर्देश दिले माझ्या तक्रार वर नगराध्यक्ष अफसर शेख यांनी लवकर कार्यवाही केल्या बद्दल धन्यवाद
विरोध करा पण कायदेशीर करावा
बिबट्याचा संशयास्पद मृत्यू अनाड शिवरात
अजिंठा प्रतिनिधी: अजिंठा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या अनाड वनक्षेत्र भागातील वालकडू शिवारामध्ये एक बिबट्या संशयास्पद मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना सोमवारी सकाळी अघडकीस आली . या घटनेची माहीती मिळताच
वन विभागाचे कर्मचाऱ्यांसह अधिकारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले होते . पाचशे फुट खोल दऱ्या असून या क्षेत्रात घनदाट जंगल आहे. येथे वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो.
शेतशिवारात सकाळी ग्रामस्थ शेतात जात असताना त्यांना बिबट्या पडून दिसला. जवळ जाऊन बघितले असता तो मृत असल्याचे आढळून आला. याची माहिती वन कर्मचाऱ्यांना देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले . पाहणी करून शवचिकित्सा करण्यात आले .
हा बिबट्य पाच ते सहा वर्षाचा असून त्याचा नेमका दहा ते पंधरा दिवस पूर्वी मृत्यू झाला असावा संशय वन विभागाने व्यक्त केला .मात्र त्या बिबटयाचा मृत्यू कशामुळे झाला हे कळू शकले नाही . यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी मार्फत संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही .
पत्रकार जुनेद बागवान यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
गेवराई प्रतिनिधी: अवैध धंद्याच्या बातम्या का छापतोस म्हणत याद राख, या पुढे आमच्या विरोधात बातम्या देशील तर, तुला जिवे मारू, अशी धमकी देत, पाच युवकांनी पत्रकार जुनेद बागवान यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या एका मित्रावर लोखंडी राॅडने व कोयत्याने मारहाण करत जिव घेणा हल्ला केल्याची घटना सोमवार दि. 5 रोजी घडली असून, पत्रकार बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात पत्रकार बागवान बालंबाल बचावले असून, त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली आहे. त्यास गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पत्रकार बागवान यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाचही युवकांना तातडीने अटक करावी, अशी मागणी गेवराई येथील पत्रकारांनी केली असून या हल्याचा तिव्र निषेध केला आहे.
Monday, July 5, 2021
लातूर मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने लावली हजेरी
लातूर :अहेमद तांबोळी
लातूरमध्ये सोमवारी मोठ्या पावसाने हजेरी लावली सुमारे चार वाजता पावसाने हजेरी लावली किमान दीड तास पाऊस मोठ्या प्रमाणात चालू होता पावसाळा सुरू झाला तेव्हापासून हा पाऊस सर्वात मोठा पाऊस ठरलेला आहे या पावसाने लातूरकर खूप आनंदित आहेत गंजगोलाईच्या आजूबाजूचा परिसर उंचीवर असल्यामुळे गंजगोलाई ते आजूबाजूच्या परिसरातील पाणी हे सर्व बायपास रिंग रोड डी-मार्ट जवळ धाव घेतो त्यामुळे बायपास वरील हा दृश्य आढळून आला नागरिकांना थोडासा त्रास सहन करावा लागला मात्र हा मोठा पाउस बघून लातूरकर खूप आनंदित आहेत या पावसाने कदाचित ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही त्यांना हा पाऊस दिलासादायक आहे नक्कीच त्यांचे पेरणी होतील
व मांजरा बॅरेज मध्ये पाणी वाढेल अशी विचारधारा लातूरकर व्यक्त करत आहेत
आत्महत्याग्रस्त कुटुंबास शासनाची सर्वोतोपरी मदत - राज्यमंत्री अब्दुल सत्तार उंडणगावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची सांत्वन भेट
औरंगाबाद सिल्लोड तालुक्यातिल उंडणगाव येथे शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी स्वतः महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उंडणगाव येथे पाडळे कुटुंबाच्या घरी जावून कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.
पाडळे कुटुंबाला स्वपदरची तसेच शासनाच्या वतीने आर्थिक मदत, कुटुंबातील मुलांना सरकारच्या वतीने शिक्षणाची सुविधा यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कुटुंबाला दिली.
घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून याबाबत पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासन घेईल. त्यासोबतच पीडित कुटुंबाला घरकुल, मुलांना जातीचे प्रमाणपत्र, अंत्योदय योजनेतून मोफत धान्य, बालगृह अशा विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. एखाद्या घरात कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाची वाताहत होते. सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून उंडणगाव येथील आत्महत्याग्रस्त कुटुंब स्वबळावर उभी राहावे. यासाठी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केल्या जाईल, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाडळे कुटुंबाला किराणा किट तसेच जीवनावश्यक वस्तू दिल्या याशिवाय स्वपदरची आर्थिक मदत देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
*आत्महत्या हा पर्याय नाही*
सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही असे स्पष्ट करीत शासन शेतकऱ्यांच्या खंबीर पाठीशी आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही अडचणी असल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात जेणे करून त्या समस्येची सोडवणूक करण्यात येईल. आत्महत्या मुळे आपल्या कुटुंबाचे प्रश्न सुटत नाहीत, उलट यात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, जि. प. माजी सभापती राजाराम पाडळे, माजी उपसरपंच शांतीलाल बसये, माजी सरपंच मोतीराम पाडळे, सय्यद जब्बार, दीपक चौथे, जगन पाटील, सय्यद नासेर, समाधान पाडळे यांच्यासह नायब तहसीलदार किरण कुलकर्णी, नायब तहसीलदार विनोद करमनकर, मंडळ अधिकारी राजाराम ससाणे,तलाठी विष्णू सोनवणे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर बोराडे आदिंची उपस्थिती होती.
*असे आहे कुटुंब*
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून उंडणगाव येथील संतोष खंडू पाडळे ( 40 वय ) व संगीता संतोष पाडळे ( 32 वय ) या अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याने बुधवार (दि.30) रोजी आत्महत्या केली. त्यांना जवळपास 6 लाख रुपयांचे कर्ज देणे होते. त्यांच्या पश्चात आई- शांताबाई खंडू पाडळे 70 वर्ष,
मुलगा- मानव संतोष पाडळे 10 वर्ष,
मुलगी- आरती संतोष पाडळे 12 वर्ष,
मुलगी -भारती संतोष पाडळे 14 वर्ष,
मुलगी-यशोदा संतोष पाडळे 8 वर्ष, व
मुलगी - दिव्या संतोष ( विवाहित ) वय 19 असे कुटुंब आहे. या कुटुंबातील शांताबाई यांच्याशी राज्यमंत्री सत्तार आणि जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले.
छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतल्यासाठी जागा देण्याची सर्व पक्षीय व सर्व राजकीय,सामाजिक संघटनांची मागणी
गंगाखेड तालुका प्रतिनिधि शफीक तंबोली: गंगाखेड़ नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी जागा देण्यात यावी या मागणीसाठी आज नगर परिषदेस सर्व पक्षीय व सर्व राजकीय, सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी विष्णु मुरकुटे, सत्यपाल सालवे, प्रमोद मस्के, श्रीकांत भोसले व इतर उपस्थित होते.
Sunday, July 4, 2021
कांबळे परिवाराने बैलावर केले अंतिमसंस्कार
निलंगा प्रतिनिधी: गेली 22 वर्षांपासून अगदी पोटच्या मुलांप्रमाणे बैलांचा सांभाळ करून त्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या पार्थिव देहावर अंतिमसंस्कार करून येथील अशोकनगर भागात राहणारे पत्रकार तथा प्राणि प्रेमी मिलिंद कांबळे यांच्या परिवाराने एक नवा आदर्श पायंडा घालून त्यांच्या शेतीवर असलेल्या दोन बैलांपैकी एका बैलाचा दि.०३ जुलै२०२१ वार शनिवार रोजी पहाटे मृत्यू झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
परिवारातील एक व्यक्ती गेल्यासारखे दुःख झाले मात्र मृत बैलाच्या पार्थिवदेह त्यांच्या स्वतःच्या शेतीत दफन करून अंतिमसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी,तालुका अध्यक्ष भरत गायकवाड,पत्रकार मोहन क्षिरसागर,प्रदीप सोनकांबळे(विधिकर्ते) देवदत्त सूर्यवंशी शिवसेनेचे सुरेंद्र महाराज,भिमशक्तीचे मुन्ना सुरवसे,दयानंद कांबळे,नागनाथ कांबळे,आदित्य कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिवार परिवारातील सर्व नातेवाईक उपस्थित होते.
कांबळे परिवाराने गौतम बुद्धाच्या शिकवणी प्रमाणे पशु पक्षावर प्रेम करा प्राणी मात्रावर दया करा याला अनुसरून स्वतः च्या शेतावरील दोन बैलांना कसायाला न विकता आजपर्यंत तब्बल २२वर्षे घरातील व्यक्तिप्रमाणे सांभाळ केला मात्र वृद्धापकाळाने एक बैल राजा यांचे निधन झाले.यामुळे असा आदर्श सर्व शेतकरी बैल मालकांनी घ्यावा अशी चर्चा निलंगा पंचक्रोशीत होत आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी मंत्री अब्दुल सत्तार साहेबांची भेट
अजिंठा प्रतिनिधी: कर्जबाजारीपणा मुळे उंडणगाव ता. सिल्लोड येथील संतोष खंडू पाडळे व संगीता संतोष पाडळे या पती - पत्नी शेतकरी दाम्पत्यानी आत्महत्या केली. आज महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी उंडणगाव येथे पीडित कुटूंबाच्या घरी जावून सांत्वन भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून याबाबत पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेईल त्यासोबतच पीडित कुटुंबाला घरकुल, मुलांना जातीचे प्रमाणपत्र, अंत्योदय योजनेतून मोफत धान्य आशा विविध योजनेचा लाभ देण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.अब्दुलसत्तार मंत्री साहेबांनी अपले चुनाव छेत्र सिल्लोड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतला निधीचा वाटप केली तसेच अजिंठा गाव पासुन दोन कीलो मिटर अनाड गाव मध्ये बरड बस्ती मध्ये युद्धस्तरावर विज पुरवठा करण्यात आला या विकास कामांना बगुन सर्व तालुक्यात मंत्री साहेबांची जयजयकार झाली आहे अजिंठा ग्राम वासंयाची ही आशा वाढली की मंत्री साहेब हमाला ही फिलटर पाणी प्यायला पाझतील
Saturday, July 3, 2021
आजपासुन बस सेवा सुरु
गंगाखेड़ तालुका प्रतिनिधि शफीक तंबोली: परभणी जिल्ह्यातील सर्व बस सेवा आज पासून सुरु तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व खासगी बस ट्रॅव्हल्स 100% क्षमते सह सुरू राहतील, जिल्हाधिकारी यांचे आदेश
Subscribe to:
Posts (Atom)