Thursday, July 11, 2019

पुणे येथे कार्यकर्ता मेळावा व अधिवेशन संपन्न

पुणे येथे कार्यकर्ता मेळावा व अधिवेशन संपन्न
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती आणि पुरुष हक्क संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 
पुणे : अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती आणि पुरुष हक्क सरक्षण समिती यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा व अधिवेशन 30 जून 2019 रोजी पुणे येथे उद्यान कार्यालयात संपन्न झाले. यावेळी समाजात होत असलेले अत्याचार, विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी, महिलांवर होणारे अत्याचार तसेच कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे यावर विचारमंथन करण्यात आले. तसेच या समस्या त्वरित सोडविण्याचे ठरविण्यात आले.  मुख्य अतिथी श्री पराग पाटील भारताचे ऑलम्पीक खेळाडू, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुभाषजी बस्वेकर संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, प्रमुख पाहुणे श्री.दिपक कलिंगन राष्ट्रीय अध्यक्ष : आँल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन अँन्ड आर्टिस्ट युनियन राष्ट्रीय अध्यक्ष-जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियन, संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी लातुर, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.संतोष शिंदे पुणे, प्रदेश सहसचिव-अनिल चौधरी पुणे, प्रदेश कार्यध्यक्ष नंदकिशोर धोत्रे, मुंबई पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष संगीता ताई ननावरे पुणे, प्रदेश अध्यक्ष अहेमद अन्सारी परभणी, आरोग्य विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ अ.हमीद शेख लातुर, महिला प्रदेश अध्यक्ष शर्मिला ताई शिंदे पुणे, महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ.महविश खान पठाण औंरगाबाद, महिला सोशल मिडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ.रजनीताई काळे पुणे, महिला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रतिभा ताई खैरनार नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संदिप काळे, रीटायर डिपोटी इंजिनिअर सौदागर जी.जे, मराठवाडा उपाध्यक्ष शेख शादुल व अनेक मान्यवरांचे मोलांचे मार्गदर्शन झाले व सुत्रसंचालन बनसोडे यांनी केले. 
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी माहिती अधिकार, मानवी हक्क, पत्रकार संरक्षण, ग्राहक संरक्षण, भ्रष्टाचार निर्मुलन व पुरुष हक्क संरक्षण या सहीत संघटनेचे ध्येय व धोरणे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच अनेक मान्यवरांचे अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन झाले.
यावेळी पराग पाटील म्हणाले की, एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल त्यावेळी त्याव्यक्तीने खचून न जाता त्याविरूध्द लढायला हवे. तसेच आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरूध्द प्रत्येक माणसाने आवाज हा उठवायलाच हवा.
दिपक कलिंगण म्हणाले की, प्रत्येक बाबतीत सरकार व राज्यकर्ते सर्वसामान्यांना गाजर दाखवितात मात्र त्यातून देखील गाजराच्या बुडाचा भाग जनतेसाठी व वरील भाग हा स्वतःसाठी ठेवतात अशा प्रकारचे आपले राज्यकर्ते व सरकार आहे. रेल्वेचे खाजगीकरण करून करण्याची कल्पना सुरू करून स्वतःची पोळी भाजून घेवून जनतेची दिशाभुल करीत आहेत. तरी यामुळे बेरोजगारी वाढत आहे. 
अ‍ॅड.संतोष शिंदे म्हणाले की, आज कुटूंब व्यवस्था आणि विवाहसंस्था वाढत असल्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होवून लहान मुलांची फरफट होत आहे. वयोवृध्द लोकांची कुचंबना होत आहे. 
दोन गॅस सिलेंडरच्या नावाखाली समाजातील गरीब लोकांचे रॉकेल पळवून नेले. जीएसटी टॅक्स लावून व्यापारी व उद्योजकांचा फायदा करून दिला. मात्र एखादा गरीब व्यक्ती एका हॉटेलात चाळीस रूपयांचा नाष्टा जरी केला तरी त्याला देखील आता टॅक्स लागतो. त्यामुळे पुरूष हक्क संरक्षण समिती व अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती ही काळाची गरज आहे. 
नंदकिशोर धोत्रे हे यावेळी म्हणाले की, प्रायव्हेट डॉक्टरकडून 1-2 टेस्ट करण्यासाठी 4-5 टेस्ट करायला रूग्णांना सांगतात. मात्र त्यातील एक-दोनचे टेस्ट होतात परंतू पैसे मात्र सर्व टेस्टचे घेण्यात येते. त्यातून डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात कमिशन मिळते. चुकीचा सल्ला देवून रूग्णांना घबरावून सर्जरी करण्यास भाग पाडतात. हे गरीबांना शक्य नसते त्यामुळे डॉक्टरांचा धंदा तेजीत चालतो. डॉक्टर लोकांना फसवू लागले आहेत. त्याला सरकार देखील अप्रत्यक्षपणे साथ देत आहे.  अनिल चौधरी म्हणाले की, आज शिक्षणाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजार झाला आहे की, गरीब घरातील मुलांना शिक्षण घेणे अत्यंत अवघड झाले आहे. पहिली ते 12 वी पर्यंतचे शिक्षण मोफत झाले पाहिजे. केवळ नावातील चुकीमुळे सरकारच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या कांही विद्यार्थ्यांना शिक्षण व शिष्यवृत्तीपासून वंचीत रहावे लागले. 
सुभाषजी बसवेकर म्हणाले की, मानवी हक्काच्या जाहीरनाम्यापेक्षा मानवी कर्तव्याचा जाहीरनामा झाला असला पाहिजे. सर्वजणांनी आता सिटीजन जर्नलिझम होवून सरकारी अधिकार्‍यांच्या गैरवापरावर आवाज उठविला पाहिजे. उदाहरणार्थ रस्ते, वीज, स्वच्छता आदि विषयांबाबत. 
यावेळी संगीता ननावरे म्हणाल्या की, भारताची कुटूंबव्यवस्था वाखण्याजोगी आहे. ती टिकली पाहिजे त्यासाठी आपल्या दोन्ही समित्या अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती व पुरूष हक्क संरक्षण समिती या दोघांनी एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. यावेळी संपादक दत्तात्रय परळकर लातुर, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष अजहर शेख, अल्पसंख्यक प्रदेश सचिव अझिमोद्दीन काझी, युवा अल्पसंख्यक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल शेख, युवा महाराष्ट्र प्रदेश संघटक अयुब कुरेशी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हाळसाकांत पाटील, मराठवाडा सचिव फारुख शेख, रायगड जिल्हाध्यक्ष गिरीश भोपी, सांगली महिला सो.मि.जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.कु. रेखा पाटील, शेतकरी विभाग लातुर जिल्हाध्यक्ष पावले परमेश्वर, पुणे जिल्हा सचिव नितीन सैद, पुणे जिल्हा संघटक किशोर सानप, नांदेड जिल्हा संघटक कैलाश गायकवाड, सो.मि.औसा तालुकाध्यक्ष शिवाजी मोरे, खेड तालुकाध्यक्ष किरण देवरे, देगलूर तालुकाध्यक्ष महेंद्र नरबागे, चाकण शहर उपाध्यक्ष धनराज गायकवाड, उदगीर तालुका कायदा सल्लागार अँड. शेख इब्राहिम,पाथरी तालुका कार्याध्यक्ष सोपान मुधावने, महिला पुणे शहर उपाध्यक्ष मिनाक्षी सुतार, नबी शेख पुणे, मोहन जोशी महाराज, प्रशांत ननावरे, फक्रोदिन सौदागर, उज्वला ताई बावगे, पुरुष हक्क संरक्षण समितीचे रत्नागिरी विभाग प्रमुख विलास देवरुकर, पुणे जिल्हा सचिव प्रसाद पंचपोर, पिंपरी चिंचवड शहर महिला प्रमुख आरती ताई कोशे, प्रतिभा ताई शिंदे, प्रांची ताई ननावरे तसेच अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती व पुरुष हक्क संरक्षण समितीचे महाराष्ट्रातील असंख्य पदाधिकारी व सदस्य तसेच नागरिक या अधिवेशनात उपस्थित होते.