Tuesday, September 24, 2024

नागरी सुविधा पुरविण्यास असमर्थ असलेल्या वलांडी ग्रा.पं.विरोधात गावकरीच्या वतीने उपोषणाचा इशारा!

वलांडी प्रतिनिधी: वलांडी गावातील नागरिकांना स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक असलेल्या भौतिक सुविधा पुरविण्या पासून वंचित असल्याने ग्रामपंचायत कार्यालयाला तोंडी व लेखी अनेक वेळा तक्रारी देऊनही नागरिकांच्या भौतिक सुविधेकडे दुर्लक्ष करून वलांडीकरांना आवश्यक असलेली वीज, पाणी, गटारी, रस्ते यापासून दूर ठेवून वलांडी ग्रामपंचायत नागरिकांना सुविधा पुरविण्यास असमर्थ असल्याने वलांडी गावातील समस्त नागरिकांच्या वतीने देवणी तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती देवणी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनातील ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा 1 ऑक्टोबर 2024 पासून वलांडी ग्रामपंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे सदर निवेदनावर 65 समस्त गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत उपोषणातील खालील प्रमाणे मागण्या घेऊन बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात येत आहे.
उपोषणकर्त्यांचे खालील प्रमाणे मागण्या..
1) आठ कोटी मंजूर निधी पाणीपुरवठ्याचे काम दर्जेदार व जलद गतीने करून दिरंगाई करणाऱ्या गुत्तेदारावर कारवाईची मागणी. 
2) गावातील सर्व जातीतील गरजूं लोकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा.
3) गावा अंतर्गत रस्त्याचे व गटारीचे कामे करून जनतेची गैरसोय दूर करावी
4) ग्रा.पं.हद्दीत असलेल्या जमिनीची गावठाण हद्दवाढ करून वाढीव कुटुंबाचे पुनर्वसन करणे.
5) माधव सगर या ग्रामसेवकाची हकालपट्टी करून मुख्यालयी व कायमस्वरूपी राहणाऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती करून बायोमॅट्रिक मशीन बसवण्यात यावी.
6) लिंगायत व जंगममाला समाजाच्या स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून द्यावी
7) बौद्ध समाजाच्या जुन्या स्मशानभूमी जागेची नमुना नंबर 8 अ ला नोंद करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करणे.
8) मातंग समाजाच्या स्मशानभूमीत दहन शेड तयार करून द्यावे
9) मुस्लिम स्मशानभूमीच्या जागेचा ताबा देऊन त्यास संरक्षण भिंत द्यावी.
10) मराठा, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षणाचा ठराव देऊन शासनाला पाठवावे.
11) वाढीव स्वस्त धान्य दुकानाचा ठराव घेऊन शासनाला पाठवावे.
12) वलांडी बाजारपेठेत सार्वजनिक मुतारी व स्वच्छालय बांधण्यात यावे. अशा मागण्याचे निवेदन दि.24 सप्टेंबर रोजी देण्यात आले आहे. उपोषण कर्ते अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोध समितीचे मराठवाडा अध्यक्ष शेख अजीम व महिला प्रदेश सचिव आसिया रिजवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सदर निवेदन देताना सौदागर महमदरफी संस्थापक अध्यक्ष अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समिती, दत्ता डुब्बे तालुकाध्यक्ष किसान सेल काँग्रेस पार्टी, धनराज बिरादार माजी तंटामुक्ती अध्यक्ष, अजिज सौदागर ज्येष्ठ पत्रकार यांनी निवेदन दिले.

Sunday, September 8, 2024

कायद्याचा ज्ञान नसलेला अनाडी अभियंता शिरीष राघूला प्रशिक्षणाची गरज RTI.

उदगीर प्रतिनिधी: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग उदगीर या कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी शिरीष राघू हे माहितीचा अधिकार अधिनियम-2005 या कायद्याच्या ज्ञानापासून अनभिज्ञ असल्याचे माहितीच्या अधिकारात दिलेल्या उत्तरामधील पत्रावरून स्पष्ट होते. सविस्तर असे की अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग उदगीर अंतर्गत मौजे वलांडी येथे जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम सुरू करण्यात आले होते काम थोडे करून जास्तीचे बिल उचलण्यात आल्याने माहिती अधिकारात मौजे वलांडी पाणीपुरवठा या योजनेचे झालेले काम 44.81% टक्के झालेल्या कामांचे नावे, कोठून कोठेपर्यंत काम करण्यात आले त्या गावाचे नाव ठिकाणासह या सर्व कामाची माहितीची यादी सत्यप्रत करून द्यावे अशी माहिती मागितली असता जन माहिती अधिकारी तथा उपविभागीय अभियंता शिरीष राघू यांनी जल जीवन पाणीपुरवठा योजनेत केलेला भ्रष्टाचार उघड होतो या भीतीपोटी माहिती न देण्याच्या उद्देशाने असे उत्तर दिले की आपण केलेला अर्ज लेटर पॅड वर टंकलिखित केलेला आहे असे म्हणून अद्याप माहिती दिली नाही.
त्यामुळे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय लातूर येथे प्रथम अपील दाखल करून अशी मागणी करण्यात आली की, माहिती अधिकार अधिनियमाच्या तरतुदीचा अभ्यास व ज्ञान जन माहिती अधिकारी उपविभागीय अभियंता शिरीष राघू यांना नाही त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाची तजवीज करावी व प्रथम अपील आदेश मध्ये दोषी जन माहिती अधिकारी व चुकीच्या पद्धतीने हाताळणारे बेजबाबदार कृतीचे वर्तन करून या अधिनियमा प्रती अनआस्था दर्शकन माहिती अधिकार या अधिनियमाचे कलम 7(1) चा भंग केला आहे यामुळे त्यांच्याविरुद्ध सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 31 मार्च 2008 च्या परिपत्रकानुसार कठोर शिस्तभंगाची कार्यवाही करावी. व जन माहिती अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून प्रथम अपील आदेश त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही शिफारस लेख स्वरूपात नमूद करावी. त्यामुळे यांना सदर कायदयाचे ज्ञान नाही. किंवा प्रशिक्षण घेतलेले नाही हे स्पष्ट  होते. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा कायदा निर्गमित होऊन 18 ते 19  वर्ष झाले एवढा प्रंचड व प्रदिर्घ  कालावधी उलटुन देखील जनमाहिती अधिकारी तथा उपविभागीय अभियंता शिरीष राघू यांना लोकभिमुख कायद्याविषयी ज्ञान असु नये ही खुप मोठी शोकांतिका आहे.

Friday, August 30, 2024

कार्यवाहीचा बडगा दाखविल्याने डाक सेवक पदाचा राजीनामा दिला मात्र सदर काळात डीएड केलेले वैद्य की अवैद्य? एक व्यक्ती दोन ठिकाणी नोकरी व शिक्षण करतोच कसा? अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समितीच्या तक्रारीची दखल!

उदगीर प्रतिनिधी: उदगीर येथील सय्यद एहतेशाम सय्यद खलील यांनी जमहुर अध्यापक विद्यालय उदगीर येथे हजर राहून डीएड शिकत असताना विद्यार्थी हजेरी पटावर स्वाक्षरी करून शैक्षणिक वेळ सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत उपस्थिती दाखवली आहे डीएड मध्ये शिकत असताना त्याच शैक्षणिक वेळेत म्हणजेच 10 ते 1:30 वाजेपर्यंत उदगीर व देवणी पोस्ट ऑफिस मध्ये हजर नसताना खोटी स्वाक्षरी दाखवून पगार घेऊन उदगीर डाक निरिक्षक व डाक अधीक्षक विभाग लातूर यांच्याशी आपसात संगणमत करून पगार ची वाटाघाटी करून शासनाची फसवणूक केल्याने सदरचे प्रकरण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी अनेक वेळा वरिष्ठांशी तक्रारी अर्ज करून संबंधित प्रकरणाची अनेक वेळा बातमी प्रकाशित केल्याने डाक संचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी त्याची दखल घेऊन संबंधितास कारवाईचा बडगा दाखविल्याने तो सय्यद एहतेशाम यांनी डाक सेवक पदाचा राजीनामा देऊन डाक कार्यालयातुन सेवा मुक्त झाला खरा पण सदरच्या काळात डीएड शिक्षण घेतल्याने सदर शिक्षण विभागाची चौकशी मात्र गुलदस्त्यातच असल्याने डीएड शिक्षण बोगस की डाक कार्यालयाची नोकरी बोगस याची सखोल चौकशी करावी म्हणून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने शिक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात व डाक विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात दोन्ही ठिकाणी तक्रार दिली आहे दोन्हीही विभागात सदर प्रकरणाची चौकशी चालू आहे चौकशी पूर्ण झाल्यावरच कळेल की डाक विभागाची नोकरी व डीएड शिक्षण घेत असलेली डिग्री कोणती वैद्य व कोणती अवैद्य आहे हे चौकशी झाल्यानंतरच कळेल. परंतु सदर प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती लढा देत राहणार. 
डाक निरीक्षक उदगीर बुरखे बालाजी यांनी दिलेल्या माहिती वरून दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सदर डाक सेवक सय्यद एहतेशाम सय्यद खलील यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्याचे सांगितले.

Wednesday, August 21, 2024

परळी न.प.समोर ऊपोषणाचा तीसरा दिवस! मात्र प्रशासन झोपेतच, उपोषणकर्त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष,

परळी वै. दि.20 अगस्ट पासुन सरदार नगर, रेणुका नगर, बश्वेस्वर नगर व सनिया नगर या भागात मुलभूत सुविधा पुर्विण्या साठी अन्यान्य अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीचे अल्पसंख्याक मराठवाड़ा अध्यक्ष शेख अजीम उपोषणाला बसलेले आहेत आज उपोषणाचे तिसरे दिवस आहे पण नगर परिषद प्रशासन झोपेतच आहे, ऊपोषण करते शेख अजिम यांची प्रकृती खालावल्याने सदर भागातील नागरिक खवळल्याने प्रसतीथी चिघडण्याचे दिसत आहे. सदर भागात कसल्याही प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध नाहीत पिण्याचे पाणी, रोड़, सांड पाणीसाठी नाल्या नाही व पददिवे नाही अशा विविध मागण्या घेऊन अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे या उपोषणाला पाठिंबा देणारे फरकूद अली, रसुल खान, महिलांचे कामे करनारे मॅडम सुनिता नरंगलकर, खय्युम खान, शिंदे सर, तहसिन सर, शेख खुद्दुस, हुजूर खान, नासेर अन्सारी, मानवाधिकारचे जमील अध्यक्ष, शेख बद्रोद्दीन बाबुमिया, मुसब्दिन, एम आय एम चे मुस्तफा मैनोद्दिन शेख, शेख सोहेल, यासिन अजिम शेख,  हुजेफा रहिम शेख, यांनी उपोषणा स्थळी भेटदेऊन पाठींबा दिला .

Tuesday, August 20, 2024

देवणीत मुस्लिम समाजाच्या वतीने गिरी महाराजांच्या विरोधात निषेध व मूक मोर्चा! मुस्लिम धर्मीय विरोधात जाणून बुजून धार्मिक भावना दुखावून जातीय दंगल घडवणाऱ्या रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करा

देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन: दोन धर्मीयांमध्ये जाणून बुजून जाती तेढ निर्माण करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावे यासाठी देवणी शहरात मंगळवारी सकाळी ठीक अकरा वाजता समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने जामा मस्जिद येथून मूक मोर्चास सुरुवात करण्यात आली, हा मोर्चा गांधी चौक मार्गे बोरोळ चौकात येऊन धडकला यावेळी अनेक मुस्लिम समाजातील मौलाना चे भाषणे झाले यावेळी मौलाना हाफीज आलामखान  बोलताना सांगितले की आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगिरी महाराजाकडून मुस्लिम धर्मीय विरोधात जाणून बुजून धार्मिक भावना दुखावून जातीय दंगल घडवण्याच्या इराद्यात वक्तव्य करून घेण्यात येत असल्याचे बोलले ,तसेच नितेश राणे हा सुद्धा दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभावा म्हणून जाणून-बुजून चिथावणी खोर भाषणे करीत आहे, मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इस्तेमा होतात त्यामध्ये फक्त मुस्लिम विषयी प्रवचन देऊन माणसाने समाजात माणूस म्हणून कसे जगावे याबाबत शिकवन दिली जाते ,पण कोणत्याही धर्म जाती विरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले जात नाही, तरी दोन धर्मीयांमध्ये जाणून-बुजून तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावे अशा मागण्याचे निवेदन देवणी तहसीलदार यांना देण्यात आले आहे, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे देवणी तालुका अध्यक्ष अयुब कुरेशी, मौलाना हीफजूर रहमान, मौलाना हाफीजं आलम  खान, मौलाना हाफीज युनूस, मौलाना हाफिज नईम, मौलाना हाफिज इब्राहिम तांबोळी, मौलाना सैफ जमीनदार, मौलाना हाफीज आजिम, मौलाना हाफिज मैनोदिन, मौलाना फैयाज शेख, फैयाज शेख, सईद खान, अल्ताफ शेख, सादक कुरेशी, अहमद सय्यद, माजीद तांबोळी, सुलतान मल्लेवाले, जुहेब उंटवाले, सगीर मोमीन,अक्रम शेख, शकील तांबोळी, बाबूलाल पठाण, ताज मुंजेवार, यासीन मुर्शिद यांच्यासह देवणी तालुक्यातील असंख्य मुस्लिम बांधव या निषेध व मूक मोर्चात सहभागी होते,हा मोर्चा शांतेत पार पडला,यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्यासह चोख बंदोबस्त ठेवला होता

Monday, August 19, 2024

वलांडी येथे मूसळधार पावसाचे पाणी दुकानात शिरले..

वलांडी प्रतिनिधी: तालुक्यातील वलांडी येथे ४ वाजता मूसळधार पावसास सूरूवात झाली व पाऊसाने किमानं एक ते दिड तास झोडपल्याने वलांडी येथील मूख्य बाजार पेठेत जागी जागी पाणी साचले व पाणी जाण्यासाठी पर्याय मार्ग नसल्याने पावसाचे पाणी येथील व्यापाऱ्यांच्या दूकानात शिरले.
१०१७ व २०१८ या कालावधीत रस्ते बनले आहेत.या रस्त्याच्या दूतर्फा नाल्याचे काम होणे आवश्यक होते.परंतू असे न करता वलांडी येथील मूख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले मात्र त्यांच्या बाजूच्या नाल्याचे काम न झाल्यामुळे व रस्त्यांची उंची वाढवल्यामूळे दोन दिवसांपासून पडत असलेल्या मूसळधार पावसामुळे बाजार पेठेत पाणी साचुन दूकानात पाणी शिरले व्यापाऱ्यांनी शिरलेले पाणी बकेटच्या साह्याने बाहेर काढुन टाकले.मूख्य बाजार पेठेत व्यापाऱ्यांनी जागो जागी  अतिक्रमण केल्याने हा प्रकार घडला अतिक्रमणामूळे नाल्याचे काम झाले नाही व रोडचे काम झाल्याने रोडची उंची वाढल्याने हा प्रकार घडला.यामूळे जो तो ग्रामपंचायती कडे तक्रारीचा पाढा वाचत आहे मात्र अद्याप तरी ग्राम पंचायत प्रशासनाने यावर कोणती उपाययोजना करतील.आता ग्रामपंचायत कोणती उपाययोजना योजना करणार हे महत्वाचे ठरणार.

Wednesday, July 31, 2024

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील फ्रुट मार्केट व्यापाऱ्यांशी साधला सुसंवाद

लातूर प्रतिनिधी : सगीर मोमीन ३१ जुलै २०२४ लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौका नजीकच्या फ्रुट मार्केट परीसरात जाऊन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री वलातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी तेथील व्यवस्थांची पाहणी केली. त्याठिकाणी व्यापारी, फळ विक्रेते, वाहनधारक आणि नागरीक यांच्याशी सुसंवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी फ्रुट मार्केट परीसरात जाऊन तेथील व्यवस्थांची पाहणी केली. त्याठिकाणी व्यापारी, फळ विक्रेते, वाहनधारक आणि नागरिक यांच्याशी चर्चा केली. फ्रुट मार्केटमध्ये दररोज नियमितपणे स्वच्छता करावी, या ठिकाणच्या कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा लावावी, व्यापारी,फळविक्रेते, तसेच नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी पार्किंग व्यवस्थेवर लक्ष द्यावे, या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारावी, फ्रुट मार्केट मध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी करून त्याची नियमित स्वच्छता होईल हे पाहावे आदी सूचना महानगरपालिका प्रशासनाला करून, आगामी काळात फळ विक्रीसाठी येणारे शेतकरी त्याचबरोबर
व्यापारी यांच्याशी नवीन अद्यावत फ्रुट मार्केट उभारणी करावी असेही यावेळी सांगितले यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, लातूर फ्रुट मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष हाजी शबीर, रहेमानसाब बागवान, शब्बीर हाजी, मेहतासाब बागवान, बरकत हाजी, रहेमानसाब बागवान, विजयकुमार साबदे, इमरान सय्यद, आसिफ बागवान, सचिन बंडापले, अब्दुल्ला शेख, सुलतान शेख, मजीद हाजी, कासीमसाब बागवान, तबरेज तांबोळी, गिरीश ब्याळे, असंघटित कामगार काँग्रेसचे लातूर शहराध्यक्ष तथा महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य गौस गोलंदाज, लातूर हातगाडा असोसिएशन सचिव मजीद बागवान, हमीद चाकूरकर, सुलतान शेख, मजीद हाजी, कासिमसाब बागवान, बरकत बागवान, जाकिर बागवान, बडेसाहब शेख, अनवर बागवान, रफिक बागवान, रईस बागवान, आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी फ्रुट व्यापारी आडते हमाल मापाडी उपस्थित होते.

कापड्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला, 1 लाख 28 हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

लातूर प्रतिनिधी: सगीर मोमीन लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलीस ठाणे हद्दी मध्ये रात्रीच्यावेळी एका कपड्याच्या दुकानाचा पत्रा काढून साड्या व कपडे चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
              पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. 
             सदर पथकाकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी गुप्त बातमीदाराकडून नमूद गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली.
                   सदर पथकाने नमूद गुन्ह्यातील आरोपीला दिनांक 30/07/2024 रोजी कळंब तालुक्यातील पाथर्डी येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 1) दादा बब्रुवान पवार, वय 45 वर्ष राहणार पाथर्डी तालुका कळंब जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) असे असल्याचे सांगितले.
त्याच्या घराची झडती घेतली असता घरा मध्ये नवीन साड्या व कपडे मिळून  आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या पत्नीसह लातूर जिल्ह्यातील रेनापुर येथील  एका कपड्याच्या दुकानात चोरी केल्याचे व त्यामध्ये चोरलेले साड्या व कपड्याचा मुद्देमाल असल्याचे कबूल केले.
                त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलसह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे रेणापूर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. असून त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उप-निरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार रामहरी भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, प्रकाश भोसले, सुरेश कलमे, प्रदीप चोपणे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पुणेकर, पोलीस अमलदार गोरोबा इंगोले, अंकुश बिराजदार यांनी केली आहे.

सीमावर्ती भागात सूर्यवंशी यांच्यातर्फे पत्रकारांचा सत्कार

वलांडी प्रतिनिधी: सगीर मोमीन भालकी तालुक्यातील आळवाई येथे कर्नाटक हुलसुर तालुका पत्रकार संघ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांचा व महाराष्ट्रातील काही पत्रकारांचा आळवाई येथे दि.30.जुलै रोजी युवा नेते कर्नाटक रोहिदास संघटना अध्यक्ष गोपाळ बाबुराव सुर्यवंशी यांच्या तर्फे पत्रकाराने केलेल्या कामाचे कौतुक करून सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम हे पत्रकार बांधव करत असतात त्या अनुषंगाने सत्कार समारंभ करण्यात आले रोहीदास संघटने तर्फे अशे अनेक गरजू लोकांना साहित्याचे वाटप व सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबविले जातात यावेळी जेष्ठ पत्रकार संपादक तेरणातीरचे पी आर पाटील,विद्यासागर पाटील, दत्तात्रेय साबणे,शीवकुमार खपले, गुरूप्रसाद मेंठे,वीरशेठी करकले,आकरम शेख,राजु कीसे,डी एम स्वामी,सगीर मोमीन सोसायटी अध्यक्ष जनार्दन बीरादार,ग्रामपंचायत माजी अध्यक्ष गुणवंतअप्पा गंदगे,माजी सभापती अकबर पटेल, गुंडअप्पा गंदगे,दत्ता पाटील, जनार्दन जयदेव, राजकुमार गंदगे,खंडु मोरे    व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

वलांडीत जलजीवन योजनेचे पाणीकाही येईना रस्ते खंदल्यामुळे नागरिकांना घरापर्यंत जाता येईना

वलांडी प्रतिनिधी: सगीर मोमीन देवणी तालुक्यातील वलांडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या खड्यांत पाणी साचत असल्याने संतप्त नागरीकांनी वलांडी येथील ग्राम पंचायत कार्यालयात निवेदन देण्यात आले.वलांडी येथील वार्ड क्रमांक १ मधील शासकीय अरोग्य केंद्र शेजारील वसतीत जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या खड्यात पाणी साचल्याने तेथील नागरीक वृध्द महीला व शाळकरी मूलांना साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत आहे.
पडलेल्या पावसाला जाण्यास पर्यायी मार्ग नसल्याने पाणी साचत आहे.
पुर्वे कडील बाजूला शासकीय आरोग्य केंद्र आहे व पलीकडे मूस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थान मस्जिद आहे.तरी मस्जिद जाण्यासाठी मुस्लिम बांधवांना याच साचलेल्या पाण्यातून वाट‌ काढावी लागत आहे.
जलजिवन मिशनचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे . केंद्र सरकारचे धोरण होते की हर घर नल हर घर जल या मिशन अंतर्गत कामास जोमात सुरुवात झाली होती.जलजिवनचे काम वेळेवर न झाल्याने गावात नळांसाठी  खोदलेल्या खड्यात पाणी साचुन जागो जागी डबक्यामूळे नागरीकांच्या आरोग्यास धोका  निर्माण होत आहे.
ग्राम पंचायत मात्र झोपेचे सोंग घेत आहे.तरी वेळोवेळी ग्राम पंचायतला तोंडी सांगूनही काम होत नसल्याने संतप्त नागरीकांनी ग्रामविकास अधिकारी माधव सगर यांना ३ ते ४ दिवसांत साचलेल्या पाण्याचे योग्य ते  नियोजन लावावे व जर या साचलेल्या पाण्यामुळे नागरीकांना डेंग्यू मलेरीया सारखे आजार जडले तर ग्राम पंचायतीला ग्राह्य धरण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माने गोपाळ, त्रिनेत्र सूर्यवंशी, सिध्देश्वर खवंदे,अमोल कांबळे,समाधान श्रंगारे,योगेश थोरात,उमाकांत कांबळे,आदी उपस्थित होते.

Friday, July 26, 2024

भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा उदगीर येथील कार्यक्रम लांबणीवर लातूर, दि. २६ : भारताच्या माननीय राष्ट्रपती

श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवार, ३० जुलै, २०२४ रोजी उदगीर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार होते.  मात्र, माननीय राष्ट्रपती महोदया यांचा पूर्वनियोजित महाराष्ट्र दौरा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचे राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून कळविण्यात आले आहे. परिणामी उदगीर येथील बुद्ध विहार उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.