Wednesday, November 11, 2020

आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीच्या वतीने फटाके वाजवुन जल्लोष

अंबाजोगाई प्रतिनिधी:- मोहंमद ताहेर

बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर विजय मिळवल्या बद्दल अंबाजोगाई येथील AIMIM पार्टीच्या वतीने फटाके वाजवुन आनंदोत्सव आणि जल्लोष साजरा करतांना
बीड जिल्हा प्रवक्ता रमीज सर,शहर अध्यक्ष हिफाजत मीर खान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Saturday, November 7, 2020

पोस्ट ऑफीस चा भोंगळ कारभार आंधळं दळतय अन कुञ पिठ खातय: मुस्ताक कूरेशी


माजलगाव (प्रतिनिधी)  माजलगाव येथील पोस्ट ऑफीस मध्ये निराधारांची हेळसांड व खुलेआम  लयलूट होत आहे,ती तात्काळ थांबवण्यात यावी यासाठी अन्याय ,अत्याचार   भ्रष्टाचार,विरोधी  समितीच्या वतिने निवेदन देण्यात आले,नवराञ महोत्सवच्या अगोदर निराधारांची वेतन जमा झाले होते,ते अद्याप पर्यत पण पोस्ट ऑफीसने लाभार्थी यांना मिळाले  नाही,त्यांना विचारणा केली असता नेट प्रोब्लेम म्हणून हात झटकतात,दोन कॅश काऊंटर,सिलिप भरण्याचा वेळ वाढवून देण्यात यावा,बाहेरची दलाली तात्काळ थांबवण्यात यावी,कारण जर पोस्टा मधिल कर्मचार्‍यांनी निराधार,अबला,वृध्द अशा लोकांना वेळेवर सिलिप भरून दिली तर त्यांचे १००/२००रू वाचू शकतात,अशा आशयाचे निवेदन दिले असून दिवाळी च्या सनाला तात्काळ निराधारांची पगार दोन काऊंटर बणवून देण्यात यावी व बाहेरचा सूळसूळाट थांबवावा ,तिथे पाण्याची व्यवस्था व स्वच्छता राबवण्यात यावी असे हि निवेदनात म्हटले आहे.यावेळी ,तालुका अध्यक्ष मुस्ताक कुरैशी,शहर अध्यक्ष आजीम कुरैशी व  अशोक ढंगे, इतर .उपस्थित होते.

उदगीर येथे बेघर निवारा केंद्रामध्ये अनोखे डोहाळे जेवण


उदगीर प्रतिनिधी:

आधार शहरी बेघर निवारा उदगीर मनिषा व्यंकट जाधव नावाची 25 वर्षीय महीला रा.बिदर हे सासर   लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले. सुरूवातीला काही वर्षे संसाराचा गाडा खुप सुखी समाधानाने व आनंदाने सुरू होता पण मध्येच पतीच्या डोक्यामध्ये संशयाचं व अपेक्षाचे वादळ निर्माण होऊन पती पत्नीमध्ये सतत भांडणं होऊ लागले आणि याचा परिणाम पत्नी दोन महिन्यांची गर्भवती असतानाच पतीने तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. सदर महीलेचे माहेर हे निलंगा तालुका जि.लातूर येथील असून जन्मदातेच हयात नसल्याने भावानी घरी न येण्यास सक्त ताकीद दिल्याने तिचे सर्व छत्र हरवले गेल्याचं अतोनात दुःख असूनही ती तिच्या चेह-यावर कधीच दाखवली नाही आणि स्वतःचा जीव व गर्भामध्ये असणा-या जीवासाठी ती भटकंती सुरू केली आणि गेली चार महिन्यांपासून उदगीर शहरामध्ये राहण्यासाठी आली. ती अशा ठिकाणी राहू लागली की कल्पना सुद्धा करवत नाही ते म्हणजे एक भिक मागणा-या वृद्ध महीलेसोबत झोपडीमध्ये पण दोन जीवाची माता जगण्यासाठी धडपड करीत करीत एका हॉटेल मध्ये स्वयंपाक करण्याची नोकरी धरली आणि आपलं जगणं सोपस्कर केलं,सकाळी जाणे आणि रात्री उशिरा झोपडीमध्ये आश्रयासाठी जाणे ही पायपीट सुरू झाली, गर्भातल्या बाळाची वाढ होत असतानाच महिलेच्या मनात भिती वाढू लागली माझं ठिक आहे पण बाळाचं काय अजून जगही पाहीलं नाही काय करावं आणि काय नाही या द्विधा अवस्थेत जगू लागली पण त्या झोपडीत ती पक्कं व सुरक्षिततेचे स्वप्न पाहत होती पण असह्य व बेसहारा असल्याचे पाहून काही टवाळखोर युवकांची नजर त्या महीलेवर रोखू लागली अशातच ती खुप भयभीत होऊन भटकत असताना शहरातील एका गृहस्थाने त्यांना नगर परिषदेच्या बेघर निवारा केंद्राचा पत्ता दिला त्या गृहस्थाने निवा-याबाबत असणारी सुविधा व माणूसकीचे शाब्दिक दर्शन व विश्वास  दिल्याने ती महीला निवा-यावर आली तेव्हा ती खुप भेदरलेल्या अवस्थेत होती, सहा महीन्याची गर्भवती अवस्थेतील महीला निवा-यामध्ये आश्रयास आली आणि तिच्या आयुष्यात घडलेली सर्व वास्तव घटना सांगत होती आणि माझ्या निवा-यात असणा-या सर्वांच्या डोळ्यांतील अश्रूला वाट मिळाली सर्वांनी बेघर बांधवांनी तिला मुलगी व बहिण म्हणून स्विकारले आणि देखभाल व व्यवस्थापन करणा-या गौस शेख यांच्या संस्थेने मुलगी म्हणून स्विकारताच त्या भगीनीला अश्रू अनावर झाले.
निवा-यावर येण्याच्या पूर्वी त्या महिलेस वाटत होते की महिलेच्या आयुष्यातील पहीला सर्वोच्च आनंदाचा व सुखाचा क्षण असतो तो अनुभवता येणारच नाही, पण जेव्हा ती आपल्या निवा-यामध्ये आली आणि काल तिला तो सर्वोच्च आनंदाचा क्षण अनुभवास आला तेंव्हा ती खुप खुप आनंदी झाली आणि महिलांच्या गळ्याला लागून आपले आनंदाश्रुला वाट मोकळी करून दिले.काल आधार शहरी बेघर निवारा म्हणजे मुलींसाठी जणू माहेरवासच अनुभवला आहे. मनिषाला सातवा महीना  लागल्याने लातूर जिल्ह्याच्या परंपरेनुसार तिची ओठी भरण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आणि हा प्रसंग खुप आनंदी व आल्हाददायक अनुभवायला मिळाला.यासाठी अथक परिश्रम खुर्शिद शेख,गौस शेख,समीर शेख व सर्व संस्थेचे कर्मचारी बेघर बांधव व मार्गदर्शन  लक्ष्मण जाधव DAY-NULM 
बेघर निवारा हाच बहुतेकासाठी आधारवड व माहेर आहे.

Friday, November 6, 2020

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील ठेकेदाराला कसलाच धाक उरलेला नाही


अंबाजोगाई प्रतिनिधी:- मोहंमद ताहेर

शहरातील पाणी पुरवठा विभागात प्रशासन व नागरिकांचा कसलाच धाक उरलेला दिसत नाही. देशमुख गुत्तेदारयास पाईपलाईन कामाचा कसलाच अनुभव नाही. गतवर्षी खडकपुरा ते महाविर चौक ते पाटिल गल्ली येथे करण्यात आलेल्या पाईपलाईन काम केलेली परिस्थिती आजच्या मोंढा रोड पाईपलाईन काम पेक्षा अधिक बिकट होती त्यातील बहुतांश लिकेज नविन पाईपलाईन कामात फुटले ली जुने पाईप सध्या स्थितीत जैसे थे तैसेच असतांना मोंढा भागात तशीच परिस्थिती परत ओढावलेली आहे.
तरी सत्ताधारी व विरोधक कुठल्या मोहा पाई देशमुख गुत्तेदार यास संभाळ करीत आहे.व गुत्तेदारकडे कुठलेच कुशल कारागिर नसताना का संभाळ करिता हे आणि केलेल्या चुकांबद्दल त्यास सपादनी करत आहे हे प्रश्न जनतेला पडत आहे. अधिकारी वर्ग देखील अशा बोगस गुत्तेदार ला चांगले व उत्तम म्हणतात हे चांगले तर वाईट कारागिर कसे असतील. शहर पाणी पुरवठा ला खरी गरज लहाने ईंजिनिअर व अनुभव असणारे कारागिर व टेक्निकलि सक्षम माहिती दार कारागिर असणारे गुत्तेदार चि गरज आहे असे वाटते.नगरपरिषदन ने मोह आवरून सत्य परिस्थिती पाहून सर्वच निविदा रद्द करावी .अशा अकार्यक्षम अधिकारी व गुत्तेदार ला दंड आकाराने काळाची गरज आहे.

Thursday, November 5, 2020

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने लोखंडी सावरगाव येथील कोवीड सेंटरला स्टाॅफ नर्स, वार्ड बाॅईज वेळे आधिच कार्यमुक्त बेमुदत धरणे आंदोलनाला जाहिर पाठिंबा

अंबाजोगाई प्रतिनिधी : मोहंमद ताहेर

याविषयी अधिक माहिती की,लोखंडी सावरगाव येथील कोवीड सेंटरला गेल्या तीनमहिन्याकरिता स्टाॅफ नर्स, वार्ड बाॅईज यांची नियुक्ती करण्यात आली होती
परंतु आज कोरोंनाची संख्येचे प्रमाण कमी झाल्यामुळे येथील स्टाॅफ नर्स, वार्ड बाॅईज कालावधी आधिच कमी करण्यात आल्यामुळे तीन महिने नियुक्ती कार्यकाळ पुर्ण करण्यात यावे आणि स्टाॅफ नर्स, वार्ड बाॅईज यांच्यावर होत असलेल्या अन्याय तात्काळ थाबवावा व प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीच्या मार्फत होत असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने जाहिर पाठिंबा देताना
मराठवाडा संपर्क प्रमुख मोहंमद ताहेर
अंबाजोगाई तालुका अध्यक्ष शेख फेरोज
अंबाजोगाई शहर अध्यक्ष रहेमत पठाण
अंबाजोगाई तालुका अध्यक्ष आरोग्य सेल शेख रशीद इत्यादी

Monday, November 2, 2020

प्रभाग क्र.९ विविध समस्याने ग्रस्त वाली असुन नसल्या सारखे


माजलगाव (प्रतिनिधी)
आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल च्या वतिने प्रभाग क्र.९ मध्ये आमरण उपोषण बागवान गल्ली मध्ये करण्यात आले होते.प्रभाग ९ मधील विविध समस्या संदर्भात म्हणजेच झेंडा चौक ते दालमिल जवळ मनूर रोड पर्यत रस्ता बनवन्यात यावा,शहरात धुर फवारणी  निर्जतूंणीकरण फवारणी  करण्यात यावे,मूल्ला मस्जीद,जामा मस्जीद ,ते पाटील गल्ली रस्ता बनवण्यात यावा बूखारी ऊर्दू शाळे जवळील पूल मोकळा करण्यात यावा,तसेच प्रभाग ९ मधील साठे नगर,आंबेडकर नगर,पाटील गल्ली,बागवान गल्ली मधिल नाल्या साफ करण्यात याव्या या विषयास धरूण अमरण ऊपोषण करण्यात आले.या वेळी उपोषणकर्ते म्हणून राॅ.काॅ. अल्पसंख्यांक शहराध्यक्ष मोसीन बागवान ,व रहिम चौधरी हे होते या उपोषणास मानवी हक्क अभियानचे अशोक ढगे,अलिशेर,कुरैशी, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिति चे मुस्ताक कुरैशी ,मोझम कुरैशी, लोकदशा पेपर चे नाजेर भाई व इतर नागरीकांनी जाहीर पाठींबा दिला.हे उपोषण लेखी म्हणजेच मासिक सभा झाली की हे कामे करू अशा आशयाचे पञक   नगर परिषदचे  ओ .एस. शायद  अली साहेबनी आदोंलन कर्त्यास लेखी दिले व हे उपोषण तूर्तास थांबवले. या वेळी अंदोलनकर्त्यांनी मासिक सभा झाली की वरील कामे केली नाही तर उग्र स्वरूपाचे अंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला.

Sunday, November 1, 2020

कामगार विधेयकाविरोधात असंघटित कामगार काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम सुरू !


             / प्रतिनिधी
अखिल भारतीय राष्ट्रीय असंघटीत कामगार कांग्रेस व महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कामगार विधेयकाविरोधात शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात झाली आहे.
जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरातील जिल्हा परिषद, पंचायत समिती गटांमधील प्रत्येक गावांमध्ये ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.
मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घाईघाईने अतिशय जाचक कामगार विरोधी व तीन कृषि विधेयकाला मंजुरी दिली होती. राज्यसभेमध्ये बहुमत नसतानाही आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर केले होते. या विधेयकाचा देशभरातील शेतकऱ्यांनी व मंजुर केलेल्या विधेयकांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, खा.राहुल गांधी पक्षश्रेष्ठींच्या सुचनेनुसार प्रदेश कांग्रेस, जिल्हा, तालुका, गाव-तांडा-वस्ती-वाडी वस्तीसह ग्रामस्थांनी तथा महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कांग्रेस यांनी विरोध केला आहे. तसेच काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभा टाकला आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने २ ऑक्टोंबर रोजी धरणे आंदोलन केले होते. तसेच १४ व १५ अॉक्टोबर ला महारॕली, व्हर्चुअल रॕली, कामगार बचाव, शेतकरी बचाव महारॕली, अॉनलाईन व्दारे मार्गदर्शन आणि आता स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार, राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित भैय्या विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बदरूज्जमा, आ. धीरज भैय्या विलासराव देशमुख, राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे लातूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल्यदादा उटगे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे लातूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, मराठवाडा प्रभारी आयु.सुंदर कांबळे, निरीक्षक वारे, प्रभारी निरीक्षक विकास देशमाने, असंघटित काँग्रेसचे विविध सेलचे तालुकाध्यक्ष यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी घोणसी विभाग प्रमुख कैलास सोमुसे-पाटील, दादाराव कांबळे, भागवत धुमाळ, शेख सय्यद, मायाताई कांबळे यांच्यासह अनेक असंघटित कामगार काँग्रेसचे कार्यकर्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यकर्ते स्वाक्षरी मोहीमेसाठी पुढाकार घेत आहेत.