सिल्लोड (प्रतिनिधी):-
आम आदमी पक्षाच्या वतीने सिल्लोड शहर व तालुक्यामध्ये आज रोजी ऑक्सीमित्र अभियान अंतर्गत नागरिकांची शरीरातील ऑक्सीजन पातळी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून देशांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साहेब यांनी कोरोना प्रतिबंध कालावधीमध्ये राबवलेल्या उपायोजना निश्चितच गौरवास्पद असुन दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील "ऑक्सीमित्र" अभियानची सुरुवात करण्यात आली असून सिल्लोड -सोयगांव विधानसभा अंतर्गत सिल्लोड शहरामध्ये आज ऑकसीमित्र अभियानाची सुरुवात आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा. रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटनमंत्री अजबराव मानकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. उस्मान शेख ताहेर, सिल्लोड- सोयगांव विधानसभा अध्यक्ष महेशकुमार शंकरपेल्ली, सिल्लोड तालुका अध्यक्ष डॉ. दत्तात्रेय गोंगे, सिल्लोड शहराध्यक्ष शेख रफिक अब्दुल रहीम, तालुका उपाध्यक्ष नजीर तडवी, संघटन मंत्री इस्माईल शेख सलीम शेख, शहर सचिव इमरान देशमुख, आप पालक आघाडीचे असलम खान पठाण, सुनील पाटील गुळवे, विशाल पाटील शेजुळ, एड. रवींद्र ताठे, अड. संतोष बोराडे, मोबीन शहा आदी आपचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शहरातील कॉम्रेड शेख बाबुभाई, एमआयएमचे शहराध्यक्ष शेख मुख्तार उर्फ बबलूभाई, भाजपाचे शहर उपाध्यक्ष अमोल ढाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख शाकेर, अंकुशराव पाटील आदीं प्रतिष्ठित विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे नागरिकांनी ऑक्सीमित्र अभियानाचे कौतुक केले. यावेळी सिल्लोड सोयगांव शहर व तालुक्यातील गावागावात वॉर्डांमध्ये ऑक्सीमित्र अभियान अंतर्गत आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी यांच्या नेतृत्वात दहा टीम तयार करून घरोघरी जाऊन नागरिकांचे शरीराची ऑक्सीजन पातळीच्या नोंदी घेतल्या जाणार असल्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. शेख उस्मान शेख ताहेर यांनी सांगून नागरिकांनी ऑक्सीमित्र अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.