Wednesday, September 30, 2020

वर्षभरापासुन केलेल्या पाठपुराव्या नंतर शहरातील धोकादायक कुजलेले विद्युत खांब बदलण्यास सुरू


अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीच्या पदाधिकाऱ्यांचे जनतेने मानले आभार

परंडा दि २८ ( प्रतिनिधी ) शहरातील पन्नास वर्षापुर्वीचे विद्युत खांब खालच्या बाजुने पुर्णता गंजून कुजले गेले असुन हे विद्युत खांब कधी ही कोसळुन मोठी दुर्घघटणा होण्याची शक्यता असुन असे विद्युत खांब महावितरण कंपणीने बदलावे आशी मागणी एक वर्षापुर्वी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती . याचा पाठपुरावा सुरु ठेवला अखेर या पाठपुराव्याची दखल महावितरण कंपणीने घेतली आणि कुजलेले विद्युत खांब बदलण्यास सुरुवात केली आहे .
  शहरातील धोकादायक कुजलेले विद्युत खांब महावितरणने बदलण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे जनतेतुन  अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीचे आभार मानले तर महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या या कामाबद्दल नागरीकातुन समाधान व्यक्त होत आहे
   शहरात गेल्या अनेक वर्षापुर्वाची जुनी विधुत खांब खालच्या बाजुने गंजुन कुजली गेली आहेत हे खांब सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणत्याही शणी कोसळून मोठी दुर्घटना घडून जिवीत हानी घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीचे मराठवाडा सचिव फारूक शेख , जिल्हाध्यक्ष
एकबाल शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याकडे १० स्पटेंबर २०१९  रोजी निवेदन दिले . संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील धोकादायक पोलचा सर्वे करण्यासाठी लाईनमनला सांगितले लाईनमने सर्वे करून अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला मात्र महावितरणकडुन कुजलेले पोल बदलण्यासाठी काही हालचाली दिसत नसल्याने पुन्हा समितीने दुसरे निवेदन दिले त्यानंतर संमधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यानी सांगीतले आम्ही रिर्पोट वरिष्टांकडे पाठवले आहे . याला मंजुरी मिळाली की पोल बदलण्यात येईल असे सांगीतले होते .निवेदन देऊन १० महिने झाले तरी पोल बदलण्याच्या मागणीला महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा समज अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीच्या पदाधिकाऱ्यांचा झाला त्यानी दिलेल्या निवेदनावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या स्वरुपाची कार्यवाही केली . व ते कोणत्या अधिकाऱ्यानी केली याची माहिती माहितीच्या अधिकारात मागीतली असता संबधित अधिकाऱ्यांनी कुजलेले विद्युत खांब बदलण्याच्या कामास सुरुवात केली आहे .

वर्षभरापासुन केलेल्या पाठपुराव्या नंतर शहरातील धोकादायक कुजलेले विद्युत खांब बदलण्यास सुरू


अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीच्या पदाधिकाऱ्यांचे जनतेने मानले आभार

परंडा दि २८ ( प्रतिनिधी )
शहरातील पन्नास वर्षापुर्वीचे विद्युत खांब खालच्या बाजुने पुर्णता गंजून कुजले गेले असुन हे विद्युत खांब कधी ही कोसळुन मोठी दुर्घघटणा होण्याची शक्यता असुन असे विद्युत खांब महावितरण कंपणीने बदलावे आशी मागणी एक वर्षापुर्वी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती . याचा पाठपुरावा सुरु ठेवला अखेर या पाठपुराव्याची दखल महावितरण कंपणीने घेतली आणि कुजलेले विद्युत खांब बदलण्यास सुरुवात केली आहे .
  शहरातील धोकादायक कुजलेले विद्युत खांब महावितरणने बदलण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे जनतेतुन  अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीचे आभार मानले तर महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या या कामाबद्दल नागरीकातुन समाधान व्यक्त होत आहे
   शहरात गेल्या अनेक वर्षापुर्वाची जुनी विधुत खांब खालच्या बाजुने गंजुन कुजली गेली आहेत हे खांब सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोणत्याही शणी कोसळून मोठी दुर्घटना घडून जिवीत हानी घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीचे मराठवाडा सचिव फारूक शेख , जिल्हाध्यक्ष
एकबाल शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याकडे १० स्पटेंबर २०१९  रोजी निवेदन दिले . संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील धोकादायक पोलचा सर्वे करण्यासाठी लाईनमनला सांगितले लाईनमने सर्वे करून अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला मात्र महावितरणकडुन कुजलेले पोल बदलण्यासाठी काही हालचाली दिसत नसल्याने पुन्हा समितीने दुसरे निवेदन दिले त्यानंतर संमधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यानी सांगीतले आम्ही रिर्पोट वरिष्टांकडे पाठवले आहे . याला मंजुरी मिळाली की पोल बदलण्यात येईल असे सांगीतले होते .निवेदन देऊन १० महिने झाले तरी पोल बदलण्याच्या मागणीला महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा समज अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समीतीच्या पदाधिकाऱ्यांचा झाला त्यानी दिलेल्या निवेदनावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या स्वरुपाची कार्यवाही केली . व ते कोणत्या अधिकाऱ्यानी केली याची माहिती माहितीच्या अधिकारात मागीतली असता संबधित अधिकाऱ्यांनी कुजलेले विद्युत खांब बदलण्याच्या कामास सुरुवात केली आहे .

जयवंती पाटील यांची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महिला रायगड जिल्हा उपाध्यक्षा पदी निवड.

पनवेल तालुका प्रतिनिधी: बळीराम पाटील

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मध्ये पिसार्वे रायगड येथील जयवंती पाटील यांची महिला रायगड जिल्हा उपाध्यक्षा पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक दि.30/09/2020 संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे *संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने रायगड जिल्हाध्यक्ष गिरीश भोपी यांनी* निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
*माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहिती अधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*

आप'च्या वतीने सिल्लोड शहरात ऑक्सीमित्र अभियानाची सुरुवात


सिल्लोड (प्रतिनिधी):-
आम आदमी पक्षाच्या वतीने सिल्लोड शहर व तालुक्यामध्ये आज रोजी ऑक्सीमित्र अभियान अंतर्गत नागरिकांची शरीरातील ऑक्सीजन पातळी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून देशांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साहेब यांनी कोरोना प्रतिबंध कालावधीमध्ये राबवलेल्या उपायोजना निश्चितच गौरवास्पद असुन दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील "ऑक्सीमित्र" अभियानची सुरुवात करण्यात आली असून सिल्लोड -सोयगांव विधानसभा अंतर्गत सिल्लोड शहरामध्ये आज ऑकसीमित्र अभियानाची सुरुवात आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा. रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटनमंत्री अजबराव मानकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. उस्मान शेख ताहेर, सिल्लोड- सोयगांव विधानसभा अध्यक्ष महेशकुमार शंकरपेल्ली, सिल्लोड तालुका अध्यक्ष डॉ. दत्तात्रेय गोंगे, सिल्लोड शहराध्यक्ष शेख रफिक अब्दुल रहीम, तालुका उपाध्यक्ष नजीर तडवी, संघटन मंत्री इस्माईल शेख सलीम शेख, शहर सचिव इमरान देशमुख, आप पालक आघाडीचे असलम खान पठाण, सुनील पाटील गुळवे, विशाल पाटील शेजुळ, एड. रवींद्र ताठे, अड. संतोष बोराडे, मोबीन शहा आदी आपचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शहरातील कॉम्रेड शेख बाबुभाई, एमआयएमचे शहराध्यक्ष शेख मुख्तार उर्फ बबलूभाई, भाजपाचे शहर उपाध्यक्ष अमोल ढाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे  शहराध्यक्ष शेख शाकेर, अंकुशराव पाटील आदीं प्रतिष्ठित विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे नागरिकांनी ऑक्सीमित्र अभियानाचे कौतुक केले. यावेळी सिल्लोड सोयगांव शहर व तालुक्यातील गावागावात वॉर्डांमध्ये ऑक्सीमित्र अभियान अंतर्गत आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी यांच्या नेतृत्वात दहा टीम तयार करून घरोघरी जाऊन नागरिकांचे शरीराची ऑक्सीजन पातळीच्या नोंदी घेतल्या जाणार असल्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. शेख उस्मान शेख ताहेर यांनी सांगून नागरिकांनी ऑक्सीमित्र अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

धनेगांव ता देवणी येथे होत असलेली अवैध देशी व विदेशी दारु विक्री तात्काळ बंद करावी ग्रामस्थानीं दिले पोलीस अधिक्षकानां निवेदन*


वलांडी प्रतिनिधी सगीर मोमीन

मौजे धनेगांव ता देवणी हे मांजरा काठी वसलेले समृध्द गांव  ग्रामीण भागात पंचक्रोशीमध्ये  शिक्षणाचे माहेरघर म्हणुन प्रसिध्द  असलेले  हे गांव आज अवैध धंद्याचे माहेरघर  बनले आहे, आज या गावात गल्लो -गल्ली  देशी  व विदेशी दारु विक्री जोमात चालु आहे, 
भारत देशाचे भविष्य असलेली  ही तरुण पिढी  दारु कडे आकर्षित होवुन व्यसनाधिन  बनत चालली आहे. त्यामूळे देशाचे भवितव्य असलेली तरुण पिढीचे भविष्य अंधकारमय  होत आहे , आजपर्यंत या अवैध दारु विक्रीमूळे अनेकांचे संसार  देशोधडीला लागले आहेत , यामूळे गावात मारामारी, चोरी करणे,महिलाची छेडछाड करणे इत्यादी प्रकार वाढत आहेत........

या अवैध दारु विक्री करणार्‍यावरती कायदेशिर कार्यवाही करुन तात्काळ दारु विक्री पुर्णपणे बंद करावी अशी मागणी भाजयुमोचे तालुका अध्यक्ष श्री रामलिंग शेरे , श्री बाळासाहेब बिरादार, श्री राम खारे, श्री किशोर बिरादार, सौ ललुबाई शेटकार, श्री मूरहारी बिरादार, श्री बालाजी बिरादार, श्री माणीक बिरादार ,सौ उषाबाई बिरादार , श्री उध्दव बिरादार , श्री रामभाऊ बिरादार , श्री गणेश बिरादार, श्री बालाजी बिरादार, श्री दिपक आलमले, श्री राजकुमार बिरादार, आदीसह ग्रामस्थानी केली आहे

कोरोना जीव घेण्या महामारित इतर रोगराईना शिरकाव होऊ देऊ नका -गटशिक्षणाधिकारी श्री अशोक भांजे

प्रतिनिधी:-✍🏻✍🏻 देवेंद्र कोळी

*पंचायत समिती अक्कलकोट शिक्षण विभाग व तालुका मुख्याध्यापक संघ व तालुक्यातील इतर शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय  प्रभारी  गटशिक्षणाधिकारी श्री अशोक भांजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माननीय गटविकास अधिकारी श्री कोळी साहेब, सभापती माननीय सौ.सुनंदा गायकवाड, श्री सिध्दार्थ गायकवाड, तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री सुनील गुमास्ते,सचिव श्री श्रीशैल पाटील याच्या शुभ हस्ते कोरोना महामारिच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे इतर रोगराईचा शिरकाव होऊ नये म्हणून पंचायत समिती अक्कलकोट परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. याप्रसंगी बोलताना आपल्या मनोगतातून आपण आणि आपण राहत असलेला,काम करत असलेला परिसर प्राधान्याने स्वच्छ करण्याचे आवाहन केले. आपण महा भयंकर महामारितून आता कुठेतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत निसर्ग समतोल राहिल्याने यंदा पाऊस चांगला आहे पण आपण स्वच्छतेला महत्त्व देऊन इतर रोगराईला निमंत्रण न देता काळजी घेत काम करणे गरजेचे आहे. सहभागी सर्व संघटनांने अशा धकाधकीच्या काळात ही मोठ्या संख्येने उपस्थित राहात आपण सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहात आपले सर्वाचे कार्य कौतुकास्पद आहे असे गटशिक्षणाधिकारी भांजे साहेब व्यक्त केले.याप्रसंगी गटविकास अधिकारी श्री कोळी साहेब, सभापती सौ.सुनंदा गायकवाड, सचिव श्री श्रीशैल पाटील उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री गिरीश पट्टेद, जिल्हा प्रतिनिधी श्री लक्ष्मण चलगेरी,प्रसिद्धी प्रमुख श्री अमोगसिध्द बिराजदार,श्री प्रभाकर बंदीछोडे,श्री शिवराज किलजे, श्री एफ एस स्वामी ,श्री विश्वनाथ हळके, श्री अरुण पाटील, श्री ममदअल्ली पटेल,श्री तानाजी सुरवसे, श्री व्यंकटेश बोकडे, श्री शिवानंद पुजारी,श्री महादेव लिंबितोटे, श्री शेख ए ए श्री मल्लिकार्जुन मणूरे उपस्थित होते*.

जमादार सरपंच यांना अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार.


उमरगा प्रतिनिधी: मुजीब मकानदार

      येणेगुर ता.उमरगा येथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती येणेगुर यांच्या वतीने मुरळी गावाचे सरपंच श्री. शमशोद्दीन घुडुलाल जमादार यांना कोरोनाच्या कठीण काळात  केलेल्या धाडसी कार्याबद्दल कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
           सरपंच श्री शमाशोद्दीन जमादार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, यांनी *पक्षाचे सर्वेसर्वा पक्षप्रमुख आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब* यांच्या विचारांचा वारसा अखंडितपणे चालू ठेवला आहे असे सरपंच साहेबांच्या कार्यातून सर्वंचा लक्षात येईल. कोरोणा  च्या या महामारीचा काळामध्ये  मुरळी या गावामध्ये यांनी कारोना विरूद्ध आपले काम चालू ठेवले. ग्रामस्थांच्या सेवेसाठी रात्र अन दिवस न पाहता आगदी लॉकडाऊन च्या पहिल्या दिवसा पासून ते आत्तापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवा यासाठी योग्य त्या उपाय योजना आणि कार्यवाही केल्या. न थकता न थांबता अविरतपणे त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. यांची याच कार्याची दखल अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती चे  मराठवाडा उपाध्यक्ष श्री. मुजीबजी चैतनशहा मकानादर यांनी घेऊन त्यांना कारोणा योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
        या कार्यक्रमाच्या प्रसंगी आदम देशमुख, आसिफ मुल्ला आजगर पांढरे, आरबज शेख, आली माळवाले, जाफर मुल्ला, समीर आत्तार, सहील शेख, आफताब मकानदार, अहेमद भालके, इरफान चाकुरे तसेच सर्व पदाधिकारी अदी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या नविन कृषी विधेयक रद्द करण्याचे MPJ संघटने कडून राष्ट्रपतीना दिले निवेदन!


लातूर जिल्हा प्रतिनिधी: खिजर मुंशी

संसदेत संमत करण्यात आलेल्या तीन शेती विधेयकांमुळे हमीभावाबाबत साशंकता निर्माण झाली असून कृषी बाजाराची व्यवस्थाही बंद होण्याचा धोका आहे. केंद्र सरकारची ही धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा दावा मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस या सामाजिक संघटनेने केली आहे, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक कायदा
केंद्र सरकारने आवश्यक वस्तू अधिनियम 1955 मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे आता खाद्यपदार्थांच्या साठेबाजीला प्रतिबंध नसेल. याचा अर्थ व्यापारी आता धान्य, डाळी, खाद्यतेल, कांदे आणि बटाट्याचे अमर्यादा साठा करु शकतील. व त्यांचे चढ्या भावाने विक्री करतील यावर कोणाचेही अंकुश राहणार नाही असे या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे, यामुळे कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक
यामध्ये विधेयकात कृषी माल बाजार समित्यांच्या बाहेर खरेदी आणि विक्रीची मुभा मिळणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची चंगळ, अन शेतकरी कंगाल अशी गत या केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होणार आहे, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक यामध्ये करार शेतीला वैध ठरवले जाणार आहे. यात मोठे व्यावसायिक आणि कंपन्या करारावर शेतजमीन घेऊन शेती करु शकणार आहेत त्यामुळे शेती करणाऱ्या कंपन्या देशात तयार करण्यात येणार आहेत याचा फायदा शेतकऱ्यांना कमी अन कंपण्याला जास्त होणार आहे अगोदरच सततच्या नापिकी मुळे कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा यामुळे शेतकरी हतबल झाला आहे यामुळे कोलमडलेले शेतकरी करार शेतीवर सहज तयार होतील अन शासनाच्या या धोरणामुळे शेतकऱ्याची कुचंबणा होणार आहे.
एम ,पी ,जे  संघटनेने या शेती विधेयकांना विरोध केला असून उपविभागीय अधिकारी उदगीर यांच्या मार्फत राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती परत पाठवण्याची विनंती केली आहे. हे निवेदन एम पी जे संघटनेचे जिल्हाध्यक्ष हाश्मी वसीसर, सामाजिक कार्यकर्ते रंगा राचुरे, मराठा सेवा संघाचे राजकुमार अतनुरे, नगरसेवक मंजूरखां पठाण, नगरसेवक शमशोद्दीन जरगर, नगरसेवक शेख इब्राहिम व उदगीर एम पी जे संघटनेचे पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.