Wednesday, July 31, 2024

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील फ्रुट मार्केट व्यापाऱ्यांशी साधला सुसंवाद

लातूर प्रतिनिधी : सगीर मोमीन ३१ जुलै २०२४ लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौका नजीकच्या फ्रुट मार्केट परीसरात जाऊन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री वलातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी तेथील व्यवस्थांची पाहणी केली. त्याठिकाणी व्यापारी, फळ विक्रेते, वाहनधारक आणि नागरीक यांच्याशी सुसंवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी फ्रुट मार्केट परीसरात जाऊन तेथील व्यवस्थांची पाहणी केली. त्याठिकाणी व्यापारी, फळ विक्रेते, वाहनधारक आणि नागरिक यांच्याशी चर्चा केली. फ्रुट मार्केटमध्ये दररोज नियमितपणे स्वच्छता करावी, या ठिकाणच्या कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा लावावी, व्यापारी,फळविक्रेते, तसेच नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी पार्किंग व्यवस्थेवर लक्ष द्यावे, या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारावी, फ्रुट मार्केट मध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी करून त्याची नियमित स्वच्छता होईल हे पाहावे आदी सूचना महानगरपालिका प्रशासनाला करून, आगामी काळात फळ विक्रीसाठी येणारे शेतकरी त्याचबरोबर
व्यापारी यांच्याशी नवीन अद्यावत फ्रुट मार्केट उभारणी करावी असेही यावेळी सांगितले यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, लातूर फ्रुट मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष हाजी शबीर, रहेमानसाब बागवान, शब्बीर हाजी, मेहतासाब बागवान, बरकत हाजी, रहेमानसाब बागवान, विजयकुमार साबदे, इमरान सय्यद, आसिफ बागवान, सचिन बंडापले, अब्दुल्ला शेख, सुलतान शेख, मजीद हाजी, कासीमसाब बागवान, तबरेज तांबोळी, गिरीश ब्याळे, असंघटित कामगार काँग्रेसचे लातूर शहराध्यक्ष तथा महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य गौस गोलंदाज, लातूर हातगाडा असोसिएशन सचिव मजीद बागवान, हमीद चाकूरकर, सुलतान शेख, मजीद हाजी, कासिमसाब बागवान, बरकत बागवान, जाकिर बागवान, बडेसाहब शेख, अनवर बागवान, रफिक बागवान, रईस बागवान, आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी फ्रुट व्यापारी आडते हमाल मापाडी उपस्थित होते.

कापड्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला, 1 लाख 28 हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

लातूर प्रतिनिधी: सगीर मोमीन लातूर जिल्ह्यातील रेणापूर पोलीस ठाणे हद्दी मध्ये रात्रीच्यावेळी एका कपड्याच्या दुकानाचा पत्रा काढून साड्या व कपडे चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
              पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. 
             सदर पथकाकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी गुप्त बातमीदाराकडून नमूद गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली.
                   सदर पथकाने नमूद गुन्ह्यातील आरोपीला दिनांक 30/07/2024 रोजी कळंब तालुक्यातील पाथर्डी येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव 1) दादा बब्रुवान पवार, वय 45 वर्ष राहणार पाथर्डी तालुका कळंब जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) असे असल्याचे सांगितले.
त्याच्या घराची झडती घेतली असता घरा मध्ये नवीन साड्या व कपडे मिळून  आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या पत्नीसह लातूर जिल्ह्यातील रेनापुर येथील  एका कपड्याच्या दुकानात चोरी केल्याचे व त्यामध्ये चोरलेले साड्या व कपड्याचा मुद्देमाल असल्याचे कबूल केले.
                त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलसह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे रेणापूर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. असून त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उप-निरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार रामहरी भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, प्रकाश भोसले, सुरेश कलमे, प्रदीप चोपणे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पुणेकर, पोलीस अमलदार गोरोबा इंगोले, अंकुश बिराजदार यांनी केली आहे.

सीमावर्ती भागात सूर्यवंशी यांच्यातर्फे पत्रकारांचा सत्कार

वलांडी प्रतिनिधी: सगीर मोमीन भालकी तालुक्यातील आळवाई येथे कर्नाटक हुलसुर तालुका पत्रकार संघ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांचा व महाराष्ट्रातील काही पत्रकारांचा आळवाई येथे दि.30.जुलै रोजी युवा नेते कर्नाटक रोहिदास संघटना अध्यक्ष गोपाळ बाबुराव सुर्यवंशी यांच्या तर्फे पत्रकाराने केलेल्या कामाचे कौतुक करून सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम हे पत्रकार बांधव करत असतात त्या अनुषंगाने सत्कार समारंभ करण्यात आले रोहीदास संघटने तर्फे अशे अनेक गरजू लोकांना साहित्याचे वाटप व सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबविले जातात यावेळी जेष्ठ पत्रकार संपादक तेरणातीरचे पी आर पाटील,विद्यासागर पाटील, दत्तात्रेय साबणे,शीवकुमार खपले, गुरूप्रसाद मेंठे,वीरशेठी करकले,आकरम शेख,राजु कीसे,डी एम स्वामी,सगीर मोमीन सोसायटी अध्यक्ष जनार्दन बीरादार,ग्रामपंचायत माजी अध्यक्ष गुणवंतअप्पा गंदगे,माजी सभापती अकबर पटेल, गुंडअप्पा गंदगे,दत्ता पाटील, जनार्दन जयदेव, राजकुमार गंदगे,खंडु मोरे    व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

वलांडीत जलजीवन योजनेचे पाणीकाही येईना रस्ते खंदल्यामुळे नागरिकांना घरापर्यंत जाता येईना

वलांडी प्रतिनिधी: सगीर मोमीन देवणी तालुक्यातील वलांडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या खड्यांत पाणी साचत असल्याने संतप्त नागरीकांनी वलांडी येथील ग्राम पंचायत कार्यालयात निवेदन देण्यात आले.वलांडी येथील वार्ड क्रमांक १ मधील शासकीय अरोग्य केंद्र शेजारील वसतीत जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या खड्यात पाणी साचल्याने तेथील नागरीक वृध्द महीला व शाळकरी मूलांना साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत आहे.
पडलेल्या पावसाला जाण्यास पर्यायी मार्ग नसल्याने पाणी साचत आहे.
पुर्वे कडील बाजूला शासकीय आरोग्य केंद्र आहे व पलीकडे मूस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थान मस्जिद आहे.तरी मस्जिद जाण्यासाठी मुस्लिम बांधवांना याच साचलेल्या पाण्यातून वाट‌ काढावी लागत आहे.
जलजिवन मिशनचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे . केंद्र सरकारचे धोरण होते की हर घर नल हर घर जल या मिशन अंतर्गत कामास जोमात सुरुवात झाली होती.जलजिवनचे काम वेळेवर न झाल्याने गावात नळांसाठी  खोदलेल्या खड्यात पाणी साचुन जागो जागी डबक्यामूळे नागरीकांच्या आरोग्यास धोका  निर्माण होत आहे.
ग्राम पंचायत मात्र झोपेचे सोंग घेत आहे.तरी वेळोवेळी ग्राम पंचायतला तोंडी सांगूनही काम होत नसल्याने संतप्त नागरीकांनी ग्रामविकास अधिकारी माधव सगर यांना ३ ते ४ दिवसांत साचलेल्या पाण्याचे योग्य ते  नियोजन लावावे व जर या साचलेल्या पाण्यामुळे नागरीकांना डेंग्यू मलेरीया सारखे आजार जडले तर ग्राम पंचायतीला ग्राह्य धरण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माने गोपाळ, त्रिनेत्र सूर्यवंशी, सिध्देश्वर खवंदे,अमोल कांबळे,समाधान श्रंगारे,योगेश थोरात,उमाकांत कांबळे,आदी उपस्थित होते.

Friday, July 26, 2024

भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा उदगीर येथील कार्यक्रम लांबणीवर लातूर, दि. २६ : भारताच्या माननीय राष्ट्रपती

श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवार, ३० जुलै, २०२४ रोजी उदगीर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार होते.  मात्र, माननीय राष्ट्रपती महोदया यांचा पूर्वनियोजित महाराष्ट्र दौरा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचे राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून कळविण्यात आले आहे. परिणामी उदगीर येथील बुद्ध विहार उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.